शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘वाघ येत आहे, आम्ही मरतो’, महिला पळाल्या अन् ताराबाईच ठरली बळी !

By गेापाल लाजुरकर | Updated: October 19, 2023 16:52 IST

धान कापताना हल्ला : रामाळा-वैरागड मार्गालगच्या शेतातील घटना

गडचिरोली : ‘जंगलातून शेताच्या पाळीने वाघ येत आहे. हा वाघ आपल्याला ठार करेल’ असे महिला मजुरांना ताराबाईने ओरडून सांगितले. तेव्हा इतर महिलांनी जिवाच्या आकांताने बांधीतून पळ काढला अन् वाघाने ताराबाईवरच झडप घालून तिला ठार केले. ही थरारक घटना आरमोरी तालुक्याच्या रामाळा-वैरागड मार्गालगत एका शेतात गुरूवार १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास घडली.

ताराबाई एकनाथ धोडरे (वय ६०) रा. काळागोटा (आरमोरी) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. आरमोरी तालुक्याच्या रामाळा-वैरागड जंगल परिसरात मागील २० दिवसांपासून तीन वाघांचा मुक्त संचार आहे. तिन्ही वाघ दिवस-रात्र रस्त्याच्या कडेला, शेतशिवारात फिरत असतात. सध्या धान कापणीचा हंगाम सुरू झाला आहे. रामाळा येथील अमोल धोडरे यांच्या शेतात गेल्या चार दिवसांपासून धान कापणीचे काम सुरू आहे. रोजच्याप्रमाणे गुरूवारी शेतात सहा महिला धान कापणीचे काम करत होत्या. ताराबाई ही बांधीच्या पाळीलगत होती.

शेताच्या काही अंतरावर असलेल्या जंगलाच्या झुडपात दडून बसलेला वाघ महिलांच्या दिशेने येऊ लागला. ताराबाईने वाघाला पाहिले व ती ‘वाघ येत आहे, आम्ही मरतो’ अशी जोरात ओरडली. क्षणाचाही विलंब न करता इतर पाच महिलांनी बांधीतून पळ काढला; परंतु ताराबाई ही वयस्क असल्याने ती जास्त धावू शकली नाही. वाघाने ताराबाईवर झडप घातली व तिला जंगलाच्या दिशेने १०० मीटरपर्यंत फरफटत नेत तिला ठार केले. 

घटनेची माहिती मिळताच लोकांनी गर्दी झाली. त्यानंतर वडसा वन विभागाचे सहायक वनसंरक्षक संदीप भारती, परिविक्षाधीन वन परिक्षेत्र अधिकारी पवनकुमार जोंग, वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, क्षेत्रसहायक राजेंद्र कुंभारे व वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केला. ताराबाई धोडरे यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली आहेत.

वर्षभरानंतर आरमोरी वनक्षेत्रातील दुसरी घटना

आरमोरी वन परिक्षेत्रात वर्षभरापूर्वी वाघाच्या हल्ल्यात रामाळा येथीलच एका व्यक्तीचा याच हंगामात मृत्यू झाला होता. धान बांधणीसाठी सिंध आणायला गेलेला व्यक्ती वाघाचा बळी ठरला होता. वर्षभरानंतर वाघाच्या हल्ल्यात महिला ठार होण्याची ही दुसरी घटना आहे.

... तर वाचला असता जीव

वाघ दिसताच ताराबाई ओरडली. तेव्हा सर्व महिलांनी आरडाओरड जर केली असती तर वाघ पळून गेला असता; परंतु इतर पाच महिलांनी बांधीतून पळ काढल्याने ताराबाई एकटी पडली व तिला वाघाने ठार केले. एकजुटीतून वाघाला पळवून लावता येऊ शकत हाेते. मागील वर्षी चामोर्शी तालुक्याच्या एका गावातील एकट्या महिलेने विळ्याच्या भरवशावर वाघाचा समोरासमोर प्रतिकार करून त्याला पळवून लावले होते.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यूGadchiroliगडचिरोली