फाेटाे...पक्क्या रस्त्याच्या प्रतीक्षेत असलेले आंबेझरा गाव.
व्येंकटापूर : अहेरी तालुक्याच्या अतिदुर्गम भागात वसलेल्या अंबेझरा गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने पायवाटेनेच नागरिकांना प्रवास करावा लागताे. येथे मूलभूत साेयी-सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे गावाचा विकास अद्यापही झाला नाही. मात्र, समस्या साेडविण्याकडे दुर्लक्ष हाेत आहे.
अहेरी तालुका मुख्यालयापासून ३५ कि.मी. अंतरावर अंबेझरा हे गाव आहे. आवलमरी ग्रामपंचायतमध्ये या गावाचा समावेश आहे. आवलमरीपासून अंबेझरापर्यंतचे अंतर १२ कि.मी. आहे. चारही बाजूने जंगल व डाेंगरांचा वेढा आहे. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. रस्त्यांअभावी गावात बैलगाडीशिवाय माेठी वाहने जात नाही. शासन-प्रशासनाचे कायमच दुर्लक्ष या गावाकडे राहिले आहे. गावातील मुख्य व्यवसाय शेती आहे. गावापासून १२ ते १५ कि.मी. अंतरापर्यंत पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात चिखलातूनच वाट काढावी लागते. त्यामुळे व्यक्ती आजारी पडल्यास व त्याला रुग्णालयात भरती करण्याची वेळ आल्यास खूप अडचणी येतात. शेती व्यवसाय मुख्य असतानाही येथे सिंचनाच्या सुविधांचा अभाव आहे. पावसाच्या पाण्यावरच नागरिकांना शेती करावी लागते. अनेकदा नापिकी व दुष्काळाचा सामना शेेतकऱ्यांना करावा लागताे. याशिवाय येथे आराेग्य उपकेंद्र, अंगणवाडी नाही. केवळ प्राथमिक शाळा आहे. साेयी-सुविधांसाठी लाेकप्रतिनिधी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स
साैरदिवे नाममात्र, वीजपुरवठ्याची प्रतीक्षा
अंबेझरा गावात अद्यापही वीजपुरवठा झाला नाही. प्रकाशासाठी गावात साैरदिवे लावण्यात आलेले आहेत; परंतु साैरदिवे नाममात्र ठरत आहेत. ते केवळ शाेभेची वस्तू म्हणून उभे आहेत. गावात माेबाईल कव्हरेज पाेहाेचत नसल्याने अनेकांनी खरेदी केलेले माेबाईल केवळ गाणी वाजविण्याच्या कामात येत आहेत. कसेबसे साैरऊर्जेवर नागरिक माेबाईल बॅटऱ्या चार्ज करतात. विशेष म्हणजे, या भागात वाघाचा वावर आहे. त्यामुळे नवीन साैरदिवे लावावे किंवा वीजपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.