शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

आकांक्षित गडचिरोलीत वीजजोडणीची लक्ष्यपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 23:48 IST

देशभरातील आकांक्षित (मागास) जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या राज्यातील चार पैकी तीन जिल्ह्यांनी वीज जोडणीचे उद्दिष्ट जवळजवळ पूर्ण केले आहे. त्यात आतापर्यंत वीज पुरवठ्यापासून वंचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ६२४२ कुटुंबांपैकी ६२२३ कुटुंबांत वीज जोडणी देण्यात प्रशासनाला यश आले आहे.

ठळक मुद्दे६२२३ कुटुंबांना लाभ : दुर्गम भागही झाला प्रकाशमान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशभरातील आकांक्षित (मागास) जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या राज्यातील चार पैकी तीन जिल्ह्यांनी वीज जोडणीचे उद्दिष्ट जवळजवळ पूर्ण केले आहे. त्यात आतापर्यंत वीज पुरवठ्यापासून वंचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ६२४२ कुटुंबांपैकी ६२२३ कुटुंबांत वीज जोडणी देण्यात प्रशासनाला यश आले आहे.विस्तारित ग्रामस्वराज अभियानांतर्गत केंद्र सरकारने प्रधानमंत्री ‘सहज बिजरी हर घर’ ही योजना आणली. त्यानुसार महाराष्टÑातील गडचिरोली, नंदूरबार, उस्मानाबाद आणि वाशिम या चार आकांक्षित जिल्ह्यांमध्ये वीज पुरवठा नसलेल्या ३६ हजार १९९ कुटुंबांमध्ये वीज कनेक्शन देण्याचे लक्ष्य निश्चित केले होते. त्यात वाशिम जिल्ह्याने २१६५ तर उस्मानाबाद जिल्ह्याने ५७५९ कुटुंबांना वीज पुरवठा देऊन आपले लक्ष्य १०० टक्के गाठले आहे. मात्र नंदूरबार जिल्ह्यात ९४.१५ टक्केच लक्ष्यपूर्ती झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात ६ हजार २३८ कुटुंबांपैकी ६ हजार २१९ कुटुंबांना वीज देण्यात आली. उद्दिष्टामध्ये समावेश असलल्या एटापल्ली तालुक्यातील मांढरी या गावातील अवघ्या १९ कुटुंबांना वीज कनेक्शन देणे बाकी आहे. त्यांच्या गावापर्यंत वीज पुरवठा करणे अशक्य असल्यामुळे त्यांची घरे सौर उर्जेतून प्रकाशमान केली जाणार आहेत.या योजनेतून गडचिरोली जिल्ह्यातील २८१ गावांत वंचित कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक गरीबांची घरे प्रकाशमान झाली.मांढरी गाव होणार सौरऊर्जेने प्रकाशमानआकांक्षित जिल्हा अंतर्गत ५४ गावांमध्ये वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट महावितरणला दिले होते. त्यापैकी एटापल्ली तालुक्यातील मांढरी या गावात वीज पोहोचविणे शक्य नाही. त्यामुळे सदर गावात मेडाच्या मदतीने सौरऊर्जेवरची उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या गावात १९ कुटुंबांना वीज जोडण्या देण्याचे उद्दिष्ट होते. उर्वरित सर्वच गावांमध्ये उद्दिष्टाएवढा वीज पुरवठा झाला आहे.मागासपणाचा ठप्पा पुसण्यासाठी गाठायचा मोठा पल्लाकेंद्र सरकारच्या ११५ मागास जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला हा मागासपणाचा ठप्पा पुसून टाकण्यासाठी मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागात वीज पोहोचल्यानंतर आता बारमाही रस्त्यांच्या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे झाले आहे. रस्ते, पाणी, निवारा या मुलभूत सोयीसुविधांपासूनच ग्रामीण भागातील नागरिक वंचित असल्यामुळे मोठ्या प्रगतीचे स्वप्न त्यांच्यासाठी दिवास्वप्नच ठरत आहे.

टॅग्स :electricityवीज