शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

नक्षल्यांची भीती कमी; कमलापूरच्या हत्तींना मिळेल का पर्यटकांचे प्रेम?

By मनोज ताजने | Updated: November 21, 2022 12:26 IST

राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प पर्यटन विकासापासून दूर

गडचिरोली : पूर्वी सर्कसमध्ये दिसणारे हत्ती आता केवळ चित्रात आणि टीव्हीवर पाहून मुलांना समाधान मानावे लागते. पण, मोकळ्या जंगलात फिरणारे, पर्यटकांना जवळून न्याहाळता येणारे आणि निरूपद्रवी असणारे हत्ती प्रत्यक्षात पाहायचे असतील तर गडचिरोली जिल्ह्यात यावे लागते.

'जंगलाचा जिल्हा' अशी ओळख असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात कमलापूर येथे राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प आहे. परंतु वन्यजीव विभाग आणि सरकारी यंत्रणेच्या उदासीनतेमुळे आतापर्यंत हा कॅम्प आणि येथील हत्तीही उपेक्षितच राहिले. नक्षल दहशतीच्या नावाखाली आजपर्यंत येथील हत्तींना पर्यटकांच्या प्रेमापासून मुकावे लागले. पण, आता परिस्थिती बदलत असताना हे हत्ती पर्यटनाच्या नकाशावर येतील का, असा प्रश्न पडला आहे.

१९६४ साली सुरू झालेल्या या 'हत्ती कॅम्प'मध्ये सद्य:स्थितीत ८ हत्ती आहेत. त्यातील दोन नर तर उर्वरित मादी आहे. यातील काही हत्तींना गुजरातच्या जामनगरमध्ये नेण्याची योजना होती. परंतु जनभावना लक्षात घेऊन अद्याप त्या हत्तींना हलविण्यात आलेले नाही. ५८ वर्षांपासून कार्यरत असलेला हा हत्ती कॅम्प पाहण्यासाठी महाराष्ट्रासह तेलंगणा आणि छत्तीसगडमधील पर्यटक येत असतात. मात्र, इतक्या वर्षांत या हत्ती कॅम्पकडे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत.

तरीही ज्यांना माहीत आहे ते पर्यटक मजल-दरमजल करीत कमलापूर गाठतात. पण, तेथील नैसर्गिक सौंदर्य, हत्तींना पाहूनही प्रसन्न होणाऱ्या पर्यटकांसाठी कोणत्याही सोयी नाहीत. त्यामुळे पर्यटनासोबत निर्माण होणाऱ्या जोडधंद्यांना या ठिकाणी चालना मिळू शकलेली नाही.

नक्षलवाद्यांचे नाही, आता हत्तींचे कमलापूर! 

कधीकाळी नक्षल चळवळीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमलापूरमधून आता नक्षलवाद्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. गावात वर्षातून एखादी पत्रकबाजी होते. पण, नक्षलवाद्यांनीही येथील हत्तींना किंवा कोणत्या पर्यटकांना कधी त्रास दिलेला नाही.

साडेतीन वर्षांपूर्वी या ठिकाणी पर्यटकांच्या विसाव्यासाठी कुटी, स्वच्छतागृह, सामूहिक डबापार्टीसारख्या कार्यक्रमासाठी शेड, तारांचे कम्पाउंड आणि कॅम्पच्या प्रवेशद्वारावर हत्तींचे पुतळे उभारण्यात आले होते. पण, एका रात्री नक्षलवाद्यांनी येऊन तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी कोणत्याही सोयी-सुविधा करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला नाही. वास्तविक, ३ वर्षांपूर्वीच्या आणि आजच्या स्थितीत बराच फरक पडलेला असल्याने आता पर्यटनाच्या दृष्टीने शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :tourismपर्यटनenvironmentपर्यावरणGadchiroliगडचिरोली