शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

गडचिरोली जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना तेलंगणाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 11:53 IST

धान उत्पादक गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी १३ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली असताना जिल्हाभरात एकही कापूस खरेदी केंद्र नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस घेऊन राज्याची सीमा ओलांडून तेलंगणात जावे लागत आहे.

ठळक मुद्देएकही खरेदी केंद्र नाही छोट्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धान उत्पादक गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेल्या काही वर्षांपासून कापसाचा पेरा वाढत आहे. यावर्षी १३ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली असताना जिल्हाभरात एकही कापूस खरेदी केंद्र नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस घेऊन राज्याची सीमा ओलांडून तेलंगणात जावे लागत आहे.आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात दोन लाख हेक्टरवर धानाचा पेरा होतो. परंतू अलिकडच्या काही वर्षात धानाचा पेरा कमी होऊन कापसाची लागवडही केली जात आहे. तेलंगणाच्या सीमेलगत असलेल्या गडचिरोलीच्या सिरोंचा, अहेरी, मुलचेरा, चामोर्शी या तालुक्यात तेलगू शेतकऱ्यांच्या मदतीने कापूस लागवडीचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. पण धानाप्रमाणे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी एकही शासकीय कापूस खरेदी केंद्र नाही. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागत आहे. चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे असलेल्या जिनिंग फॅक्टरीकडूनही शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जाते. परंतू शासकीय दराएवढा दर कोणीही देत नाही. त्यामुळे काही मोठे शेतकरी तेलंगणा राज्यात जाऊन तेथील खरेदी केंद्रावर किंवा जिनिंगला आपला कापूस विकतात. खासगी व्यापाऱ्यांपेक्षा तिथे जास्त दर मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.वास्तविक १४ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होणाऱ्या कापसासाठी महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाकडून चार तालुक्यात प्रत्येकी एक खरेदी केंद्र देणे आवश्यक होते. परंतू लोकप्रतिनिधींसह प्रशासनानेही त्यासाठी पुढाकार घेतला नाही.एकही केंद्र नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना वाहतुकीचा भुर्दंड सहन करीत तेलंगणा गाठावे लागत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी