शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST

गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात कोरोना रूग्णांसाठी स्वतंत्र वार्ड सुरू करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार विविध विभागांना कोरोना प्रतिबंधात्मक कामांचे वाटप करण्यात आले आहे. परदेशी व्यक्ती गडचिरोली जिल्ह्यात येत असेल तर त्याची माहिती पोलीस ठेवणार आहेत. सोशल मीडियावर व अन्य मार्गाने अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

ठळक मुद्देप्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू : जिल्हा प्रशासनाची माहिती; आपत्ती व्यपस्थापन कायदा २००५ लागू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाबाबत जिल्ह्यात सर्व प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू केला आहे. देशाबाहेरून आलेला व्यक्ती, कोरोनाबाधीत राज्य अथवा शहरातून आलेला व्यक्ती याबाबतची माहिती प्रशासनाला उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे. तसेच गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे.गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात कोरोना रूग्णांसाठी स्वतंत्र वार्ड सुरू करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार विविध विभागांना कोरोना प्रतिबंधात्मक कामांचे वाटप करण्यात आले आहे. परदेशी व्यक्ती गडचिरोली जिल्ह्यात येत असेल तर त्याची माहिती पोलीस ठेवणार आहेत. सोशल मीडियावर व अन्य मार्गाने अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. गर्दीच्या ठिकाणांवर प्रतिबंध घातला जाईल. घरोघरी जाऊन संशयीत व्यक्तींची तपासणी केली जाईल. आदी बाबींचा प्रतिबंधात्मक उपायांमध्ये समावेश आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाला औषध, मास्क, सॅनेटायझर यांचा पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. औषधांविषयी नागरिकांना अचूक माहिती द्यावी. तसेच औषधांचा साठा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करून कोरोनाबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. खासगी डॉक्टरांना वैद्यकीय साधने, मनुष्यबळ, बेड आदींची कमतरता भासल्यास त्याही उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.अफवांवर विश्वास ठेवू नयेसोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. अफवा पसरविणाºयांवर कारवाई केली जाईल. सॅनेटायझर तसेच मास्कसाठी फारसे आग्रही न राहता साबनाने हात स्वच्छ धुवावे. सामान्य नागरिकांना मास्क वापरणे गरजेचे नाही. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेवर लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे.कोरोनाबाबत जिल्हाभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळणे हा एकमेव उपाय आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांना मंजुरी देऊ नये, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.इतरही गावांनी निर्णय घेण्याची गरजजिल्ह्यात अनेक मोठ्या गावांमध्ये व तालुकास्थळी आठवडी बाजार भरतात. या ठिकाणी मोठी गर्दी उसळते. इतर गावांनीही बाजार बद ठेवण्याचा निर्णय घेण्याची गरज आहे. गडचिरोलीत१५ मार्च रोजी रविवारी आठवडी बाजार भरला. या बाजारात गडचिरोली शहरातील नागरिकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे दिसून येत होते. काही नागरिक तोंडाला मास्क घालून बाजारात जात होते.सिरोंचाचा आठवडी बाजार बंदगर्दी टाळण्यासाठी सिरोंचा येथे दर सोमवारी भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आला असल्याचे नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांनी कळविले आहे. सिरोंचा येथील आठवडी बाजारात ग्रामीण भागातील हजारो नागरिक भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी येतात. त्यामुळे बाजारात मोठी गर्दी उसळते. या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दर सोमवारी भरणारा आठवडी बाजार पुढील काही कालावधीसाठी रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आठवडी बाजार बंद करणारी सिरोंचा ही जिल्ह्यातील पहिली नगर पंचायत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना