शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

शिक्षकांची पाल्यांच्या घरी वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:15 IST

तत्कालीन शासनाच्या उदारमतवादी धोरणामुळे ‘गाव तिथे शाळा’ हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला. परिणामी गल्लीबोळात इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले. आता गेल्या चार ते पाच वर्षांपासून दरवर्षी शिक्षकांना आपली नोकरी टिकविण्यासाठी पालक व पाल्यांच्या घरी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देपालकांची मनधरणी जोमात : नोकरी टिकविण्यासाठी उन्हातान्हात भटकंती सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तत्कालीन शासनाच्या उदारमतवादी धोरणामुळे ‘गाव तिथे शाळा’ हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला. परिणामी गल्लीबोळात इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले. आता गेल्या चार ते पाच वर्षांपासून दरवर्षी शिक्षकांना आपली नोकरी टिकविण्यासाठी पालक व पाल्यांच्या घरी भटकंती करावी लागत आहे.आमची शाळा चांगली आहे, विविध सोयीसुविधा असून चांगला निकाल देण्याची तसेच गुणवत्तेची हमी असल्याचे सांगून आमच्याच शाळेत मुलांचा प्रवेश करा, प्रवेश फी मी भरतो, तुम्ही दाखल द्या, अशी मनधरणी ग्रामीण भागातील बहुतांश शिक्षक पालकांपुढे करीत आहेत.सन २०१९-२० हे शैक्षणिक सत्र २६ जून २०१९ रोजी सुरू होणार आहे. या शैक्षणिक सत्रासाठी आतापासूनच विद्यार्थ्याचे प्रवेश पूर्ण केले जात आहेत. गेल्या सात-आठ वर्षात तालुका मुख्यालयासह जिल्हा तसेच मोठ्या गावांमध्ये इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या झपाट्याने वाढली. परिणामी विद्यार्थी पटसंख्या मिळविण्यासह टिकविण्यासाठी संबंधित संस्था व शाळांमधील शिक्षकांची मोठी कसरत होत आहे.सध्या शालेय परीक्षांचा काळ सुरू आहे. सकाळच्या सत्रात शाळा सुरू असून परीक्षा घेतल्या जात आहेत. अशास्थितीत अनेक शाळांचे शिक्षक दुपारी ४ वाजतानंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंत शाळा परिसरातील अनेक गावांमध्ये फिरून इयत्ता पहिली, पाचवी, आठवीतील प्रवेशित मुलांचे दाखले मिळवित आहेत. काही शाळांमधील अर्धे शिक्षक सकाळपाळीत तर काही शिक्षक दुपारपाळीत गावागात फिरून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्याच्या कामात व्यस्त आहेत. यामध्ये नर्सरीपासून ते माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षकांचा समावेश आहे. ग्रामीण भागात शिक्षकांच्या भेटी वाढल्या आहेत.निवडणुकीच्या ड्युटीमुळे यंदा लवकरच मोहीमगडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी ११ एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया घेण्यात येणार असून या निवडणुकीच्या कामासाठी अनेक शाळांच्या शिक्षकांची ड्यूटी लावण्यात आली आहे. तसे पत्रही संबंधित शिक्षकांना प्राप्त झाले आहेत. त्यामुळे बहुतांश शिक्षक ७ ते ११ एप्रिल या कालावधीत निवडणुकीच्या कामात व्यस्त राहणार आहेत. निवडणुकीच्या या कामामुळे प्रवेशित विद्यार्थ्यांचे दाखले मिळविण्यासाठीचा हा हंगाम यंदा १५ दिवसांपूर्वी सुरू झाला आहे. शाळांसाठीची प्रवेशित विद्यार्थी संख्या निश्चित केल्यानंतर शिक्षक निवडणुकीच्या कामाकडे वळणार आहेत. पाल्यांच्या दाखल्यासाठी पालकांना विविध प्रकारचे आमिषही अनेक शिक्षक देत असल्याची माहिती आहे. एकूणच शिक्षकांची कसरत सुरू आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळा