शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

शिक्षकांचे वेतन थकले

By admin | Updated: September 25, 2014 23:23 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन थकले आहे. त्यामुळे दैनंदिन गरजा कशा भागवाव्या

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन थकले आहे. त्यामुळे दैनंदिन गरजा कशा भागवाव्या असा मोठा प्रश्न या शिक्षकांच्या कुटुंबासमोर निर्माण झाला आहे. गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत १९ अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. यामध्ये शेकडो शिक्षक म्हणून काम करीत आहेत. या शिक्षकांचे मागील जून महिन्यापासूनचे वेतन झाले नाही. एक महिन्यानंतरच शिक्षकांनी प्रकल्प कार्यालयाला याबाबत निवेदन देऊन वेतन देण्याची मागणी केली होती. मात्र तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही या शिक्षकांना वेतन देण्यात आले नाही. दुर्गम भागातील आदिवासी व गरीब विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शासनाने आश्रमशाळा काढल्या आहेत. या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांनाच उपाशी राहण्याची पाळी येत असेल तर शिक्षणाचे धडे कसे काय दिले जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेकडो किमी अंतरावर असलेल्या दुर्गम भागात जाऊन कुटुंबापासून दूर राहून शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. मात्र वेतनाअभावी कुटुंब आर्थिक संकटात सापडले असल्याने शिक्षकांसमोर फार मोठा गहण प्रश्न निर्माण झाला आहे. तीन महिन्यांपासून वेतनच नसल्याने शिक्षकांना कर्ज काढून कुटुंब व आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. हजारो रूपयांची उधारी झाल्याने किराणा दुकानदार किराणा देण्यासाठी तयार नाही. घरमालक घरभाड्यासाठी तगादा लावणे सुरू केले आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या शिक्षकांची फार मोठी कुचंबना झाली आहे. अनुदानित आश्रमशाळा शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न होणे नित्याचीच बाब झाली आहे. शासकीय आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन अगदी वेळेवर होतात. मात्र निधी नसल्याचे कारण पुढे करीत अनुदानित आश्रमशाळांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेळेवर वेतन दिले जात नाही. हा दुजाभाव अनुदानित आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य कमी करणारा आहे. वेतन वेळेवर देण्यात यावे यासाठी आश्रमशाळा कर्मचारी व शिक्षकांनी अनेक वेळा निवेदने दिली आहेत. मंत्रालयावर मोर्चा काढला आहे, उपोषण मोर्चा अनेकवेळा काढून या गंभीर समस्येबाबत शासन व प्रशासनाचे लक्ष वेधन्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अजूनपर्यंत या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देण्यात आदिवासी विकास विभागाला यश प्राप्त झाले नाही. आदिवासी विकास विभागाच्यावतीने आदिवासींच्या विकासासाठी शेकडो योजना राबविल्या जातात. या योजनांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त होतो. असे असतांनाही निधी नसल्याचे कारण पुढे करीत या कर्मचाऱ्यांचे वेतन कसे काय थकविले जाते असा प्रश्न निर्माण झाला आहे. (नगर प्रतिनिधी)