शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

‘ते’ खऱ्या अर्थाने ठरले जलदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:37 IST

कोणताही सजीव तहानेने अतिव व्याकूळ होऊन अगदी केविलवाणा होऊ लागला की, पाणी हेच त्या जीवाला परमेश्वर आणि अमृतासमान वाटते. अन्यथा पाण्याला त्याच्या महतीनुसार शोभेल असा मान अजून तरी मानव देतांना दिसत नाही. म्हणूनच आज माणूस पाण्यासाठी दाहीदिशा भटकतांना आणि टाहो फोडताना दिसून येतो.

ठळक मुद्देआमगावचे सुपुत्र : सहा दशकांपूर्वी व्याकुळलेल्यांची भागविली होती तृष्णा

अतुल बुराडे/विष्णू दुनेदार।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा/तुळशी : कोणताही सजीव तहानेने अतिव व्याकूळ होऊन अगदी केविलवाणा होऊ लागला की, पाणी हेच त्या जीवाला परमेश्वर आणि अमृतासमान वाटते. अन्यथा पाण्याला त्याच्या महतीनुसार शोभेल असा मान अजून तरी मानव देतांना दिसत नाही. म्हणूनच आज माणूस पाण्यासाठी दाहीदिशा भटकतांना आणि टाहो फोडताना दिसून येतो. परंतु या विज्ञान युगाला लाजवेल असे व्यक्तिमत्व देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे होऊन गेले. ते म्हणजे मनिराम ढोरे महाराज!आज ‘पाणी वाचवा, पाण्याचा जपून वापर करा’ असे अनेक संदेश देत पाणी बचतीचे लाख प्रयत्न होत आहेत. तरीही अवस्था बिकटच आहे. त्यात सहा-सात दशकांपूर्वी आमगावच्या मनिराम ढोरे महाराजांनी पाण्याचे महत्त्व ओळखून आपल्या दोन्ही खांद्यावर कावड घेऊन सावंगी तसेच भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर परिसरात लोकांची तृष्णा भागविण्याचे काम केले. यातून त्यांनी पाण्याची खरीखुरी आवश्यकता आणि महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविले. २२ मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा करताना मनिराम ढोरे महाराजांच्या कार्याचे स्मरण होते. पाण्यासाठी वाहिलेल्या त्यांच्या जीवन कार्यातून सकारात्मक प्रेरणा घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे.आमगाव येथे जन्मलेल्या मनिराम महाराजांची कर्मभूमी आमगाव, सावंगी आणि लाखांदूर परिसर राहिला. काम काय तर स्वत:च्या खांद्यावर कावड घ्यायची नि विहीर वा जलसाठ्यातील पाणी तहानलेल्यांना पाजायचे. मंगळवार हा दिवस मनिराम महाराजांसाठी जणू सणाचा दिवस असायचा. कारण या दिवशी लाखांदूरला आठवडी बाजार भरायचा आणि यानिमित्त आलेल्या हजारो लोकांना ते कावडीने वाहिलेल्या पाण्याने तृप्त करायचे. यामुळे त्यांना पंचक्रोशीत पाणीवाले मनिराम ढोरे महाराज म्हणून ओळख प्राप्त झाली होती, जी आजही कायम आहे. कार्य व कीर्तीने मनिराम महाराज खऱ्या अर्थाने जलदूत ठरले आहेत.सामाजिक कार्यांमध्येही महाराज अग्रणीमनिराम ढोरे महाराज केवळ वाटसरूंना पाणी पाजण्याचेच काम करीत नव्हते, तर फावल्या वेळेत गावांतील जनावरांना गवत-चारा टाकायचे. अनेक सामाजिक कार्यात सहभाग घ्यायचे. त्यांच्या या कार्याला सलाम म्हणून सावंगीवासीयांनी मनिराम महाराजांच्या मृत्यूनंतर गावात देसाईगंज-लाखांदूर मुख्यमार्गाच्या बाजूला समाधी बांधली. पाणी आणि मनिराम महाराजांचे नाव घट्ट विणले गेले आहे. हे येथील समाधीला भेटी देणाºया लोकांच्या भावनिकतेतून प्रदर्शित होते.

टॅग्स :Waterपाणी