शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

सूर्य ओकतेय आग, जरा जपून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:00 IST

रविवारी तापमान ४२ अंशांपर्यंत पाेहाेचले. या रखरखत्या उन्हात घराबाहेर पडणे शक्य नसल्याने, दुपारी १२ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत गडचिराेली शहरातील रस्ते ओस पडल्यागत दिसून येत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात माेठ्या प्रमाणात वाढ हाेते. त्यामुळे २५ तारखेनंतरच्या दिवसांना नवतपा असे संबाेधल्या जाते. या नवतपांपैकी चार ते पाच दिवस अत्यंत कडक उन्ह राहते.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : ढगाळ वातावरण नाहीसे हाेऊन आकाश निरभ्र झाल्याने, मागील दाेन दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. रविवारी तापमान ४२ अंशांपर्यंत पाेहाेचले. या रखरखत्या उन्हात घराबाहेर पडणे शक्य नसल्याने, दुपारी १२ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत गडचिराेली शहरातील रस्ते ओस पडल्यागत दिसून येत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात माेठ्या प्रमाणात वाढ हाेते. त्यामुळे २५ तारखेनंतरच्या दिवसांना नवतपा असे संबाेधल्या जाते. या नवतपांपैकी चार ते पाच दिवस अत्यंत कडक उन्ह राहते. त्यामुळे तापमानात वाढ हाेते. चार दिवसांपूर्वी काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला, तसेच ढगाळ वातावरण असल्याने तापमान ४० अंशांपर्यंत पाेहाेचले हाेते. शनिवारपासून आकाश निरभ्र झाले.

 काय काळजी घ्यावी 

-    सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असते. त्यामुळे या कालावधीत शक्यताे उन्हात फिरणे, काम करणे किंवा खेळणे टाळावे. -    साैम्य रंगाचे सैल कपडे वापरावे, टाइट जिन्स आणि भडक कपडे वापरू नयेत. डाेक्यावर रुमाल किंवा स्कार्प बांधावा. तहान लागण्याची वाट न पाहता पाणी प्यावे. नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, लिंबूपाणी घ्यावे. 

पुन्हा आठ दिवस उष्णतेचेमान्सूनचे वेळेवर आगमन न झाल्यास पुन्हा आठ दिवस तापमान ४० अंशांच्या वरच राहणार आहे. पाऊस झाल्यानंतरही वातावरणातील दमटपणा त्रासवून साेडणार आहे. त्यामुळे उन्हापासून काळजी घेण्याची गरज आहे.

११ नंतर काम बंद

ग्रामीण भागात शेतीपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. सकाळी ९ वाजल्यानंतरच उकड उन्ह पडत असल्याने,  सकाळच्या सुमारास कामे उरकण्याला शेतकरी प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी ६ वाजता शेतात पाेहाेचून ११ वाजेपर्यंत कामे केली जातात. त्यानंतर, घराकडे परत येतात. शहरात बांधकाम मजूर सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत काम करतात. त्यानंतर कायमची सुटी घेतली जाते. 

उष्माघाताचा धाेकाबाहेरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढले की, शरीरातील तापमान नियंत्रण करणारी यंत्रणा काेलमडते, अशा व्यक्तीला उष्माघात म्हणजेच हिटस्ट्राेक किंवा सन स्ट्राेक हाेताे. ही जीवघेणी अवस्था आहे. वातावरणातील जास्त तापमान किंवा खूप वेळ उन्हामध्ये शारीरिक कष्ट केल्याने ही अवस्था निर्माण हाेते. उष्माघातामुळे मृत्यू ओढवताे. 

 

टॅग्स :Temperatureतापमान