शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

शिक्षकांचे वेतन थकले

By admin | Updated: September 25, 2014 23:23 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन थकले आहे. त्यामुळे दैनंदिन गरजा कशा भागवाव्या

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन थकले आहे. त्यामुळे दैनंदिन गरजा कशा भागवाव्या असा मोठा प्रश्न या शिक्षकांच्या कुटुंबासमोर निर्माण झाला आहे. गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत १९ अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. यामध्ये शेकडो शिक्षक म्हणून काम करीत आहेत. या शिक्षकांचे मागील जून महिन्यापासूनचे वेतन झाले नाही. एक महिन्यानंतरच शिक्षकांनी प्रकल्प कार्यालयाला याबाबत निवेदन देऊन वेतन देण्याची मागणी केली होती. मात्र तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही या शिक्षकांना वेतन देण्यात आले नाही. दुर्गम भागातील आदिवासी व गरीब विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शासनाने आश्रमशाळा काढल्या आहेत. या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांनाच उपाशी राहण्याची पाळी येत असेल तर शिक्षणाचे धडे कसे काय दिले जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेकडो किमी अंतरावर असलेल्या दुर्गम भागात जाऊन कुटुंबापासून दूर राहून शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. मात्र वेतनाअभावी कुटुंब आर्थिक संकटात सापडले असल्याने शिक्षकांसमोर फार मोठा गहण प्रश्न निर्माण झाला आहे. तीन महिन्यांपासून वेतनच नसल्याने शिक्षकांना कर्ज काढून कुटुंब व आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. हजारो रूपयांची उधारी झाल्याने किराणा दुकानदार किराणा देण्यासाठी तयार नाही. घरमालक घरभाड्यासाठी तगादा लावणे सुरू केले आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या शिक्षकांची फार मोठी कुचंबना झाली आहे. अनुदानित आश्रमशाळा शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न होणे नित्याचीच बाब झाली आहे. शासकीय आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन अगदी वेळेवर होतात. मात्र निधी नसल्याचे कारण पुढे करीत अनुदानित आश्रमशाळांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेळेवर वेतन दिले जात नाही. हा दुजाभाव अनुदानित आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य कमी करणारा आहे. वेतन वेळेवर देण्यात यावे यासाठी आश्रमशाळा कर्मचारी व शिक्षकांनी अनेक वेळा निवेदने दिली आहेत. मंत्रालयावर मोर्चा काढला आहे, उपोषण मोर्चा अनेकवेळा काढून या गंभीर समस्येबाबत शासन व प्रशासनाचे लक्ष वेधन्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अजूनपर्यंत या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देण्यात आदिवासी विकास विभागाला यश प्राप्त झाले नाही. आदिवासी विकास विभागाच्यावतीने आदिवासींच्या विकासासाठी शेकडो योजना राबविल्या जातात. या योजनांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त होतो. असे असतांनाही निधी नसल्याचे कारण पुढे करीत या कर्मचाऱ्यांचे वेतन कसे काय थकविले जाते असा प्रश्न निर्माण झाला आहे. (नगर प्रतिनिधी)