शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘वाघ येत आहे, आम्ही मरतो’, महिला पळाल्या अन् ताराबाईच ठरली बळी !

By गेापाल लाजुरकर | Updated: October 19, 2023 16:52 IST

धान कापताना हल्ला : रामाळा-वैरागड मार्गालगच्या शेतातील घटना

गडचिरोली : ‘जंगलातून शेताच्या पाळीने वाघ येत आहे. हा वाघ आपल्याला ठार करेल’ असे महिला मजुरांना ताराबाईने ओरडून सांगितले. तेव्हा इतर महिलांनी जिवाच्या आकांताने बांधीतून पळ काढला अन् वाघाने ताराबाईवरच झडप घालून तिला ठार केले. ही थरारक घटना आरमोरी तालुक्याच्या रामाळा-वैरागड मार्गालगत एका शेतात गुरूवार १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास घडली.

ताराबाई एकनाथ धोडरे (वय ६०) रा. काळागोटा (आरमोरी) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. आरमोरी तालुक्याच्या रामाळा-वैरागड जंगल परिसरात मागील २० दिवसांपासून तीन वाघांचा मुक्त संचार आहे. तिन्ही वाघ दिवस-रात्र रस्त्याच्या कडेला, शेतशिवारात फिरत असतात. सध्या धान कापणीचा हंगाम सुरू झाला आहे. रामाळा येथील अमोल धोडरे यांच्या शेतात गेल्या चार दिवसांपासून धान कापणीचे काम सुरू आहे. रोजच्याप्रमाणे गुरूवारी शेतात सहा महिला धान कापणीचे काम करत होत्या. ताराबाई ही बांधीच्या पाळीलगत होती.

शेताच्या काही अंतरावर असलेल्या जंगलाच्या झुडपात दडून बसलेला वाघ महिलांच्या दिशेने येऊ लागला. ताराबाईने वाघाला पाहिले व ती ‘वाघ येत आहे, आम्ही मरतो’ अशी जोरात ओरडली. क्षणाचाही विलंब न करता इतर पाच महिलांनी बांधीतून पळ काढला; परंतु ताराबाई ही वयस्क असल्याने ती जास्त धावू शकली नाही. वाघाने ताराबाईवर झडप घातली व तिला जंगलाच्या दिशेने १०० मीटरपर्यंत फरफटत नेत तिला ठार केले. 

घटनेची माहिती मिळताच लोकांनी गर्दी झाली. त्यानंतर वडसा वन विभागाचे सहायक वनसंरक्षक संदीप भारती, परिविक्षाधीन वन परिक्षेत्र अधिकारी पवनकुमार जोंग, वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, क्षेत्रसहायक राजेंद्र कुंभारे व वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केला. ताराबाई धोडरे यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली आहेत.

वर्षभरानंतर आरमोरी वनक्षेत्रातील दुसरी घटना

आरमोरी वन परिक्षेत्रात वर्षभरापूर्वी वाघाच्या हल्ल्यात रामाळा येथीलच एका व्यक्तीचा याच हंगामात मृत्यू झाला होता. धान बांधणीसाठी सिंध आणायला गेलेला व्यक्ती वाघाचा बळी ठरला होता. वर्षभरानंतर वाघाच्या हल्ल्यात महिला ठार होण्याची ही दुसरी घटना आहे.

... तर वाचला असता जीव

वाघ दिसताच ताराबाई ओरडली. तेव्हा सर्व महिलांनी आरडाओरड जर केली असती तर वाघ पळून गेला असता; परंतु इतर पाच महिलांनी बांधीतून पळ काढल्याने ताराबाई एकटी पडली व तिला वाघाने ठार केले. एकजुटीतून वाघाला पळवून लावता येऊ शकत हाेते. मागील वर्षी चामोर्शी तालुक्याच्या एका गावातील एकट्या महिलेने विळ्याच्या भरवशावर वाघाचा समोरासमोर प्रतिकार करून त्याला पळवून लावले होते.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यूGadchiroliगडचिरोली