शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 01:03 IST

राज्याच्या ग्राम विकास विभागामार्फत यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या. मात्र या बदली प्रक्रियेनंतर जिल्ह्याच्या अवघड (दुर्गम) क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.

ठळक मुद्दे४० शाळांमधील चित्र : भामरागड, एटापल्ली, सिरोंचात पदे रिक्त

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या ग्राम विकास विभागामार्फत यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या. मात्र या बदली प्रक्रियेनंतर जिल्ह्याच्या अवघड (दुर्गम) क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. विशेष करून भामरागड, एटापल्ली, सिरोंचा या तालुक्यात जवळपास ४० शाळांमध्ये सद्य:स्थितीत एकच शिक्षक कार्यरत असल्याची माहिती आहे. दुर्गम भागातील शिक्षणाचा हा खेळखंडोबा बंद करण्याची मागणी होत आहे.एटापल्ली पंचायत समिती अंतर्गत सोहगाव, मेंढरी, गुडराम, गुंडाम, पुन्नूर, कोठी, देवदा, मवेली, पुसुमपल्ली, येडसगोंदी, नेंडेर या जि.प. शाळांमध्ये शिक्षकांची एक ते दोन पदे रिक्त आहे. मोहंदी, वाळवी, बेसेवाडा, आलेंगा, सूरजागड, पुरसलगोंदी, गोडेली, मेंढरी, तोडगट्टा, पिपली बुर्गी, कचलेर, कुकेली, कोरनार, मोहुर्ली, कुदरी, हेटळकसा, वेलमागड, कुंडूम, जवेली, उईकेटोला, वांगेतुरी, रेगाटोला, जारावंडी, गट्टा, गिलगुड्डा, झारेवाडा, गोरगट्टा, येरवळवी, मोहंदी, वाळवी, बेसेवाडा, कोईनवशी, मुरेवाडा, नैताला, हाचबोडी, रेकलमेटा, मदाकुई, पुस्कोटी, रेकाभटाळ, नैनवाडी, जाजावडी, गट्टागुड्डा आदी शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांचे पद रिक्त आहे.एटापल्ली तालुक्यातील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा आहेत. चार वर्ग असलेल्या शाळांमध्येच शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. उच्च प्राथमिक शाळांचीही परिस्थिती शिक्षकांच्या बाबतीत अशीच आहे.आॅनलाईन बदली प्रक्रियेनंतर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पदवीधर शिक्षकांची जवळपास ४०, प्राथमिक शिक्षकांच्या २०० वर जागा रिक्त आहेत. उच्चश्रेणी मुख्याध्यापकांचीही १५ वर पदे रिक्त आहेत. अहेरी उपविभागातील अनेक शाळा दुर्गम, अतिदुर्गम व अवघड क्षेत्रात आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या आॅनलाईन बदली प्रक्रियेदरम्यान शहरी भागातील शिक्षकांनी अवघड क्षेत्रातील शाळांबाबतचा प्रस्ताव अर्जात नमूद केला नाही. त्यामुळे ही स्थिती आहे.अनेक शिक्षक वैद्यकीय रजेवर, काही शिक्षक रूजू होईनाजि.प. शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेनंतर जिल्ह्यातील जवळपास ४०० शिक्षक विस्तापित झाले. सदर बदली प्रक्रियेत अन्याय झाल्याचे कारण देत ५७ शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अवघड क्षेत्रात बदली झालेले शिक्षक संबंधित शाळेत रूजू झाले. मात्र त्यानंतर जवळपास ५० शिक्षक वैद्यकीय रजेवर गेले असल्याची माहिती आहे. बदली होऊनही दुर्गम व अतिदुर्गम भागातील शाळांमध्ये रूजू झाले नाही. त्यामुळे अहेरी उपविभागातील सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, मुलचेरा या पाच तालुक्यात शिक्षकांचा दुष्काळ निर्माण झाला आहे. अहेरी उपविभागातील दुर्गम शाळांमध्ये गटशिक्षणाधिकाऱ्यांनी इतर शाळांमधील शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात बदली करून यावर तोडगा काढला आहे.शासनाकडून शिक्षक भरती प्रक्रिया बंद आहे. आॅनलाईन बदली प्रक्रियेत अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षक गेले नाही. भामरागड तालुक्यातील १४२ शिक्षकांची शहरी भागात बदली झाली. तर या तालुक्यात नव्याने ७० शिक्षकांची बदली करण्यात आली. त्यामुळे या तालुक्यात शिक्षकांच्या निम्म्या जागा रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ज्या ठिकाणी तीन ते चार व दोन शिक्षक आहेत, अशा ठिकाणच्या शाळांमधील शिक्षकांची दुर्गम शाळांमध्ये तात्परत्या स्वरूपात बदली करण्याचे आदेश बीओंना यापूर्वीच देण्यात आले होते.- पी.एच.उरकुडे, प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प.गडचिरोली

टॅग्स :Teacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळा