शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

शांतीच्या मार्गाने दु:खाचे हरण होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:00 IST

बुद्धाने सांगितलेल्या शांतीच्या मार्गाचा अवलंब जीवन जगताना केल्यास दु:ख दूर होते. त्यामुळे प्रत्येकाने शांतीच्या मार्गाचा अवलंब करावा, असे प्रतिपादन भंते भगीरथ यांनी केले.

ठळक मुद्देभंते भगीरथ यांचे मार्गदर्शन : कोठरी येथे वर्षावास कार्यक्रमाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : बुद्धाने सांगितलेल्या शांतीच्या मार्गाचा अवलंब जीवन जगताना केल्यास दु:ख दूर होते. त्यामुळे प्रत्येकाने शांतीच्या मार्गाचा अवलंब करावा, असे प्रतिपादन भंते भगीरथ यांनी केले.घोट परिसरातील कोठरी येथे बौद्ध विहारात वर्षावास समारोप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या अरण्यवास समारोप सोहळ्याला भंते अनोमदसी, भंते धम्मरक्षीत, भदंत महाथेरो बुद्धघोष, भि. सुजाता आर्य आसेगाव पुरणा, भंते दीपकर, भंते धम्मपाल, भंते प्रज्ञानद, भंते शांतीज्योती, भंते सोनचारगाव, भंते शिलानंद आदी उपस्थित होते.पुढे बोलताना भंते भगीरथ म्हणाले, जन्माला येताच माणसाला तीन कारण उपस्थित होतात. त्यामुळे दु:ख निर्माण होते. जन्म हे दु:खाचे कारण आहे. म्हातारपण होण्यामुळेही दु:ख निर्माण होते तर मृत्यू हे त्यापेक्षाही अधिक दु:खाचे कारण आहे. राजा धार्मिक असला की, प्रजा धार्मिक होते. प्रजा धार्मिक झाली म्हणजे मध्यम व गरीब जनतासुद्धा धार्मिक होते. ज्या देशातील जनता धार्मिक राहते, त्या देशात समृद्धी नांदते. राजा, प्रजा व मध्यवर्गीय लोक अधार्मिक व भ्रष्टाचारी झाले तर देशाची हानी होते, असे मार्गदर्शन भंते भगीरथ यांनी केले.