शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सीटी-1 नावाची दहशत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2022 23:19 IST

सीटी-१ या वाघाने गडचिरोली जिल्ह्यात सहा मानवी शिकार केल्या आहेत. त्यात पहिली शिकार वडसा वनपरिक्षेत्रात १४ एप्रिल रोजी, दुसरी याच क्षेत्रात ३ मे रोजी, तिसरी आरमोरी क्षेत्रात १६ जून रोजी, त्यानंतर २६ आणि २९ जूनला पोर्ला क्षेत्रात, तर ८ सप्टेंबरला वडसा वनपरिक्षेत्रात शिकार केली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा लाखांदूरकडे वळविला होता. पुन्हा तो वडसा क्षेत्रात आला होता. पण पुढील मानवी शिकार होण्याआधीच तो वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज/आरमोरी : गेल्या दहा महिन्यांपासून पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत आपली दहशत निर्माण करत १३ लोकांच्या अकाली मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सीटी-१ या वाघाला पकडण्यात यश आल्याने त्याच्या नावाची दहशत अखेर संपली. असे असले तरी टी-६ या नरभक्षी वाघिणीसह इतर वाघांचे अस्तित्व कायम असल्यामुळे नागरिकांना यापुढेही योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे राहणार आहे.  मूळच्या चंद्रपूर जिल्ह्यातून आलेल्या सीटी-१ वाघाचे हल्ले गेल्या काही दिवसात वाढले होते. त्यामुळे त्याला जेरबंद करण्यासाठी  तिन्ही जिल्ह्यात विविध ठिकाणांहून बोलविलेल्या रेस्क्यू टीमला तो हुलकावणी देत होता.  वाघाला जेरबंद करण्यासाठी अनेकदा बेट लावून सापळे रचण्यात आले होते; मात्र तो एका ठिकाणी स्थिर राहात नसल्याने  वनविभागाने लावलेल्या जाळ्यात तो अडकत नव्हता. जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून वनविभागाचे अधिकारी व  कर्मचारी त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. ज्या भागात हा वाघ जात होता त्या भागातील जवळपासच्या गावात जाऊन वनविभागाचे कर्मचारी लोकांना जंगलात न जाण्याविषयी सांगत होते, मुणारी देत होते. वडसा वनविभागातील आरमोरी, पोराला व वडसा या तिन्ही वनपरिक्षेत्रात या वाघाने हल्ले करून सहा जणांचा बळी घेतला. मात्र  कित्येकदा शिकार केलेल्या ठिकाणी सापळा रचूनही तो जाळ्यात अडकत नव्हता. त्यामुळे सदर वाघाने वनविभागाची झोप उडविली होती.

अशा केल्या सीटी-१ने सहा मानवी शिकारसीटी-१ या वाघाने गडचिरोली जिल्ह्यात सहा मानवी शिकार केल्या आहेत. त्यात पहिली शिकार वडसा वनपरिक्षेत्रात १४ एप्रिल रोजी, दुसरी याच क्षेत्रात ३ मे रोजी, तिसरी आरमोरी क्षेत्रात १६ जून रोजी, त्यानंतर २६ आणि २९ जूनला पोर्ला क्षेत्रात, तर ८ सप्टेंबरला वडसा वनपरिक्षेत्रात शिकार केली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा लाखांदूरकडे वळविला होता. पुन्हा तो वडसा क्षेत्रात आला होता. पण पुढील मानवी शिकार होण्याआधीच तो वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

वारंवार सापळे लावूनही येत नव्हते यश-    तिन्ही जिल्ह्यातील रेस्क्यू टीमला अनेक महिन्यांपासून गुंगारा देणारा हा वाघ अतिशय चतुर आहे. १७ डिसेंबर २०२१ रोजी चिमूर वनपरिक्षेत्रात या वाघाचे पहिली मानवी शिकार केली होती. मात्र अलीकडच्या काही दिवसात त्याच्या मानवी शिकारीचे प्रमाण वाढतच होते. वारंवार सापळे लावूनही तो सापडत नसल्याने वनविभागाचे टेन्शनही वाढले होते. शेवटी आठ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले.

नागरिकांनी जंगलात जाणे टाळावेअनेक लोकांचा बळी घेणाऱ्या सीटी-१ या वाघाला जेरबंद करण्यात यश आले असले तरी नागरिकांनी बिनधास्तपणे जंगलात जाण्याचे टाळावे. वडसा आणि गडचिरोली वनविभागात  इतर वाघांचा वावर असल्याने  लोकांनी जंगलात जाणे टाळावे, असे आवाहन गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी केले आहे.

 

टॅग्स :Tigerवाघ