शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

सूर्य ओकतेय आग, जरा जपून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:00 IST

रविवारी तापमान ४२ अंशांपर्यंत पाेहाेचले. या रखरखत्या उन्हात घराबाहेर पडणे शक्य नसल्याने, दुपारी १२ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत गडचिराेली शहरातील रस्ते ओस पडल्यागत दिसून येत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात माेठ्या प्रमाणात वाढ हाेते. त्यामुळे २५ तारखेनंतरच्या दिवसांना नवतपा असे संबाेधल्या जाते. या नवतपांपैकी चार ते पाच दिवस अत्यंत कडक उन्ह राहते.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : ढगाळ वातावरण नाहीसे हाेऊन आकाश निरभ्र झाल्याने, मागील दाेन दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. रविवारी तापमान ४२ अंशांपर्यंत पाेहाेचले. या रखरखत्या उन्हात घराबाहेर पडणे शक्य नसल्याने, दुपारी १२ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत गडचिराेली शहरातील रस्ते ओस पडल्यागत दिसून येत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात माेठ्या प्रमाणात वाढ हाेते. त्यामुळे २५ तारखेनंतरच्या दिवसांना नवतपा असे संबाेधल्या जाते. या नवतपांपैकी चार ते पाच दिवस अत्यंत कडक उन्ह राहते. त्यामुळे तापमानात वाढ हाेते. चार दिवसांपूर्वी काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला, तसेच ढगाळ वातावरण असल्याने तापमान ४० अंशांपर्यंत पाेहाेचले हाेते. शनिवारपासून आकाश निरभ्र झाले.

 काय काळजी घ्यावी 

-    सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असते. त्यामुळे या कालावधीत शक्यताे उन्हात फिरणे, काम करणे किंवा खेळणे टाळावे. -    साैम्य रंगाचे सैल कपडे वापरावे, टाइट जिन्स आणि भडक कपडे वापरू नयेत. डाेक्यावर रुमाल किंवा स्कार्प बांधावा. तहान लागण्याची वाट न पाहता पाणी प्यावे. नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, लिंबूपाणी घ्यावे. 

पुन्हा आठ दिवस उष्णतेचेमान्सूनचे वेळेवर आगमन न झाल्यास पुन्हा आठ दिवस तापमान ४० अंशांच्या वरच राहणार आहे. पाऊस झाल्यानंतरही वातावरणातील दमटपणा त्रासवून साेडणार आहे. त्यामुळे उन्हापासून काळजी घेण्याची गरज आहे.

११ नंतर काम बंद

ग्रामीण भागात शेतीपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. सकाळी ९ वाजल्यानंतरच उकड उन्ह पडत असल्याने,  सकाळच्या सुमारास कामे उरकण्याला शेतकरी प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी ६ वाजता शेतात पाेहाेचून ११ वाजेपर्यंत कामे केली जातात. त्यानंतर, घराकडे परत येतात. शहरात बांधकाम मजूर सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत काम करतात. त्यानंतर कायमची सुटी घेतली जाते. 

उष्माघाताचा धाेकाबाहेरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढले की, शरीरातील तापमान नियंत्रण करणारी यंत्रणा काेलमडते, अशा व्यक्तीला उष्माघात म्हणजेच हिटस्ट्राेक किंवा सन स्ट्राेक हाेताे. ही जीवघेणी अवस्था आहे. वातावरणातील जास्त तापमान किंवा खूप वेळ उन्हामध्ये शारीरिक कष्ट केल्याने ही अवस्था निर्माण हाेते. उष्माघातामुळे मृत्यू ओढवताे. 

 

टॅग्स :Temperatureतापमान