शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

३७ बटालियनने देशाबराेबरच जिल्ह्याचीही सेवा केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 05:00 IST

सीआरपीएफ ३७ बटालियनची स्थापना ५४ वर्षांपूर्वी १ जुलै १९६८ रोजी देवळी (राजस्थान) येथे झाली.  यानंतर, या बटालियनने राजस्थान, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, तेलंगणा, पश्चिम बंगाल, बिहार, मणिपूर, आसाम, जम्मू आणि काश्मीर, त्रिपुरा आणि महाराष्ट्र अशा देशाच्या विविध भागात तैनातीदरम्यान आपले कर्तव्य यशस्वीपणे पार पाडले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : अहेरी येथील प्राणहिता पाेलीस मुख्यालयात तैनात असलेल्या सीआरपीएफ ३७ बटालियनचा ५४ वा स्थापना दिवस कमांडंट एम.  एच.  खोब्रागडे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.  यावेळी कमांडंट यांनी जवानांना या बटालियनच्या इतिहासाची माहिती दिली.  सीआरपीएफ ३७ बटालियनची स्थापना ५४ वर्षांपूर्वी १ जुलै १९६८ रोजी देवळी (राजस्थान) येथे झाली.  यानंतर, या बटालियनने राजस्थान, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, तेलंगणा, पश्चिम बंगाल, बिहार, मणिपूर, आसाम, जम्मू आणि काश्मीर, त्रिपुरा आणि महाराष्ट्र अशा देशाच्या विविध भागात तैनातीदरम्यान आपले कर्तव्य यशस्वीपणे पार पाडले. ६ जानेवारी २०१२ पासून बटालियन महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आपले कर्तव्य बजावत आहे. ३७ बटालियनने अनेक आव्हाने पेलली आहेत. ही आव्हाने अजूनही संपलेली नाहीत.  पुढे नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. त्यासाठी बळाची शिकवण, स्वयंशिस्त, संयम आणि समर्पणाची भावना सर्वोच्च ठेवावी लागेल, असे मार्गदर्शन केले. यावेळी ३७ बटालियनचे कमांडंट एम. एच.  खोब्रागडे, ९ बटालियनचे कमांडंट आर.  एस. बालापूरकर,१९२ बटालियनचे कमांडंट  देवराज, द्वितीय कमांडिंग ऑफिसर मनमदन किशनन, रामरस मीना आणि बिमल राज, डेप्युटी कमांडंट रमेश सिंग, सहायक  कमांडंट  तरुण डोंगरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. संपत कुमार, अरविंद सातोरे, सुभेदार मेजर फुलचंद, अधिनस्त अधिकारी व जवान व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहीद वीरांना श्रद्धांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने हुतात्मा स्मारकावर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कमांडंट ३७ बटालियनच्या क्वार्टर गार्डवर मानवंदना देण्यात आली. सैनिकी परिषद व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यानंतर क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 

टॅग्स :Policeपोलिस