शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आकांक्षित गडचिरोलीत वीजजोडणीची लक्ष्यपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 23:48 IST

देशभरातील आकांक्षित (मागास) जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या राज्यातील चार पैकी तीन जिल्ह्यांनी वीज जोडणीचे उद्दिष्ट जवळजवळ पूर्ण केले आहे. त्यात आतापर्यंत वीज पुरवठ्यापासून वंचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ६२४२ कुटुंबांपैकी ६२२३ कुटुंबांत वीज जोडणी देण्यात प्रशासनाला यश आले आहे.

ठळक मुद्दे६२२३ कुटुंबांना लाभ : दुर्गम भागही झाला प्रकाशमान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशभरातील आकांक्षित (मागास) जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या राज्यातील चार पैकी तीन जिल्ह्यांनी वीज जोडणीचे उद्दिष्ट जवळजवळ पूर्ण केले आहे. त्यात आतापर्यंत वीज पुरवठ्यापासून वंचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ६२४२ कुटुंबांपैकी ६२२३ कुटुंबांत वीज जोडणी देण्यात प्रशासनाला यश आले आहे.विस्तारित ग्रामस्वराज अभियानांतर्गत केंद्र सरकारने प्रधानमंत्री ‘सहज बिजरी हर घर’ ही योजना आणली. त्यानुसार महाराष्टÑातील गडचिरोली, नंदूरबार, उस्मानाबाद आणि वाशिम या चार आकांक्षित जिल्ह्यांमध्ये वीज पुरवठा नसलेल्या ३६ हजार १९९ कुटुंबांमध्ये वीज कनेक्शन देण्याचे लक्ष्य निश्चित केले होते. त्यात वाशिम जिल्ह्याने २१६५ तर उस्मानाबाद जिल्ह्याने ५७५९ कुटुंबांना वीज पुरवठा देऊन आपले लक्ष्य १०० टक्के गाठले आहे. मात्र नंदूरबार जिल्ह्यात ९४.१५ टक्केच लक्ष्यपूर्ती झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात ६ हजार २३८ कुटुंबांपैकी ६ हजार २१९ कुटुंबांना वीज देण्यात आली. उद्दिष्टामध्ये समावेश असलल्या एटापल्ली तालुक्यातील मांढरी या गावातील अवघ्या १९ कुटुंबांना वीज कनेक्शन देणे बाकी आहे. त्यांच्या गावापर्यंत वीज पुरवठा करणे अशक्य असल्यामुळे त्यांची घरे सौर उर्जेतून प्रकाशमान केली जाणार आहेत.या योजनेतून गडचिरोली जिल्ह्यातील २८१ गावांत वंचित कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक गरीबांची घरे प्रकाशमान झाली.मांढरी गाव होणार सौरऊर्जेने प्रकाशमानआकांक्षित जिल्हा अंतर्गत ५४ गावांमध्ये वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट महावितरणला दिले होते. त्यापैकी एटापल्ली तालुक्यातील मांढरी या गावात वीज पोहोचविणे शक्य नाही. त्यामुळे सदर गावात मेडाच्या मदतीने सौरऊर्जेवरची उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या गावात १९ कुटुंबांना वीज जोडण्या देण्याचे उद्दिष्ट होते. उर्वरित सर्वच गावांमध्ये उद्दिष्टाएवढा वीज पुरवठा झाला आहे.मागासपणाचा ठप्पा पुसण्यासाठी गाठायचा मोठा पल्लाकेंद्र सरकारच्या ११५ मागास जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला हा मागासपणाचा ठप्पा पुसून टाकण्यासाठी मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागात वीज पोहोचल्यानंतर आता बारमाही रस्त्यांच्या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे झाले आहे. रस्ते, पाणी, निवारा या मुलभूत सोयीसुविधांपासूनच ग्रामीण भागातील नागरिक वंचित असल्यामुळे मोठ्या प्रगतीचे स्वप्न त्यांच्यासाठी दिवास्वप्नच ठरत आहे.

टॅग्स :electricityवीज