शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

सीटी-1 नावाची दहशत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2022 23:19 IST

सीटी-१ या वाघाने गडचिरोली जिल्ह्यात सहा मानवी शिकार केल्या आहेत. त्यात पहिली शिकार वडसा वनपरिक्षेत्रात १४ एप्रिल रोजी, दुसरी याच क्षेत्रात ३ मे रोजी, तिसरी आरमोरी क्षेत्रात १६ जून रोजी, त्यानंतर २६ आणि २९ जूनला पोर्ला क्षेत्रात, तर ८ सप्टेंबरला वडसा वनपरिक्षेत्रात शिकार केली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा लाखांदूरकडे वळविला होता. पुन्हा तो वडसा क्षेत्रात आला होता. पण पुढील मानवी शिकार होण्याआधीच तो वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज/आरमोरी : गेल्या दहा महिन्यांपासून पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत आपली दहशत निर्माण करत १३ लोकांच्या अकाली मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सीटी-१ या वाघाला पकडण्यात यश आल्याने त्याच्या नावाची दहशत अखेर संपली. असे असले तरी टी-६ या नरभक्षी वाघिणीसह इतर वाघांचे अस्तित्व कायम असल्यामुळे नागरिकांना यापुढेही योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे राहणार आहे.  मूळच्या चंद्रपूर जिल्ह्यातून आलेल्या सीटी-१ वाघाचे हल्ले गेल्या काही दिवसात वाढले होते. त्यामुळे त्याला जेरबंद करण्यासाठी  तिन्ही जिल्ह्यात विविध ठिकाणांहून बोलविलेल्या रेस्क्यू टीमला तो हुलकावणी देत होता.  वाघाला जेरबंद करण्यासाठी अनेकदा बेट लावून सापळे रचण्यात आले होते; मात्र तो एका ठिकाणी स्थिर राहात नसल्याने  वनविभागाने लावलेल्या जाळ्यात तो अडकत नव्हता. जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून वनविभागाचे अधिकारी व  कर्मचारी त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. ज्या भागात हा वाघ जात होता त्या भागातील जवळपासच्या गावात जाऊन वनविभागाचे कर्मचारी लोकांना जंगलात न जाण्याविषयी सांगत होते, मुणारी देत होते. वडसा वनविभागातील आरमोरी, पोराला व वडसा या तिन्ही वनपरिक्षेत्रात या वाघाने हल्ले करून सहा जणांचा बळी घेतला. मात्र  कित्येकदा शिकार केलेल्या ठिकाणी सापळा रचूनही तो जाळ्यात अडकत नव्हता. त्यामुळे सदर वाघाने वनविभागाची झोप उडविली होती.

अशा केल्या सीटी-१ने सहा मानवी शिकारसीटी-१ या वाघाने गडचिरोली जिल्ह्यात सहा मानवी शिकार केल्या आहेत. त्यात पहिली शिकार वडसा वनपरिक्षेत्रात १४ एप्रिल रोजी, दुसरी याच क्षेत्रात ३ मे रोजी, तिसरी आरमोरी क्षेत्रात १६ जून रोजी, त्यानंतर २६ आणि २९ जूनला पोर्ला क्षेत्रात, तर ८ सप्टेंबरला वडसा वनपरिक्षेत्रात शिकार केली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा लाखांदूरकडे वळविला होता. पुन्हा तो वडसा क्षेत्रात आला होता. पण पुढील मानवी शिकार होण्याआधीच तो वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

वारंवार सापळे लावूनही येत नव्हते यश-    तिन्ही जिल्ह्यातील रेस्क्यू टीमला अनेक महिन्यांपासून गुंगारा देणारा हा वाघ अतिशय चतुर आहे. १७ डिसेंबर २०२१ रोजी चिमूर वनपरिक्षेत्रात या वाघाचे पहिली मानवी शिकार केली होती. मात्र अलीकडच्या काही दिवसात त्याच्या मानवी शिकारीचे प्रमाण वाढतच होते. वारंवार सापळे लावूनही तो सापडत नसल्याने वनविभागाचे टेन्शनही वाढले होते. शेवटी आठ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले.

नागरिकांनी जंगलात जाणे टाळावेअनेक लोकांचा बळी घेणाऱ्या सीटी-१ या वाघाला जेरबंद करण्यात यश आले असले तरी नागरिकांनी बिनधास्तपणे जंगलात जाण्याचे टाळावे. वडसा आणि गडचिरोली वनविभागात  इतर वाघांचा वावर असल्याने  लोकांनी जंगलात जाणे टाळावे, असे आवाहन गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी केले आहे.

 

टॅग्स :Tigerवाघ