शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

विहिरींच्या बोअरसाठी निधीची तरतूद नाही

By admin | Updated: July 28, 2014 23:31 IST

जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राची भरभराट होऊन शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी शासनस्तरावर अनेक योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. मात्र गडचिरोली जिल्हा परिषदेच्या पुनर्विनियोजन

गडचिरोली : जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राची भरभराट होऊन शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी शासनस्तरावर अनेक योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. मात्र गडचिरोली जिल्हा परिषदेच्या पुनर्विनियोजन अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी इनरवेल बोअरकरीता अनुदानाची मुळीच तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे सिंचन विहिरीच्या पाण्याची पातळी वाढविण्यास शेतकऱ्यांपुढे अडचण निर्माण झाली आहे. कृषी योजनांवर जि.प.च्या अर्थसंकल्पात निधीची पुरेशी तरतूद नसल्याने शेतकऱ्यांवर वक्रदृष्टी असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग व कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांच्या लाभासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. कृषी विभागाच्या सहकाऱ्यातून जिल्ह्यातील ३५ शेतकरी गटांनी यंदाच्या खरीप हंगामापासून यांत्रिकीकरणाची कास धरली आहे. कृषी विभागामार्फत ९० टक्के अनुदानावर शेतकरी गटांना भातरोवणीसाठी ५ यंत्र वितरित करण्यात आले आहे. यंत्राच्या माध्यमातून दुर्गम भागातील शेतकऱ्यांनीही भात रोवणीचे काम जोमात सुरू केले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने दोन वर्षापूर्वी शेतकऱ्यांना पीव्हीसी, एचडीपीई पाईप ५० टक्के अनुदानावर वाटप करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली होती. शेतकऱ्यांना शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी ५० टक्के अनुदानावर ताडपत्रांचे वाटप करण्याची योजनाही सुरू करण्यात आली होती. मात्र यंदाच्या जि.प.च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर ताडपत्रांचे वाटप करण्यासाठी केवळ १ हजार रूपयाची तरतूद केली असल्याचे दिसून येते. तसेच सिंचन विहिरीच्या इनरवेल बोअरकरीता काहीच तरतूद करण्यात आली नाही. तसेच पीव्हीसी व एचडीपीई पाईप वितरणाच्या योजनेसाठी पुनर्विनियोजन अर्थसंकल्प केवळ ५ लाख रूपयाची तरतूद करण्यात आली आहे. सदर तरतूद अत्यल्प असल्याने अनेक गरजू, गरीब शेतकरी पाईप मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात निधीची तरतूद नसल्याने यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर ताडपत्रीचे वितरणही करणे कठीण आहे. अर्थसंकल्पातील तरतूद पाहिल्यानंतर शेतकऱ्यांवर वक्रदृष्टी असल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)