शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

‘ग्रामवन’साठी वनविभागाचा दबाव नाही

By admin | Updated: September 4, 2014 23:47 IST

भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २८ मधील तरतुदीनुसार जी वने संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना संयुक्त वनव्यवस्थापनाकरीता देण्यात आली आहे. अशी वने ‘ग्रामवन’ म्हणून अभिहस्तांकित

गडचिरोली : भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २८ मधील तरतुदीनुसार जी वने संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना संयुक्त वनव्यवस्थापनाकरीता देण्यात आली आहे. अशी वने ‘ग्रामवन’ म्हणून अभिहस्तांकित करण्यास महसूल व वनविभागाला मान्यता मिळाली आहे. या अनुषंगाने वनविभागाने कार्यवाही सुरू केली आहे. मात्र काही अशासकीय संस्था गावकऱ्यांवर ठराव पारित न करण्याबाबत गैरसमज निर्माण करीत आहेत. ग्रामवनासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर होणे आवश्यक आहे. ग्रामवन हे गावकऱ्यांच्या इच्छेवर अवलंबून असून ग्रामवन घोषीत करण्यासाठी वनविभाग गावकऱ्यांवर दबाव टाकू शकत नाही, अशी माहिती गडचिरोली वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी अण्णाबत्तुला यांनी गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माहिती देताना श्रीलक्ष्मी अण्णाबत्तुला म्हणाल्या, गावांना हक्क मिळवून देण्याकरीता वनविभागाने पुढाकार घेतला असून ग्रामवनासाठी वनकर्मचारी प्रत्येक गावात जाऊन लोकांना माहिती देत आहेत. ग्रामवन नियम लागू करण्याकरीता ग्रामसभेत जोपर्यंत ठराव मंजूर होत नाही तोपर्यंत ग्रामवन घोषीत करता येत नाही. तसेच या अनुषंगाने पुढील १० वर्षाचा सुक्ष्म आराखडा तयार करण्याची प्रक्रियाही करता येत नाही, असेही श्रीलक्ष्मी अण्णाबत्तुला यांनी यावेळी सांगितले. ग्रामसभेत ठराव घेऊनच ‘ग्रामवन’ व्यवस्थापन समिती तयार करण्याची कारवाई वनविभागाला करता येणे शक्य आहे. ग्रामसभेत ठराव मंजूर झाल्यास शासन निर्णयाप्रमाणे शुन्य अतिक्रमण, नैसर्गिक पुनरूत्पादनात वाढ, आगीच्या क्षेत्राचे प्रमाण ५ टक्क्यापेक्षा कमी, वनीकरणातील जीवंत रोपांचे प्रमाण ६० टक्क्यापर्यंत कमी, चराई बंदी, कुऱ्हाड बंदी आदींची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अटीवरच ग्रामवन घोषीत करता येते, असे शासन निर्णयात नमूद आहे. या अटीपैकी कमीतकमी ३ अटी पूर्ण करीत असलेल्या गावानाच ग्रामवन म्हणून घोषीत केले जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामवन घोषीत करण्यासाठी काही दिवसापूर्वी वनविभागाच्यावतीने वनकर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. ग्रामवनाची संकल्पना राबविणारा गडचिरोली जिल्हा हा देशात पहिला जिल्हा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)