शहरं
Join us  
Trending Stories
1
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
2
भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख...
3
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
4
"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
5
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
6
ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
7
२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश
8
'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
9
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
10
१० वर्षांची प्रतीक्षा संपली, नेपाळला जाणाऱ्यांसाठी खूशखबर; आता बिनधास्त घेऊन जा २००, ५०० ची नोट
11
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
12
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
13
Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
14
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
15
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
16
Latur Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
17
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
18
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
19
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
20
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथक म्हणते तांदूळ निकृष्ट, मग कारवाईची 'खिचडी' का शिजेना?

By संजय तिपाले | Updated: August 23, 2023 14:24 IST

तीन गिरणीमालकांना कोणाचे अभय : वर्ष उलटूनही ९१ मे. टन तांदूळ बदलवून दिले नाही

संजय तिपाले

गडचिरोली : केंद्र शासनाच्या पथकाने केलेल्या तपासणीत देसाईगंजमधील तीन गिरण्यांत निकृष्ट दर्जाचा ९१.३ मे. टन तांदूळ आढळून आला होता. करारनाम्यातील अटी, शर्तींनुसार हा तांदूळ बदलून देणे अपेक्षित होते; परंतु वर्षभरानंतरही तांदूळ बदलवून दिला नाही. त्यामुळे कारवाईची खिचडी शिजलीच नाही. केंद्रीय पथकाने त्रुटी निदर्शनास आणून दिल्यानंतर या गिरणीमालकांना कोणाचे अभय, असा सवाल उपस्थित होत आहे.

अन्न नागरी पुरवठा विभागाच्या केंद्रीय पथकातील चार सदस्यांच्या उच्चस्तरीय समितीने ४ ते १३ मे २०२२ या दरम्यान देसाईगंज येथील मायाश्री फूड इंडस्ट्रीज, मायाश्री ॲग्रो इंडस्ट्रीज व मायाश्री राईस इंडस्ट्रीज या तीन गिरण्यांची तपासणी केली होती. यावेळी तांदळाचे नमुने घेतले हाते. त्याची तपासणी केंद्रीय प्रयोग शाळेत केली होती. यानंतर समितीने मायाश्री राईसमधील १३ मे.टन, मायाश्री ॲग्रोतील २८.३ मे.टन व मायाश्री फूडमधील ५० मे.टन असा एकूण ९१.३ मे.टन तांदूळ खाण्यायोग्य नसल्याचे (बीआरएल) ठरविले होते.

हा तांदूळ बदलवून गुणवत्ती चाचणी झालेला (एफएक्यू) तांदूळ घेण्याची शिफारस समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. ही प्रक्रिया सहा आठवड्यांत पूर्ण करावी, असे निर्देश दिले होते. मात्र, वर्ष उलटूनही गिरणीमालकाने तांदूळ बदलून दिले नसल्याची बाब समोर आली आहे.

तपासणी समितीच्या कार्यप्रणालीवरच शंका

जिल्हाधिकाऱ्यांनी १ ऑगस्ट रोजी संबंधित गिरणीमालकास कारणे दाखवा नोटीस बजावून पाच दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यावर ५ ऑगस्टला गिरणीमालकाने खुलासा दिला. यात केंद्रीय तपासी समितीच्या कार्यपद्धतीवरच शंका व्यक्त केली आहे. तपासणी केलेले तांदूळ हे खासगी मालकीचे होते, पथकाने तांदळाचे नमुने हे हाॅपरमधून घेतले, त्यामुळे ते निकृष्ट आढळले, असा दावा खुलाशात करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे मागवला अहवाल

दरम्यान, केंद्रीय समितीच्या तपासणीत निकृृष्ट आढळलेल्या तांदळाबाबत गिरणीमालकांवर कारवाई न केल्याने राज्य विकास समन्वयक व निगराणी समिती (दिशा)चे राज्य सदस्य त्रिरत्न इंगळे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विजय वाघमारे यांना पत्र लिहून मुद्देनिहाय चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार, अन्न नागरी पुरवठा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय समितीने तपासणी करुन निकृष्ट ठरवलेला तांदूळ सहा बदलून न घेतल्याने तो खुल्या बाजारात पुरवठा करण्यास मूकसंमती दिल्यासारखे आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. फौजदारी कारवाई करून जिल्हाधिकाऱ्यांकडून खुलासा मागवणे आवश्यक आहे.

- त्रिरत्न इंगळे, सदस्य राज्य विकास समन्वयक व निगराणी समिती (दिशा)

यामध्ये गिरणीतून घेतलेल्या तांदळाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. अहवाल अद्याप आलेला नाही.

- संजय मीणा, जिल्हाधिकारी

टॅग्स :GovernmentसरकारGadchiroliगडचिरोली