शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

‘वाघ येत आहे, आम्ही मरतो’, महिला पळाल्या अन् ताराबाईच ठरली बळी !

By गेापाल लाजुरकर | Updated: October 19, 2023 16:52 IST

धान कापताना हल्ला : रामाळा-वैरागड मार्गालगच्या शेतातील घटना

गडचिरोली : ‘जंगलातून शेताच्या पाळीने वाघ येत आहे. हा वाघ आपल्याला ठार करेल’ असे महिला मजुरांना ताराबाईने ओरडून सांगितले. तेव्हा इतर महिलांनी जिवाच्या आकांताने बांधीतून पळ काढला अन् वाघाने ताराबाईवरच झडप घालून तिला ठार केले. ही थरारक घटना आरमोरी तालुक्याच्या रामाळा-वैरागड मार्गालगत एका शेतात गुरूवार १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास घडली.

ताराबाई एकनाथ धोडरे (वय ६०) रा. काळागोटा (आरमोरी) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. आरमोरी तालुक्याच्या रामाळा-वैरागड जंगल परिसरात मागील २० दिवसांपासून तीन वाघांचा मुक्त संचार आहे. तिन्ही वाघ दिवस-रात्र रस्त्याच्या कडेला, शेतशिवारात फिरत असतात. सध्या धान कापणीचा हंगाम सुरू झाला आहे. रामाळा येथील अमोल धोडरे यांच्या शेतात गेल्या चार दिवसांपासून धान कापणीचे काम सुरू आहे. रोजच्याप्रमाणे गुरूवारी शेतात सहा महिला धान कापणीचे काम करत होत्या. ताराबाई ही बांधीच्या पाळीलगत होती.

शेताच्या काही अंतरावर असलेल्या जंगलाच्या झुडपात दडून बसलेला वाघ महिलांच्या दिशेने येऊ लागला. ताराबाईने वाघाला पाहिले व ती ‘वाघ येत आहे, आम्ही मरतो’ अशी जोरात ओरडली. क्षणाचाही विलंब न करता इतर पाच महिलांनी बांधीतून पळ काढला; परंतु ताराबाई ही वयस्क असल्याने ती जास्त धावू शकली नाही. वाघाने ताराबाईवर झडप घातली व तिला जंगलाच्या दिशेने १०० मीटरपर्यंत फरफटत नेत तिला ठार केले. 

घटनेची माहिती मिळताच लोकांनी गर्दी झाली. त्यानंतर वडसा वन विभागाचे सहायक वनसंरक्षक संदीप भारती, परिविक्षाधीन वन परिक्षेत्र अधिकारी पवनकुमार जोंग, वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, क्षेत्रसहायक राजेंद्र कुंभारे व वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केला. ताराबाई धोडरे यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली आहेत.

वर्षभरानंतर आरमोरी वनक्षेत्रातील दुसरी घटना

आरमोरी वन परिक्षेत्रात वर्षभरापूर्वी वाघाच्या हल्ल्यात रामाळा येथीलच एका व्यक्तीचा याच हंगामात मृत्यू झाला होता. धान बांधणीसाठी सिंध आणायला गेलेला व्यक्ती वाघाचा बळी ठरला होता. वर्षभरानंतर वाघाच्या हल्ल्यात महिला ठार होण्याची ही दुसरी घटना आहे.

... तर वाचला असता जीव

वाघ दिसताच ताराबाई ओरडली. तेव्हा सर्व महिलांनी आरडाओरड जर केली असती तर वाघ पळून गेला असता; परंतु इतर पाच महिलांनी बांधीतून पळ काढल्याने ताराबाई एकटी पडली व तिला वाघाने ठार केले. एकजुटीतून वाघाला पळवून लावता येऊ शकत हाेते. मागील वर्षी चामोर्शी तालुक्याच्या एका गावातील एकट्या महिलेने विळ्याच्या भरवशावर वाघाचा समोरासमोर प्रतिकार करून त्याला पळवून लावले होते.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यूGadchiroliगडचिरोली