शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत होणार ५७५ जागांची पोलीस भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 06:00 IST

राज्य शासनाने ऑगस्ट महिन्यात काढलेल्या जीआरनुसार जिल्ह्यात मराठा आरक्षण लागू करत आरक्षित जागांची फेररचना केली होती. परंतू लगेच त्याला स्थगिती दिली. तेव्हापासून पदभरतीची प्रक्रिया थंडबस्त्यात आहे. आता त्यावर तोडगा काढून पोलीस भरतीचा मार्ग काढण्यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे लवकरच पदभरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

ठळक मुद्देराखीव जागांचा तिढा सुटणार : पोलीस अधीक्षकांचा शासनाकडे पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राखीव जागांच्या तिढ्यामुळे रखडलेली जिल्हा पोलीस दलाची पदभरती लवकरच घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्हा पोलीस दलाच्या जवळपास ३२५ जागा आणि देसाईगंज येथे कार्यरत राज्य राखीव पोलीस दलाच्या बटालियनसाठी २५० जागांची मिळून ५७५ जागांची भरती जिल्ह्यात होणार आहे.राज्य शासनाने ऑगस्ट महिन्यात काढलेल्या जीआरनुसार जिल्ह्यात मराठा आरक्षण लागू करत आरक्षित जागांची फेररचना केली होती. परंतू लगेच त्याला स्थगिती दिली. तेव्हापासून पदभरतीची प्रक्रिया थंडबस्त्यात आहे. आता त्यावर तोडगा काढून पोलीस भरतीचा मार्ग काढण्यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे लवकरच पदभरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. बेरोजगार युवकांमधील कौशल्य विकासासाठी आदिवासी विकास विभागाच्या मदतीने भरतीपूर्व प्रशिक्षणही सुरू केले जाणार आहे.गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलपीडित कुटुंबातील सदस्यांसाठी जिल्ह्यातील पदभरतीसाठी काही जागा राखीव आहेत. परंतू पीडितांची संख्या जास्त आणि निघणाऱ्या जागा मोजक्या असल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही. त्यासाठी सदर नक्षलीपिडीतांसाठी इतरही जिल्ह्यातील भरतीत जागा राखीव असाव्या असा प्रस्ताव आपण राज्य शासनाला दिला आहे. त्याला मंजुरी मिळण्याची आशा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केली.शेतकऱ्यांचा खर्च होणार कमीशेतीच्या कामासाठी लागणारे ट्रॅक्टर, रोटावेटर, पेरणी यंत्र, थे्रशर यांच्या भाड्यामुळे शेतकºयांचा उत्पादन खर्च वाढत आहे. हा खर्च कमी करण्यासाठीही पोलीस विभागाने पुढाकार घेत हे साहित्य स्वत: खरेदी करून ते कोणतेही भाडे न घेता केवळ डिझेल, विद्युत खर्चाचा भार उचलणाºया शेतकऱ्यांना वापरण्यासाठी देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या स्तरावर गट शेतीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना डिझेल पंपाचे वाटप सुरू झाले आहे.रोजगार मेळावा घेणारपोलीस विभागाने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी यासाठी ५ ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची केंद्रे उघडली आहेत. त्यात यावर्षी ५८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. विशेष म्हणजे त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण, परीक्षा शुल्क जिल्हा विकास निधीतून भरण्याची सोय करण्यात आली आहे.बेरोजगारांचा नोकरीसंदर्भातील कल जाणून घेण्यासाठी पोलीस विभागाने रोजगार मेळावा अ‍ॅप विकसित केले. त्यात ३४६० तरुण-तरुणींनी नोंदणी करत आपल्याला कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल याची माहिती टाकली. त्यांना शिक्षणानुसार योग्य त्या क्षेत्रात नोकरी देण्यासाठी लवकरच रोजगार मेळावा घेणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस