शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

परवानगीशिवाय वीज जोडणीचे प्रमाणपत्र नाही

By admin | Updated: January 23, 2016 01:33 IST

जे नागरिक घर बांधकामाची नगर परिषदेकडून परवानगी घेत नाही, अशा नागरिकांना वीज जोडणीसाठी परवानगी द्यायची नाही, ...

नगर परिषद प्रशासनाचा निर्णय : दोन महिन्यात ५० वर प्रस्ताव प्रलंबितगडचिरोली : जे नागरिक घर बांधकामाची नगर परिषदेकडून परवानगी घेत नाही, अशा नागरिकांना वीज जोडणीसाठी परवानगी द्यायची नाही, असा निर्णय प्रशासनाने घेत याची कडक अंमलबजावणी सुरू झाली असल्याने मागील चार महिन्यात ५० पेक्षा अधिक अर्ज नगर परिषदेच्या कार्यालयात पडून आहेत. त्यामुळे परवानगी न घेता बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नियमानुसार नगर परिषद क्षेत्रात घराचे बांधकाम करण्याच्या पूर्वी नगर परिषदेकडे रितसर परवानगी मागणे आवश्यक आहे. नगर परिषदेकडे परवानगी मागितल्यानंतर नगर परिषद प्रशासन संबंधित व्यक्तीला घर बांधकामाची परवानगी देताना कर आकारते. या माध्यमातून नगर परिषदेला उत्पन्न प्राप्त होते. मात्र काही नागरिक कराचे पैसे वाचविण्यासाठी नगर परिषदेची परवानगी न घेताच घराचे बांधकाम करीत आहेत. यामुळे दरवर्षी नगर परिषदेला लाखो रूपयांच्या करावर पाणी सोडावे लागत आहे. त्याचबरोबर काही नागरिक नियमानुसार घर बांधकाम सुध्दा करीत नाही. परिणामी भविष्यात नगर परिषदेलाच अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी नगर परिषद प्रशासनाने जे नागरिक घर बांधकामाची परवानगी मागणार नाही, त्यांना वीज जोडणीचे नाहरकत प्रमाणपत्रच द्यायचे नाही, असा निर्णय घेतला आहे व याची कडक अंमलबजावणी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मागील चार महिन्यांत जवळपास ३०० नागरिकांनी वीज जोडणीसाठी अर्ज केला होता. त्यातील ५० नागरिकांनी घर बांधकामाची परवानगीच न घेतल्याचे आढळून आले आहे. त्यांना वीज जोडणीसाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे परवानगी न घेता अवैध बांधकाम करणाऱ्यांची गोची झाली आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)गडचिरोली शहरातील जुन्या वस्तीत २० वर्षांपेक्षा अधिक कालावधीची घरे आहेत. अशा घरांना मात्र यातून सूट देण्यात आली आहे. अशा घरांसाठी वीज जोडणी आवश्यक असल्यास त्यांना परवानगी दिली जात आहे. मात्र मागील दोन वर्षात ज्या नागरिकांनी परवानगी न घेता बांधकाम केले आहे, त्यांना वीज जोडणी नाहरकत प्रमाणपत्र देणे बंद केले आहे. नगर परिषदेच्या या निर्णयामुळे परवानगी न घेता घराचे बांधकाम करणाऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. मात्र याचा एक सकारात्मक परिणाम म्हजणे, प्रत्येकच नागरिक परवानगी घेऊन बांधकाम करणार आहे.