शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१४ हंगामी वसतिगृह होणार

By admin | Updated: November 8, 2014 22:36 IST

रोजगारासाठी दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरीत होणाऱ्या मजुरांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी गडचिरोली शिक्षण विभागाच्यावतीने यावर्षी जिल्ह्यात १४ हंगामी वसतिगृह स्थापन

प्रक्रिया सुरू : रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांच्या पाल्यांसाठीगडचिरोली : रोजगारासाठी दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरीत होणाऱ्या मजुरांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी गडचिरोली शिक्षण विभागाच्यावतीने यावर्षी जिल्ह्यात १४ हंगामी वसतिगृह स्थापन करण्यात येणार आहेत. सदर हंगामी वसतिगृह १५ नोव्हेंबरपासून सुरू केले जाणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नसल्याने येथील नागरिकांना रोजगारासाठी नेहमीच वनवन करावी लागते. जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेती हा व्यवसाय करीत असले तरी सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने केवळ खरीप हंगामाचेच पीक घेतले जाते. यातून जवळपास तीन महिने गावातच रोजगार मिळतो. उर्वरित ९ महिने मात्र रिकामे राहण्याची पाळी येते. रिकाम्या कालावधीत येथील बहुतांश मजूर व अल्पभूधारक शेतकरी मिळेल तो रोजगार करण्यासाठी परजिल्ह्यात जातात. रोजगारासाठी जातांना आपल्या मुलालाही सोबत घेऊन जातात. महिना दोन महिने दुसऱ्या गावी राहल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होते. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी बनली आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे विद्यार्थ्यांच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येत असून त्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करण्यात येत आहेत. स्थलांतरीत मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर शिक्षण विभागाने स्थलांतरीत मजुरांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या भागातील मजूर नेहमी स्थलांतरीत होतात, अशा भागात १४ वसतिगृह सुरू केले जाणार आहेत. या १४ वसतिगृहांची प्रवेश क्षमता ५३५ विद्यार्थी एवढी असून या वसतिगृहासाठी २१ लाख ९३ हजार ५०० रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या वसतिगृहांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपविण्यात आली आहे. सदर वसतिगृह सत्र संपेपर्यंत म्हणजेच ३० एप्रिल २०१५ पर्यंत चालविले जाणार आहेत. शिक्षण विभागाच्या या उपक्रमामुळे पालक वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात असून ही समस्या संपूर्ण जिल्हाभर कमी-जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे वसतिगृहांची संख्याही वाढवावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)