शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

नक्षल्यांची भीती कमी; कमलापूरच्या हत्तींना मिळेल का पर्यटकांचे प्रेम?

By मनोज ताजने | Updated: November 21, 2022 12:26 IST

राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प पर्यटन विकासापासून दूर

गडचिरोली : पूर्वी सर्कसमध्ये दिसणारे हत्ती आता केवळ चित्रात आणि टीव्हीवर पाहून मुलांना समाधान मानावे लागते. पण, मोकळ्या जंगलात फिरणारे, पर्यटकांना जवळून न्याहाळता येणारे आणि निरूपद्रवी असणारे हत्ती प्रत्यक्षात पाहायचे असतील तर गडचिरोली जिल्ह्यात यावे लागते.

'जंगलाचा जिल्हा' अशी ओळख असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात कमलापूर येथे राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प आहे. परंतु वन्यजीव विभाग आणि सरकारी यंत्रणेच्या उदासीनतेमुळे आतापर्यंत हा कॅम्प आणि येथील हत्तीही उपेक्षितच राहिले. नक्षल दहशतीच्या नावाखाली आजपर्यंत येथील हत्तींना पर्यटकांच्या प्रेमापासून मुकावे लागले. पण, आता परिस्थिती बदलत असताना हे हत्ती पर्यटनाच्या नकाशावर येतील का, असा प्रश्न पडला आहे.

१९६४ साली सुरू झालेल्या या 'हत्ती कॅम्प'मध्ये सद्य:स्थितीत ८ हत्ती आहेत. त्यातील दोन नर तर उर्वरित मादी आहे. यातील काही हत्तींना गुजरातच्या जामनगरमध्ये नेण्याची योजना होती. परंतु जनभावना लक्षात घेऊन अद्याप त्या हत्तींना हलविण्यात आलेले नाही. ५८ वर्षांपासून कार्यरत असलेला हा हत्ती कॅम्प पाहण्यासाठी महाराष्ट्रासह तेलंगणा आणि छत्तीसगडमधील पर्यटक येत असतात. मात्र, इतक्या वर्षांत या हत्ती कॅम्पकडे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत.

तरीही ज्यांना माहीत आहे ते पर्यटक मजल-दरमजल करीत कमलापूर गाठतात. पण, तेथील नैसर्गिक सौंदर्य, हत्तींना पाहूनही प्रसन्न होणाऱ्या पर्यटकांसाठी कोणत्याही सोयी नाहीत. त्यामुळे पर्यटनासोबत निर्माण होणाऱ्या जोडधंद्यांना या ठिकाणी चालना मिळू शकलेली नाही.

नक्षलवाद्यांचे नाही, आता हत्तींचे कमलापूर! 

कधीकाळी नक्षल चळवळीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमलापूरमधून आता नक्षलवाद्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. गावात वर्षातून एखादी पत्रकबाजी होते. पण, नक्षलवाद्यांनीही येथील हत्तींना किंवा कोणत्या पर्यटकांना कधी त्रास दिलेला नाही.

साडेतीन वर्षांपूर्वी या ठिकाणी पर्यटकांच्या विसाव्यासाठी कुटी, स्वच्छतागृह, सामूहिक डबापार्टीसारख्या कार्यक्रमासाठी शेड, तारांचे कम्पाउंड आणि कॅम्पच्या प्रवेशद्वारावर हत्तींचे पुतळे उभारण्यात आले होते. पण, एका रात्री नक्षलवाद्यांनी येऊन तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी कोणत्याही सोयी-सुविधा करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला नाही. वास्तविक, ३ वर्षांपूर्वीच्या आणि आजच्या स्थितीत बराच फरक पडलेला असल्याने आता पर्यटनाच्या दृष्टीने शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :tourismपर्यटनenvironmentपर्यावरणGadchiroliगडचिरोली