शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

जनजागरण मेळाव्यातून लाच विरोधात जनजागृती होणार

By admin | Updated: September 9, 2014 23:29 IST

गडचिरोली जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण अतिशय कमी आहे. तसेच दक्षिण व उत्तर गडचिरोली भागाच्या काही तालुक्यातील दुर्गम भागात नागरिकांमध्ये शासकीय कामासाठी लाच घेण्याच्या प्रकरणात तक्रारींचे

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण अतिशय कमी आहे. तसेच दक्षिण व उत्तर गडचिरोली भागाच्या काही तालुक्यातील दुर्गम भागात नागरिकांमध्ये शासकीय कामासाठी लाच घेण्याच्या प्रकरणात तक्रारींचे प्रमाणही कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन गडचिरोली जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाच्या जनजागरण मेळाव्यातून लाचविरोधात जनजागृती करणार आहेत, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर विभागीय पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी दिली.गडचिरोली येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते म्हणाले की, आपण उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अहेरी येथे २००७ मध्ये काम केले आहे. या भागातील भौगोलिक परिस्थितीची आपल्याला जाणीव आहे. नागरिकांमध्ये सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुढाकार घेणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याने दुर्गम भागातील लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे फोन नंबर व मोबाईल नंबर तसेच टोल फ्री नंबर असलेले फलक लावण्याबाबतही संबंधित कार्यालयांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात जनजागरण मेळावे मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. या मेळाव्यातही लाच संदर्भात जनजागृती करणारे फलक लावण्याचे काम आगामी काळात केले जाणार आहे. भ्रष्टाचाराविरोधातील तक्रारींची संख्या वाढावी यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय अलिकडेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ‘स्टाप करप्शन सेव्ह नेशन’ ही मोहीम सुरू केली असून या अंतर्गत १०६४ हा टोल फ्री नंबरही नागरिकांना देण्यात आला आहे. नागरिकांनी यावर तक्रारी कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे. या कामासाठी काही स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय जनजागृतीसाठी अन्य माध्यमांचाही वापर केला जाणार असल्याचे ते म्हणाले. न्यायालयातही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संबंधीत प्रकरणात शिक्षेचे प्रमाण आता वाढले आहे. तक्रारीही लोक जागृतीमुळे अधिक प्रमाणात येऊ लागल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)