शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

१४ हंगामी वसतिगृह होणार

By admin | Updated: November 8, 2014 22:36 IST

रोजगारासाठी दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरीत होणाऱ्या मजुरांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी गडचिरोली शिक्षण विभागाच्यावतीने यावर्षी जिल्ह्यात १४ हंगामी वसतिगृह स्थापन

प्रक्रिया सुरू : रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांच्या पाल्यांसाठीगडचिरोली : रोजगारासाठी दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरीत होणाऱ्या मजुरांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी गडचिरोली शिक्षण विभागाच्यावतीने यावर्षी जिल्ह्यात १४ हंगामी वसतिगृह स्थापन करण्यात येणार आहेत. सदर हंगामी वसतिगृह १५ नोव्हेंबरपासून सुरू केले जाणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नसल्याने येथील नागरिकांना रोजगारासाठी नेहमीच वनवन करावी लागते. जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेती हा व्यवसाय करीत असले तरी सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने केवळ खरीप हंगामाचेच पीक घेतले जाते. यातून जवळपास तीन महिने गावातच रोजगार मिळतो. उर्वरित ९ महिने मात्र रिकामे राहण्याची पाळी येते. रिकाम्या कालावधीत येथील बहुतांश मजूर व अल्पभूधारक शेतकरी मिळेल तो रोजगार करण्यासाठी परजिल्ह्यात जातात. रोजगारासाठी जातांना आपल्या मुलालाही सोबत घेऊन जातात. महिना दोन महिने दुसऱ्या गावी राहल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होते. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी बनली आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे विद्यार्थ्यांच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येत असून त्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करण्यात येत आहेत. स्थलांतरीत मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर शिक्षण विभागाने स्थलांतरीत मजुरांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या भागातील मजूर नेहमी स्थलांतरीत होतात, अशा भागात १४ वसतिगृह सुरू केले जाणार आहेत. या १४ वसतिगृहांची प्रवेश क्षमता ५३५ विद्यार्थी एवढी असून या वसतिगृहासाठी २१ लाख ९३ हजार ५०० रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या वसतिगृहांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपविण्यात आली आहे. सदर वसतिगृह सत्र संपेपर्यंत म्हणजेच ३० एप्रिल २०१५ पर्यंत चालविले जाणार आहेत. शिक्षण विभागाच्या या उपक्रमामुळे पालक वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात असून ही समस्या संपूर्ण जिल्हाभर कमी-जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे वसतिगृहांची संख्याही वाढवावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)