शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

करवसुली ७५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:20 IST

जिल्ह्यातील सर्व ४५६ ग्रामपंचायतींना १०० टक्के कर वसुली करण्याचे निर्देश राज्याच्या ग्राम विकास विभागासह स्थानिक जिल्हा परिषद प्रशासनाने दिले होते. मात्र जिल्ह्यातील ९० टक्के ग्रामपंचायतींना १०० टक्के कर वसुली करणे शक्य झाले नाही.

ठळक मुद्देउद्दिष्टपूर्ती नाही : शेकडो ग्रामपंचायती यंदा माघारल्या

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील सर्व ४५६ ग्रामपंचायतींना १०० टक्के कर वसुली करण्याचे निर्देश राज्याच्या ग्राम विकास विभागासह स्थानिक जिल्हा परिषद प्रशासनाने दिले होते. मात्र जिल्ह्यातील ९० टक्के ग्रामपंचायतींना १०० टक्के कर वसुली करणे शक्य झाले नाही. सन २०१७-१८ या वर्षात ३१ मार्चअखेरपर्यंत सर्व ग्रामपंचायतीची मिळून एकूण सरासरी ७५.६८ टक्के गृहकर वसुली झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गृहकर वसुलीत बहुतांश ग्रामपंचायती माघारल्या असल्याचे वास्तव उजेडात आले आहे.गडचिरोली पं.स.मधील ५१ ग्रा.पं.ची मागील थकबाकी व चालू वर्षाची मिळून एकूण १ कोटी ७५ लाख ३९ हजार ८७६ रूपयांची गृहकराची मागणी होती. यापैकी ग्रा.पं.ने ३१ मार्चअखेरपर्यंत १ कोटी २४ लाख ५३ हजार ३१२ रूपयांची गृहकर वसुली केली. आरमोरीतील ३३ ग्रा.पं.ची मागील थकबाकी व चालू वर्षातील मिळून एकूण १ कोटी ५२ लाख ७५ हजार २५४ रूपयांची गृहकराची मागणी होती. यापैकी ग्रा.पं.नी १ कोटी १६ लाख ५१ हजार ३३९ रूपयांची गृहकर वसुली केली आहे. देसाईगंज पं.स.मधील १९ ग्रा.पं.ची एकूण १ कोटी २७ लाख ७५ हजार ५०३ रूपयांची गृहकराची मागणी होती. यापैकी ग्रा.पं.ने ८८ लाख ३२ हजार ९८३ रूपये इतक्या गृहकराची वसुली केली आहे. कुरखेडा पं.स.मधील ४४ ग्रा.पं.ची एकूण १ कोटी १२ लाख १६ हजार ९६४ रूपयांची गृहकराची मागणी होती. यापैकी ग्रा.पं.नी ९३ लाख ९५ हजार ९८० रूपये इतक्या गृहकराची वसुली केली आहे. कोरची पं.स.मधील २९ ग्रा.पं.ची ३७ लाख ११ हजार ६०० रूपये इतक्या गृहकराची मागणी होती. यापैकी ३६ लाख ३२ हजारांची गृहकर वसुली करण्यात आली. धानोरा पं.स.तील ६१ ग्रा.पं.ने ६२ लाख ४७ हजार गृहकरापैकी ५४ लाख रूपयांची वसुली केली. चामोर्शी पं.स.तील ७५ ग्रा.पं.नी ३ कोटी ६६ लाख ३४ हजार रूपयांपैकी २ कोटी ७८ लाखांची वसुली केली. मुलचेरातील ग्रा.पं.नी ५६ लाख ३८ हजार रूपयांपैकी ४५ लाख १० हजार रूपये गृहकराची वसुली केली. अहेरी पं.स.तील ३९ ग्रा.पं.नी १ कोटी १५ लाख ६७ हजार रूपयांपैकी ८३ लाख २८ हजारांची वसुली केली. एटापल्ली पं.स.तील ग्रा.पं.नी ३१ लाखांची तर सिरोंचा पं.स.तील ग्रा.पं.नी ३८ लाख २२ हजार तसेच भामरागडातील १९ ग्रा.पं.नी १४ लाखांपैकी १२ लाख रूपये गृहकराची वसुली केली.३ कोटी २२ लाखांचे कर शिल्लकगडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील एकूण ४५६ ग्रामपंचायतीची सन २०१७-१८ वर्षात वसूल करावयाचे मागील थकीत व चालू वर्षाचे मिळून एकूण ३ कोटी २२ लाख २७ हजार १७३ रूपयांचे कर सध्या शिल्लक आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील ५१ ग्रा.पं.कडे ५० लाख ८६ हजार, आरमोरी तालुक्याकडे ३६ लाख २३ हजार, देसाईगंज ३९ लाख ४२ हजार, कुरखेडा १८ लाख, कोरची ७९ हजार, धानोरा ८ लाख, चामोर्शी ८७ लाख ९८ हजार, मुलचेरा ११ लाख २७ हजार, अहेरी ३२ लाख ३९ हजार, एटापल्ली ३३ हजार, सिरोंचा ३४ लाख ७२ हजार व भामरागड तालुक्यातील १९ ग्रा.पं.चे नागरिकांकडे १ लाख ५८ हजार रूपयांचे गृहकर आर्थिक वर्ष संपूनही शिल्लक आहे. 

टॅग्स :Taxकर