शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

नद्या, कालव्यांचे पाणी उशाशी तरीही पिकांच्या काेरड घशाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 05:00 IST

ऊर्जामंत्र्यांनी कृषिपंपांना दिवसातून केवळ आठच तास वीजपुरवठा केला जाईल, असा आदेश काढला. या आदेशामुळे शेतकऱ्यांचे नियाेजन बिघडले. आठ तासच जर वीज असेल तर पूर्ण शेतीला उन्हाळ्यात पाणी देणे शक्य हाेणार नाही. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी पऱ्हे टाकल्याच्या तुलनेत केवळ अर्ध्याच जागेवर धानाची लागवड केली. मात्र आता राेवलेले धानही वाचविणे कठीण झाले आहे. सिंचन हाेत नसल्याने पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. 

अरविंद घुटकेलाेकमत न्यूज नेटवर्कमोहटोला (किन्हाळा) : देसाईगंजच्या पूर्वेकडील भागात भाजीपाला व रब्बी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. ही सर्व पिके फक्त विद्युत पंपाच्या भरोशावरच घेतली जातात. परंतु शासनाने भारनियमन लागू केले आहे. परिणामी पुरसे पाणी देणे शक्य नसल्याने पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी तीव्र असंताेष निर्माण झाला आहे.भाजीपाला पिकांची नुकतीच लागवड झाली हाेती, तर काही शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले हाेते. दरम्यान, ऊर्जामंत्र्यांनी कृषिपंपांना दिवसातून केवळ आठच तास वीजपुरवठा केला जाईल, असा आदेश काढला. या आदेशामुळे शेतकऱ्यांचे नियाेजन बिघडले. आठ तासच जर वीज असेल तर पूर्ण शेतीला उन्हाळ्यात पाणी देणे शक्य हाेणार नाही. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी पऱ्हे टाकल्याच्या तुलनेत केवळ अर्ध्याच जागेवर धानाची लागवड केली. मात्र आता राेवलेले धानही वाचविणे कठीण झाले आहे. सिंचन हाेत नसल्याने पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. एक आठवडा दिवसा, तर दुसऱ्या आठवड्यात रात्री विद्युत देणे सुरू असल्याने रात्री-बेरात्री बांधावर जावून पाणी करणे अनेकांच्या जीवावर येत आहे. मजुरांची वाणवा असल्याने काही शेतकरी पत्नीसह रात्र जागून पिकांना पाणी देत आहेत. यात फार मोठा धोका होण्याची संभावना शेतकरी बोलून दाखवित आहेत. कारण या भागात जंगली श्वापदांचा वावर असल्याने जीवास धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे शासनाने लक्ष देऊन भारनियम बंद करण्याची मागणी हाेत आहे.

अनेकांची वीज कापली -    कृषिपंपाचे वीजबिल भरले नाही. या कारणास्तव अनेकांची वीज कापण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांवर २० ते ४० हजार रुपयांचे वीजबिल थकित आहे. पीक निघाले असते तर हे बिल भरणे शक्य झाले असते, मात्र आता वीजच नसल्याने पीक करपत चालले आहे. झालेला खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. पीक करपल्यास वीजबिल भरणार कसे? असा प्रश्न आहे.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प