शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

पूर नियंत्रणासाठी उपाययोजना नाही

By admin | Updated: July 12, 2014 01:12 IST

दरवर्षीचा पावसाळा भामरागडसाठी धोक्याची घंटाच वाजवित असतो. भामरागड गावासभोवताल असलेल्या नद्या व नाले भामरागडला ....

भामरागड : दरवर्षीचा पावसाळा भामरागडसाठी धोक्याची घंटाच वाजवित असतो. भामरागड गावासभोवताल असलेल्या नद्या व नाले भामरागडला पुराच्या काळात बेटाचे स्वरूप आणतात व वाहतूकही खंडीत होऊन जाते. यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यात शासनाला अजूनही यश आलेले नाही. भामरागड-आलापल्ली मार्गावर जुने व ठेंगणे रपटे आहे. दर पावसाळ्यात या रपट्यांवर पाणी चढते व हा मार्ग बंद होतो. ३५ हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्यातील पुलाचे काम करण्यात शासनाने उदासिनता दाखविली आहे. भामरागड गावाची वस्ती दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांनी येथे नव्या जागांवर घरे बांधलीत. नदी तिरावरही नागरी वस्ती झाली. दरवर्षी पर्लकोटा नदीचा पूर गावात शिरतो व विश्वेश्वरराव चौकापर्यंत पाणी येते. त्यामुळे नागरिकांना मोठे नुकसान सहन करावे लागते. २००७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पूल उंच करून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ही समस्या अजूनही सुटलेली नाही. गतवर्षी जिल्ह्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी पर्लकोटा नदीवरचा पूल उंच करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही या पुलाचे काम सुरू झालेले नाही. निविदाही काढण्यात आल्या, अशी माहिती देण्यात आली होती. परंतु याबाबत काहीही हालचाली नाहीत. भामरागड गावाचे योग्य जागी पुनर्वसन करण्याचाही एक प्रस्ताव होता. तो ही बासणात गुंडाळून आहे. भामरागड सभोवताल कुमरगुंडा, पेरमिली, बांडीया, चंद्रनाला, मेडपल्ली हे नाले आहेत. यांच्यावरचेही पूल ठेंगणे आहेत. त्यामुळे पेरमिली नाला भरला की, भामरागडचा संपर्क तुटतो. परंतु प्रशासनाची उपाययोजना मात्र थंडबस्त्यात आहे.पावसाळ्याच्या काळात मदत कार्यासाठी एक बोट दरवर्षी दिली जाते. गेल्या दोन-तीन वर्षात सततच्या पावसामुळे भामरागडचा पाच ते सात दिवस संपर्क तुटल्याच्या घटनाही घडल्या. बरेच वेळा पुराच्या काळात अधिकारीही येथे अडकून पडतात. पूर नियंत्रण रेषेच्या संदर्भात शासनाचे काही निकष आहे. मात्र भामरागडच्याबाबत हे सारे निकष धाब्यावर ठेवण्यात आले आहे. भामरागड गावाचे पुनर्वसन करून या नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचाही प्रस्ताव दुर्लक्षितच आहे. (तालुका प्रतिनिधी)