शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

पूर नियंत्रणासाठी उपाययोजना नाही

By admin | Updated: July 12, 2014 01:12 IST

दरवर्षीचा पावसाळा भामरागडसाठी धोक्याची घंटाच वाजवित असतो. भामरागड गावासभोवताल असलेल्या नद्या व नाले भामरागडला ....

भामरागड : दरवर्षीचा पावसाळा भामरागडसाठी धोक्याची घंटाच वाजवित असतो. भामरागड गावासभोवताल असलेल्या नद्या व नाले भामरागडला पुराच्या काळात बेटाचे स्वरूप आणतात व वाहतूकही खंडीत होऊन जाते. यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यात शासनाला अजूनही यश आलेले नाही. भामरागड-आलापल्ली मार्गावर जुने व ठेंगणे रपटे आहे. दर पावसाळ्यात या रपट्यांवर पाणी चढते व हा मार्ग बंद होतो. ३५ हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्यातील पुलाचे काम करण्यात शासनाने उदासिनता दाखविली आहे. भामरागड गावाची वस्ती दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांनी येथे नव्या जागांवर घरे बांधलीत. नदी तिरावरही नागरी वस्ती झाली. दरवर्षी पर्लकोटा नदीचा पूर गावात शिरतो व विश्वेश्वरराव चौकापर्यंत पाणी येते. त्यामुळे नागरिकांना मोठे नुकसान सहन करावे लागते. २००७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पूल उंच करून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ही समस्या अजूनही सुटलेली नाही. गतवर्षी जिल्ह्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी पर्लकोटा नदीवरचा पूल उंच करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही या पुलाचे काम सुरू झालेले नाही. निविदाही काढण्यात आल्या, अशी माहिती देण्यात आली होती. परंतु याबाबत काहीही हालचाली नाहीत. भामरागड गावाचे योग्य जागी पुनर्वसन करण्याचाही एक प्रस्ताव होता. तो ही बासणात गुंडाळून आहे. भामरागड सभोवताल कुमरगुंडा, पेरमिली, बांडीया, चंद्रनाला, मेडपल्ली हे नाले आहेत. यांच्यावरचेही पूल ठेंगणे आहेत. त्यामुळे पेरमिली नाला भरला की, भामरागडचा संपर्क तुटतो. परंतु प्रशासनाची उपाययोजना मात्र थंडबस्त्यात आहे.पावसाळ्याच्या काळात मदत कार्यासाठी एक बोट दरवर्षी दिली जाते. गेल्या दोन-तीन वर्षात सततच्या पावसामुळे भामरागडचा पाच ते सात दिवस संपर्क तुटल्याच्या घटनाही घडल्या. बरेच वेळा पुराच्या काळात अधिकारीही येथे अडकून पडतात. पूर नियंत्रण रेषेच्या संदर्भात शासनाचे काही निकष आहे. मात्र भामरागडच्याबाबत हे सारे निकष धाब्यावर ठेवण्यात आले आहे. भामरागड गावाचे पुनर्वसन करून या नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचाही प्रस्ताव दुर्लक्षितच आहे. (तालुका प्रतिनिधी)