शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

रब्बीच्या कर्जाकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 10:32 PM

गडचिरोली जिल्ह्यात जवळपास २० हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड केली जाते.

ठळक मुद्दे२५ कोटींचे उद्दिष्ट : केवळ तीन लाखांचे कर्ज वितरित

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जवळपास २० हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड केली जाते. या पिकांसाठी दरवर्षी काही शेतकरी कर्ज उचलत होते. यावर्षी मात्र शेतकºयांनी पाठ फिरविली असून केवळ सात शेतकºयांनी रब्बीचे कर्ज उचलले आहे.रब्बी पिकाचे सर्वसाधरण क्षेत्र २० हजार हेक्टर असले तरी सिंचनाच्या सुविधा वाढत चालल्या असल्याने रब्बीचे क्षेत्र वाढत चालले आहे. विशेष करून देसाईगंज, चामोर्शी, सिरोंचा या तालुक्यांमध्ये रब्बी पिकांची लागवड केली जाते. रब्बी हंगामासाठी बँका पीक कर्ज उपलब्ध करून देत असल्याने शेतकरी बँकांकडून कर्ज घेण्यास अधिक पसंती दर्शवितात. दरवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०१७ च्या रब्बी हंगामात २५ कोटी ३८ लाख रूपये कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दरवर्षी जवळपास ५० लाख रूपयांचे कर्ज वितरित केले जात होते. यावर्षी मात्र नोव्हेंबर महिना सुरू असला तरी केवळ सात शेतकºयांना तीन लाख रूपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. दरवर्षीच्या तुलनेत कर्ज वितरणाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येते. कर्ज वितरित केलेल्या बँकांमध्ये बँक आॅफ इंडियाने पाच शेतकऱ्यांना दोन लाख रूपये, आयडीबीआय बँकेने दोन शेतकºयांना एक लाख रूपये एवढेच कर्ज वितरित केले आहे. उर्वरित बँकांकडे मागणीच झाली नसल्याने त्यांनी कर्जाचे वितरण केले नसल्याचे सांगण्यात येत आहे.देसाईगंज व सिरोंचा तालुक्यात उन्हाळी धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबर सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, अंकिसा भागात मिरची, मक्का या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या दोन्ही पिकांसाठी हजारो रूपयांचा खर्च येत असल्याने शेतकरी बँकांकडून पीक कर्ज घेत होते. यावर्षी मात्र कर्जाकडे पाठ फिरविली आहे.सिरोंचा, देसाईगंज, चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रसिरोंचा, देसाईगंज व चामोर्शी तालुक्यात सिंचनाच्या सर्वाधिक सुविधा आहेत. त्यामुळे या तिनच तालुक्यातून रब्बी पिकांचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. देसाईगंज व सिरोंचा तालुक्यात उन्हाळी धान पिकाची लागवड केली जाते. सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, अंकिसा भागात मक्का व मिरची पिकांची लागवड केली जाते. चामोर्शी तालुक्यातील शेतकरी सुद्धा रब्बी पिकांची लागवड करतात.कर्ज माफीमुळे शेतकºयांनी जुन्या कर्जाचा भरणा केलाच नाहीकर्ज माफीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. मागील वर्षी रब्बी हंगामाचे घेतले कर्ज माफ होईल, असा अनेक शेतकºयांचा गैरसमज झाला असल्याने शेतकºयांनी मागील वर्षी घेतलेले रब्बी हंगामाचे कर्ज भरले नाही. त्यामुळे त्या शेतकºयांनी नवीन कर्जाची सुद्धा मागणी केली नाही. परिणामी दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी कर्ज वितरणाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे.कर्ज माफ करण्याचे वारे मे महिन्यापासूनच सुरू झाले होते. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी मागील वर्षीच्या खरीप हंगामाच्या कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे त्यांनाही कर्ज उचलता आले नाही. खरीप हंगामात १९४ कोटी ६२ लाख रूपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र केवळ ८४ कोटी ८२ लाख रूपयांचे कर्ज उचलले. कर्ज न उचललेल्या शेतकºयांनी पीक विमा सुद्धा काढला नाही.