शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

नद्या, कालव्यांचे पाणी उशाशी तरीही पिकांच्या काेरड घशाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 05:00 IST

ऊर्जामंत्र्यांनी कृषिपंपांना दिवसातून केवळ आठच तास वीजपुरवठा केला जाईल, असा आदेश काढला. या आदेशामुळे शेतकऱ्यांचे नियाेजन बिघडले. आठ तासच जर वीज असेल तर पूर्ण शेतीला उन्हाळ्यात पाणी देणे शक्य हाेणार नाही. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी पऱ्हे टाकल्याच्या तुलनेत केवळ अर्ध्याच जागेवर धानाची लागवड केली. मात्र आता राेवलेले धानही वाचविणे कठीण झाले आहे. सिंचन हाेत नसल्याने पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. 

अरविंद घुटकेलाेकमत न्यूज नेटवर्कमोहटोला (किन्हाळा) : देसाईगंजच्या पूर्वेकडील भागात भाजीपाला व रब्बी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. ही सर्व पिके फक्त विद्युत पंपाच्या भरोशावरच घेतली जातात. परंतु शासनाने भारनियमन लागू केले आहे. परिणामी पुरसे पाणी देणे शक्य नसल्याने पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी तीव्र असंताेष निर्माण झाला आहे.भाजीपाला पिकांची नुकतीच लागवड झाली हाेती, तर काही शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले हाेते. दरम्यान, ऊर्जामंत्र्यांनी कृषिपंपांना दिवसातून केवळ आठच तास वीजपुरवठा केला जाईल, असा आदेश काढला. या आदेशामुळे शेतकऱ्यांचे नियाेजन बिघडले. आठ तासच जर वीज असेल तर पूर्ण शेतीला उन्हाळ्यात पाणी देणे शक्य हाेणार नाही. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी पऱ्हे टाकल्याच्या तुलनेत केवळ अर्ध्याच जागेवर धानाची लागवड केली. मात्र आता राेवलेले धानही वाचविणे कठीण झाले आहे. सिंचन हाेत नसल्याने पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. एक आठवडा दिवसा, तर दुसऱ्या आठवड्यात रात्री विद्युत देणे सुरू असल्याने रात्री-बेरात्री बांधावर जावून पाणी करणे अनेकांच्या जीवावर येत आहे. मजुरांची वाणवा असल्याने काही शेतकरी पत्नीसह रात्र जागून पिकांना पाणी देत आहेत. यात फार मोठा धोका होण्याची संभावना शेतकरी बोलून दाखवित आहेत. कारण या भागात जंगली श्वापदांचा वावर असल्याने जीवास धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे शासनाने लक्ष देऊन भारनियम बंद करण्याची मागणी हाेत आहे.

अनेकांची वीज कापली -    कृषिपंपाचे वीजबिल भरले नाही. या कारणास्तव अनेकांची वीज कापण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांवर २० ते ४० हजार रुपयांचे वीजबिल थकित आहे. पीक निघाले असते तर हे बिल भरणे शक्य झाले असते, मात्र आता वीजच नसल्याने पीक करपत चालले आहे. झालेला खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. पीक करपल्यास वीजबिल भरणार कसे? असा प्रश्न आहे.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प