शहरं
Join us  
Trending Stories
1
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
2
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
3
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
4
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
5
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
6
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
7
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
8
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
9
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
10
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
11
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका
12
मलायका-अर्जुनचं खरंच ब्रेकअप झालं का? मॅनेजर म्हणते- "ते अजूनही..."
13
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
14
मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले
15
Apara Ekadashi 2024: अपरा एकादशीला सूर्याची उपासना करा; अकाली मृत्यूची भीती घालवा; वाचा शास्त्र!
16
'लगान' नाही तर 'या' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती किरण राव आणि आमिर खानची लव्हस्टोरी
17
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
18
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले  
19
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
20
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल

केंद्रीय पथक म्हणते तांदूळ निकृष्ट, मग कारवाईची 'खिचडी' का शिजेना?

By संजय तिपाले | Published: August 23, 2023 2:23 PM

तीन गिरणीमालकांना कोणाचे अभय : वर्ष उलटूनही ९१ मे. टन तांदूळ बदलवून दिले नाही

संजय तिपाले

गडचिरोली : केंद्र शासनाच्या पथकाने केलेल्या तपासणीत देसाईगंजमधील तीन गिरण्यांत निकृष्ट दर्जाचा ९१.३ मे. टन तांदूळ आढळून आला होता. करारनाम्यातील अटी, शर्तींनुसार हा तांदूळ बदलून देणे अपेक्षित होते; परंतु वर्षभरानंतरही तांदूळ बदलवून दिला नाही. त्यामुळे कारवाईची खिचडी शिजलीच नाही. केंद्रीय पथकाने त्रुटी निदर्शनास आणून दिल्यानंतर या गिरणीमालकांना कोणाचे अभय, असा सवाल उपस्थित होत आहे.

अन्न नागरी पुरवठा विभागाच्या केंद्रीय पथकातील चार सदस्यांच्या उच्चस्तरीय समितीने ४ ते १३ मे २०२२ या दरम्यान देसाईगंज येथील मायाश्री फूड इंडस्ट्रीज, मायाश्री ॲग्रो इंडस्ट्रीज व मायाश्री राईस इंडस्ट्रीज या तीन गिरण्यांची तपासणी केली होती. यावेळी तांदळाचे नमुने घेतले हाते. त्याची तपासणी केंद्रीय प्रयोग शाळेत केली होती. यानंतर समितीने मायाश्री राईसमधील १३ मे.टन, मायाश्री ॲग्रोतील २८.३ मे.टन व मायाश्री फूडमधील ५० मे.टन असा एकूण ९१.३ मे.टन तांदूळ खाण्यायोग्य नसल्याचे (बीआरएल) ठरविले होते.

हा तांदूळ बदलवून गुणवत्ती चाचणी झालेला (एफएक्यू) तांदूळ घेण्याची शिफारस समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. ही प्रक्रिया सहा आठवड्यांत पूर्ण करावी, असे निर्देश दिले होते. मात्र, वर्ष उलटूनही गिरणीमालकाने तांदूळ बदलून दिले नसल्याची बाब समोर आली आहे.

तपासणी समितीच्या कार्यप्रणालीवरच शंका

जिल्हाधिकाऱ्यांनी १ ऑगस्ट रोजी संबंधित गिरणीमालकास कारणे दाखवा नोटीस बजावून पाच दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यावर ५ ऑगस्टला गिरणीमालकाने खुलासा दिला. यात केंद्रीय तपासी समितीच्या कार्यपद्धतीवरच शंका व्यक्त केली आहे. तपासणी केलेले तांदूळ हे खासगी मालकीचे होते, पथकाने तांदळाचे नमुने हे हाॅपरमधून घेतले, त्यामुळे ते निकृष्ट आढळले, असा दावा खुलाशात करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे मागवला अहवाल

दरम्यान, केंद्रीय समितीच्या तपासणीत निकृृष्ट आढळलेल्या तांदळाबाबत गिरणीमालकांवर कारवाई न केल्याने राज्य विकास समन्वयक व निगराणी समिती (दिशा)चे राज्य सदस्य त्रिरत्न इंगळे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विजय वाघमारे यांना पत्र लिहून मुद्देनिहाय चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार, अन्न नागरी पुरवठा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय समितीने तपासणी करुन निकृष्ट ठरवलेला तांदूळ सहा बदलून न घेतल्याने तो खुल्या बाजारात पुरवठा करण्यास मूकसंमती दिल्यासारखे आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. फौजदारी कारवाई करून जिल्हाधिकाऱ्यांकडून खुलासा मागवणे आवश्यक आहे.

- त्रिरत्न इंगळे, सदस्य राज्य विकास समन्वयक व निगराणी समिती (दिशा)

यामध्ये गिरणीतून घेतलेल्या तांदळाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. अहवाल अद्याप आलेला नाही.

- संजय मीणा, जिल्हाधिकारी

टॅग्स :GovernmentसरकारGadchiroliगडचिरोली