शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सूर्य ओकतेय आग, जरा जपून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:00 IST

रविवारी तापमान ४२ अंशांपर्यंत पाेहाेचले. या रखरखत्या उन्हात घराबाहेर पडणे शक्य नसल्याने, दुपारी १२ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत गडचिराेली शहरातील रस्ते ओस पडल्यागत दिसून येत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात माेठ्या प्रमाणात वाढ हाेते. त्यामुळे २५ तारखेनंतरच्या दिवसांना नवतपा असे संबाेधल्या जाते. या नवतपांपैकी चार ते पाच दिवस अत्यंत कडक उन्ह राहते.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : ढगाळ वातावरण नाहीसे हाेऊन आकाश निरभ्र झाल्याने, मागील दाेन दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. रविवारी तापमान ४२ अंशांपर्यंत पाेहाेचले. या रखरखत्या उन्हात घराबाहेर पडणे शक्य नसल्याने, दुपारी १२ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत गडचिराेली शहरातील रस्ते ओस पडल्यागत दिसून येत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात माेठ्या प्रमाणात वाढ हाेते. त्यामुळे २५ तारखेनंतरच्या दिवसांना नवतपा असे संबाेधल्या जाते. या नवतपांपैकी चार ते पाच दिवस अत्यंत कडक उन्ह राहते. त्यामुळे तापमानात वाढ हाेते. चार दिवसांपूर्वी काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला, तसेच ढगाळ वातावरण असल्याने तापमान ४० अंशांपर्यंत पाेहाेचले हाेते. शनिवारपासून आकाश निरभ्र झाले.

 काय काळजी घ्यावी 

-    सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असते. त्यामुळे या कालावधीत शक्यताे उन्हात फिरणे, काम करणे किंवा खेळणे टाळावे. -    साैम्य रंगाचे सैल कपडे वापरावे, टाइट जिन्स आणि भडक कपडे वापरू नयेत. डाेक्यावर रुमाल किंवा स्कार्प बांधावा. तहान लागण्याची वाट न पाहता पाणी प्यावे. नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, लिंबूपाणी घ्यावे. 

पुन्हा आठ दिवस उष्णतेचेमान्सूनचे वेळेवर आगमन न झाल्यास पुन्हा आठ दिवस तापमान ४० अंशांच्या वरच राहणार आहे. पाऊस झाल्यानंतरही वातावरणातील दमटपणा त्रासवून साेडणार आहे. त्यामुळे उन्हापासून काळजी घेण्याची गरज आहे.

११ नंतर काम बंद

ग्रामीण भागात शेतीपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. सकाळी ९ वाजल्यानंतरच उकड उन्ह पडत असल्याने,  सकाळच्या सुमारास कामे उरकण्याला शेतकरी प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी ६ वाजता शेतात पाेहाेचून ११ वाजेपर्यंत कामे केली जातात. त्यानंतर, घराकडे परत येतात. शहरात बांधकाम मजूर सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत काम करतात. त्यानंतर कायमची सुटी घेतली जाते. 

उष्माघाताचा धाेकाबाहेरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढले की, शरीरातील तापमान नियंत्रण करणारी यंत्रणा काेलमडते, अशा व्यक्तीला उष्माघात म्हणजेच हिटस्ट्राेक किंवा सन स्ट्राेक हाेताे. ही जीवघेणी अवस्था आहे. वातावरणातील जास्त तापमान किंवा खूप वेळ उन्हामध्ये शारीरिक कष्ट केल्याने ही अवस्था निर्माण हाेते. उष्माघातामुळे मृत्यू ओढवताे. 

 

टॅग्स :Temperatureतापमान