शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बीएडकडे पाठ

By admin | Updated: May 25, 2014 23:32 IST

अद्यापक पदवी (बीएड्) अभ्यासक्रमाच्या (पूर्व परीक्षा) सीईटीचे पडघम वाजले असून २२ मे गुरूवारपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात विद्यार्थी सीईटीचे ऑनलाईन

सीईटी परीक्षा : अर्ज भरण्याकडे कलच नाही

गडचिरोली : अद्यापक पदवी (बीएड्) अभ्यासक्रमाच्या (पूर्व परीक्षा) सीईटीचे पडघम वाजले असून २२ मे गुरूवारपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात विद्यार्थी सीईटीचे ऑनलाईन अर्ज भरताना दिसत नसल्याचे आढळून येत आहे. गतवर्षी गोंडवाना विद्यापीठातील अनेक बीएड् कॉलेजमध्ये निम्मेच प्रवेश झाल्याची माहिती आहे. नोकरीची कुठलही गॅरंटी नसल्याने विद्यार्थ्यांनी बीएड् अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येते.

दोन वर्षापूर्वी नव्यानेच निर्माण झालेल्या गोंडवाना विद्यापीठांतर्गत चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यात मिळून ३२ खासगी बीएड् कॉलेज आहे. गडचिरोली जिल्ह्यात १0 बीएड् कॉलेज आहेत. गतवर्षी गोंडवाना विद्यापीठांतर्गत असलेल्या चारच बीएड् कॉलेजमध्ये ७५ ते १00 टक्के प्रवेश झाले. तर उर्वरित कॉलेजच्या व्यवस्थापनाला ३५ ते ४0 टक्के प्रवेशावरच समाधान मानावे लागले. शासनाने विनाअनुदानित तत्वावर पाच-सहा वर्षापूर्वी राज्यभरात बीएड् व डीएड् कॉलेजची खैरात वाटली. या कॉलेजमधून दरवर्षी हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन बाहेर पळत होते. त्यामुळे बीएड् प्रशिक्षणार्थ्यांची संख्या भरमसाठ वाढली. परिणामी खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळेतील दोन ते चार जागेसाठी शेकडो उमेदवार मुलाखतीला उपस्थित होऊ लागले. परिणामी खासगी संस्थांनी माध्यमिक शिक्षक पदासाठी भरमसाठ डोनेशन घेणे सुरू केले. यामुळे सर्वसामान्य गरीब होतकरू व हुशार बीएड् प्रशिक्षणार्थ्यांवर बेकारीची पाळी आली. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या ७-८ वर्षापासून शेकडो बीएड् प्रशिक्षणार्थी शिक्षकाच्या नोकरीपासून वंचित असल्याचे दिसून येते. केवळ भरमसाठ डोनेशन देणार्‍या बोटावर मोजण्याइतक्याच बीएड् प्रशिक्षणार्थ्यांनी खासगी संस्थेत शिक्षक पदाची नोकरी बळकावली. सध्या तर अनेक शिक्षक पट पडताळणी दरम्यान अतिरिक्त ठरल्यामुळे समायोजनाची प्रक्रिया जिल्ह्यासह राज्यभरात सुरू आहे. परिणामी राज्य शासनाने अनुदानित माध्यमिक शाळातील शिक्षक भरतीवर बंदी आणली आहे. फक्त विनाअनुदानित शाळेतील शिक्षक भरतीला मान्यता आहे.

गेल्या सात-आठ वर्षापासून अनेक बीएड् प्रशिक्षणार्थी थोड्याफार प्रमाणात खासगी संस्थेला डोनेशन देऊन विनाअनुदानित शाळांवर कार्य करीत आहेत. यांना नियमित मानधनही मिळत नसल्याने हे युवक हवालदिल झाले आहेत. शासनाकडून शाळांना अनुदान मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. विनाअनुदानित शाळेतील शिक्षक वेठबिगारीचे जीवन घालविता आहेत.

टीईटीपात्र विद्यार्थ्यांची निराशा

शासनाने उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पदाच्या भरतीचे गाजर दाखवून यावर्षीपासून नव्यानेच टीईटी परीक्षा घेण्यास सुरूवात केली. सदर परीक्षा आटोपून पाच महिन्याचा कालावधी लोटत आहे. या परीक्षेचा निकालही लागला. यात फारच कमी डीएड्, बीएड् प्रशिक्षणार्थी पात्र ठरले आहेत. मात्र शिक्षक पदाच्या भरतीच्या हालचाली शासनाकडून दिसून येत नाही. यामुळे टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या डीएड्, बीएड् विद्यार्थ्यांची घोर निराशा झाली आहे. पटपडताळणी मोहीमेत राज्यभरात अनेक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आढळून आली. यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. यामुळे शिक्षकांची नवीन पदे निर्माण होण्याचे चिन्ह सध्या तरी दिसत नाही.