शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

शिक्षकांच्या समस्यांबाबत सभागृहात आवाज उठविणार

By admin | Updated: February 1, 2015 22:56 IST

आईनंतर माणूस घडविण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षक करतात. मात्र राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात सध्या संभ्रमावस्था आहे. शिक्षक व संघटनेने हाक दिल्यास आपण

जिल्हा अधिवेशन : विजय वडेट्टीवार यांची ग्वाहीगडचिरोली : आईनंतर माणूस घडविण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षक करतात. मात्र राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात सध्या संभ्रमावस्था आहे. शिक्षक व संघटनेने हाक दिल्यास आपण शिक्षकांना न्याय देण्यासाठी विधानसभेच्या सभागृहात आवाज उठविणार, अशी ग्वाही माजी राज्यमंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी दिली. येथील राणी दुर्गावती कन्या विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हा अधिवेशनात विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश आयलवार तर अध्यक्षस्थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा माजी शिक्षक आ. व्ही. यु. डायगव्हाणे होते. प्रमुख अतिथी म्हणून नागपूर शिक्षण मंडळाचे सदस्य दिलीप गडपल्लीवार, संघटनेचे कोषाध्यक्ष शेमदेव चापले, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष सुधाकर अडबाले, सदस्य समशेर खॉ. पठाण, जिल्हाध्यक्ष दिगांबर भशारकर, एन. टी. काळबांधे, भंडाराचे जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, मुख्याध्यापिका सिंधू चहांदे, श्रीहरी शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना आ. वडेट्टीवार म्हणाले, बी. टी. देशमुख व शिक्षक मतदार संघाचे माजी आ. व्ही. यु. डायगव्हाणे यांचेकडून सभागृहात प्रश्न कसे मांडावे हे आपण शिकलो. हेच आपले खरे गुरू आहेत. आजचे शिक्षक आमदार, शिक्षकांचे नसून राजकीय पक्षाचे आहेत. त्यांना शिक्षकांच्या समस्यांबाबत काही देणे-घेणे नाही. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मला संघटनेचा सभासद समजावे, शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढा उभारण्यास आपण सदैव तत्पर राहू, असे अभिवचनही आमदार वडेट्टीवार यांनी यावेळी दिले.यावेळी माजी आ. डायगव्हाणे म्हणाले, केंद्राप्रमाणे राज्यातील शिक्षकांना वेतन व इतर सवलती मिळाव्या यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने १९९७ मध्ये पहिले आंदोलन केले. आरटीई कायदा न समजल्यामुळे राज्यात सध्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ सुरू आहे. आरटीई कायद्यांतर्गत हजारो शिक्षकांना अतिरिक्त करण्यात आले. मात्र एकाही शिक्षकाने वा संघटनेने आरटीई कायद्याला विरोध केला नाही. शासनाने आरटीई कायद्याचा बाऊ करू नये, तसेच शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता ढासळू देऊ नये, असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी सतिश आयलवार, दिलीप गडपल्लीवार, शेमदेव चापले, आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अजय लोंढे, संचालन एस. डी. चुधरी यांनी केले तर आभार मनोज हुलके यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)