शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 01:16 IST

गडचिरोली- जिल्हयाचा निर्देशांक वाढविण्यासाठी आणि त्यांना पुढे नेण्यासाठी ‘डायलॉग गडचिरोली’ उपक्रम आपण राबवित आहोत. देशाला प्रगतीपथावर पोहचवायचे असेल सुजान नागरिक घडणे समाजासाठी अत्यंत गरजेचे आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी यांचे प्रतिपादन : शिक्षण, कौशल्यविकास आणि पायाभूत संरचनेवर विचारमंथन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली- जिल्हयाचा निर्देशांक वाढविण्यासाठी आणि त्यांना पुढे नेण्यासाठी ‘डायलॉग गडचिरोली’ उपक्रम आपण राबवित आहोत. देशाला प्रगतीपथावर पोहचवायचे असेल सुजान नागरिक घडणे समाजासाठी अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच सर्वांगिण विकास होण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा मुळातच पाया मजबूत कसा होईल याकडे जातीने लक्ष देऊन गुरुजनांचे कर्तव्य पार पाडावेत असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीदिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या अनुरोधाने आयोजित केलेल्या शिक्षण, कौशल्य विकास आणि पायाभूत संरचना या व्दितीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी सिंग बोलत होते. यावेळी युनिसेफच्या रेश्मा अग्रवाल, आनंद घोडके, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सचिन ओंबासे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, आज स्पर्धात्मक जगात टिकण्यासाठी अत्यंत कुशल बुध्यांक असलेला विद्यार्थी टिकाव धरेल. आणि ही बाब यशस्वीरित्या राबविण्यासाठी शिक्षकांची महत्वाची भूमिका आहे. त्याचबरोबर विविध कौशल्यावर आधारित शिक्षणाची सुध्दा गरज आहे. तेव्हा शाळा, महाविद्यालयातून नौकरी मागणारे विद्यार्थी घडू नयेत तर नौकरी देणारे कुशल व्यावसायीक, संघटक तयार व्हावेत ही काळाची गरज असल्याचेहीप्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत आशा वर्कर,अंगणवाडी शिक्षीकांची सुध्दा महत्वपूर्ण जबाबदारी आहे. बालकांच्या प्रकृतीची काळजी घेणे, प्राथमिक अभ्यासक्रम शिकविणे या बाबीसुध्दा महत्वाच्या आहेत असेही ते म्हणाले.युनिसेफच्या रेश्मा अग्रवाल यांनी मार्गदर्शनपर बोलतांना म्हणाल्या की, मुलांच्या आरोग्याची तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या आहाराबाबत माहिती सांगितली. त्यांच्या जडणघडणीत प्राथमिक, माध्यमिक अभ्यासक्रमांचा वाटा महत्वाचा आहे. विद्यार्थ्याांच्या शारीरीक, मानसिकतेत बदल सातत्याने होत असायला पाहीजे. तरच पुढे जाऊन त्याला त्यांची आशा आकांक्षाची पुर्तता करता येईल. एकंदरीत विद्यार्थ्यांचा सार्वांगीण विकास होणे महत्वाचे आहे, यामध्ये शिक्षक महत्वाचा दुवा असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सभागृहाला संबोधित करतांना म्हणाले की, अप्रगत विद्यार्थी प्रगत कसा होईल याकडे विशेष लक्ष देऊन शिक्षकांनी अधिकचे वर्ग घेऊन त्यांच्या ज्ञानात भर घालावी. भाषा, गणीत , विज्ञान याकडे लक्ष देतानाचत्याच्या शारीरीक वाढीकडे, त्याच्या वाढत असलेल्या बुध्यांकाकडे लक्ष द्यावे असे ते म्हणाले. कार्यशाळेत शिक्षक, अधिकारी, कर्मचारी हजर होते.

टॅग्स :Teacherशिक्षकcollectorजिल्हाधिकारी