शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

नगर पंचायतींसाठी डीपीडीसीत निधीची तरतूदच नाही

By admin | Updated: September 25, 2015 01:51 IST

जिल्हा नियोजन व विकास फंडातून नगरोत्थान निधी जिल्ह्यातील दोन नगर पालिकांना सध्या दिला जात आहे.

नगरोत्थान फंड : दहा नगर पंचायती अडचणीतगडचिरोली : जिल्हा नियोजन व विकास फंडातून नगरोत्थान निधी जिल्ह्यातील दोन नगर पालिकांना सध्या दिला जात आहे. नव्याने निर्माण झालेल्या दहा नगर पंचायतीकरिता अद्याप जिल्हा नियोजन व विकास समितीने निधीची तरतूद केली नसल्याने या नगर पंचायती अडचणीत आल्या आहे. याचा परिणाम थेट तालुकास्तरावरील गावांच्या विकासावर होत आहे. २६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा जिल्हा निर्माण करण्यात आला. त्यापूर्वी १ मे १९६० पासून देसाईगंज ही नगर पालिका अस्तित्वात होती व जिल्हा निर्मितीनंतर गडचिरोली नगर पालिका अस्तित्वात आली. या नगर पालिकांना नगरोत्थान निधी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून दरवर्षी ८ कोटी ५० लाख रूपये उपलब्ध करून दिला जातो. यामध्ये देसाईगंजला ४.२५ तर गडचिरोलीला ४.२५ कोटी रूपये मिळतात. राज्य सरकारने १ मे २०१५ ला गडचिरोली जिल्ह्यात तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या दहा ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा प्रदान केला आहे. पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही जिल्हा नियोजन समितीने नगर पंचायतीसाठी स्वतंत्र विकास निधीची तरतूद केलेली नाही. आता जिल्ह्यात दोन नगर परिषदसह दहा नगर पंचायती निर्माण झाल्याने नगरोत्थान निधी १०० कोटी रूपये करणे आवश्यक आहे. परंतु पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी या संदर्भात अजुनपर्यंत निर्णय केलेला नाही. त्यामुळे त्यामुळे नगर पंचायतीच्या विकासकामांवर याचा परिणाम होत आहे. अनेक नगर पंचायती स्वच्छता, नाली उपसा, तसेच गावातील विकास कामे करण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे दहा नगर पंचायतीच्या निर्मितीनंतर आता नगरोत्थान फंड वाढविण्याची गरज असल्याचे मत ग्रामीण भागातील नागरिकांनी व्यक्त केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)डीपीडीसीच्या फंडात वाढ करा- जेसा मोटवानीगडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज व गडचिरोली नगर पालिका अस्तित्वात असताना ८ कोटी ५० लाख रूपये निधी मिळत होता. यातील सव्वाचार कोटी निधी प्रत्येक पालिकेला मिळत असे. परंतु आता नगर पंचायतीची निर्मिती झाल्याने त्यांच्यासाठी पालकमंत्र्यांनी डीपीडीसीच्या निधीत वाढ करावी, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते व देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातूनही केली आहे. या माध्यमातून नगर पंचायतीला निधी उपलब्ध न झाल्यास तालुका मुख्यालयातील या गावांचा विकास करणे शक्य होणार नाही, असेही मोटवानी यांनी या निवेदनात म्हटले आहे.