शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शिक्षकांच्या समस्यांबाबत सभागृहात आवाज उठविणार

By admin | Updated: February 1, 2015 22:56 IST

आईनंतर माणूस घडविण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षक करतात. मात्र राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात सध्या संभ्रमावस्था आहे. शिक्षक व संघटनेने हाक दिल्यास आपण

जिल्हा अधिवेशन : विजय वडेट्टीवार यांची ग्वाहीगडचिरोली : आईनंतर माणूस घडविण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षक करतात. मात्र राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात सध्या संभ्रमावस्था आहे. शिक्षक व संघटनेने हाक दिल्यास आपण शिक्षकांना न्याय देण्यासाठी विधानसभेच्या सभागृहात आवाज उठविणार, अशी ग्वाही माजी राज्यमंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी दिली. येथील राणी दुर्गावती कन्या विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हा अधिवेशनात विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश आयलवार तर अध्यक्षस्थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा माजी शिक्षक आ. व्ही. यु. डायगव्हाणे होते. प्रमुख अतिथी म्हणून नागपूर शिक्षण मंडळाचे सदस्य दिलीप गडपल्लीवार, संघटनेचे कोषाध्यक्ष शेमदेव चापले, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष सुधाकर अडबाले, सदस्य समशेर खॉ. पठाण, जिल्हाध्यक्ष दिगांबर भशारकर, एन. टी. काळबांधे, भंडाराचे जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, मुख्याध्यापिका सिंधू चहांदे, श्रीहरी शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना आ. वडेट्टीवार म्हणाले, बी. टी. देशमुख व शिक्षक मतदार संघाचे माजी आ. व्ही. यु. डायगव्हाणे यांचेकडून सभागृहात प्रश्न कसे मांडावे हे आपण शिकलो. हेच आपले खरे गुरू आहेत. आजचे शिक्षक आमदार, शिक्षकांचे नसून राजकीय पक्षाचे आहेत. त्यांना शिक्षकांच्या समस्यांबाबत काही देणे-घेणे नाही. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मला संघटनेचा सभासद समजावे, शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढा उभारण्यास आपण सदैव तत्पर राहू, असे अभिवचनही आमदार वडेट्टीवार यांनी यावेळी दिले.यावेळी माजी आ. डायगव्हाणे म्हणाले, केंद्राप्रमाणे राज्यातील शिक्षकांना वेतन व इतर सवलती मिळाव्या यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने १९९७ मध्ये पहिले आंदोलन केले. आरटीई कायदा न समजल्यामुळे राज्यात सध्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ सुरू आहे. आरटीई कायद्यांतर्गत हजारो शिक्षकांना अतिरिक्त करण्यात आले. मात्र एकाही शिक्षकाने वा संघटनेने आरटीई कायद्याला विरोध केला नाही. शासनाने आरटीई कायद्याचा बाऊ करू नये, तसेच शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता ढासळू देऊ नये, असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी सतिश आयलवार, दिलीप गडपल्लीवार, शेमदेव चापले, आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अजय लोंढे, संचालन एस. डी. चुधरी यांनी केले तर आभार मनोज हुलके यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)