शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
4
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
5
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
6
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
7
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
8
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
9
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
10
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
11
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
12
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
13
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
14
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
15
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
16
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
17
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
18
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
19
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
20
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल

आकांक्षित गडचिरोलीत वीजजोडणीची लक्ष्यपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 23:48 IST

देशभरातील आकांक्षित (मागास) जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या राज्यातील चार पैकी तीन जिल्ह्यांनी वीज जोडणीचे उद्दिष्ट जवळजवळ पूर्ण केले आहे. त्यात आतापर्यंत वीज पुरवठ्यापासून वंचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ६२४२ कुटुंबांपैकी ६२२३ कुटुंबांत वीज जोडणी देण्यात प्रशासनाला यश आले आहे.

ठळक मुद्दे६२२३ कुटुंबांना लाभ : दुर्गम भागही झाला प्रकाशमान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशभरातील आकांक्षित (मागास) जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या राज्यातील चार पैकी तीन जिल्ह्यांनी वीज जोडणीचे उद्दिष्ट जवळजवळ पूर्ण केले आहे. त्यात आतापर्यंत वीज पुरवठ्यापासून वंचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ६२४२ कुटुंबांपैकी ६२२३ कुटुंबांत वीज जोडणी देण्यात प्रशासनाला यश आले आहे.विस्तारित ग्रामस्वराज अभियानांतर्गत केंद्र सरकारने प्रधानमंत्री ‘सहज बिजरी हर घर’ ही योजना आणली. त्यानुसार महाराष्टÑातील गडचिरोली, नंदूरबार, उस्मानाबाद आणि वाशिम या चार आकांक्षित जिल्ह्यांमध्ये वीज पुरवठा नसलेल्या ३६ हजार १९९ कुटुंबांमध्ये वीज कनेक्शन देण्याचे लक्ष्य निश्चित केले होते. त्यात वाशिम जिल्ह्याने २१६५ तर उस्मानाबाद जिल्ह्याने ५७५९ कुटुंबांना वीज पुरवठा देऊन आपले लक्ष्य १०० टक्के गाठले आहे. मात्र नंदूरबार जिल्ह्यात ९४.१५ टक्केच लक्ष्यपूर्ती झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात ६ हजार २३८ कुटुंबांपैकी ६ हजार २१९ कुटुंबांना वीज देण्यात आली. उद्दिष्टामध्ये समावेश असलल्या एटापल्ली तालुक्यातील मांढरी या गावातील अवघ्या १९ कुटुंबांना वीज कनेक्शन देणे बाकी आहे. त्यांच्या गावापर्यंत वीज पुरवठा करणे अशक्य असल्यामुळे त्यांची घरे सौर उर्जेतून प्रकाशमान केली जाणार आहेत.या योजनेतून गडचिरोली जिल्ह्यातील २८१ गावांत वंचित कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक गरीबांची घरे प्रकाशमान झाली.मांढरी गाव होणार सौरऊर्जेने प्रकाशमानआकांक्षित जिल्हा अंतर्गत ५४ गावांमध्ये वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट महावितरणला दिले होते. त्यापैकी एटापल्ली तालुक्यातील मांढरी या गावात वीज पोहोचविणे शक्य नाही. त्यामुळे सदर गावात मेडाच्या मदतीने सौरऊर्जेवरची उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या गावात १९ कुटुंबांना वीज जोडण्या देण्याचे उद्दिष्ट होते. उर्वरित सर्वच गावांमध्ये उद्दिष्टाएवढा वीज पुरवठा झाला आहे.मागासपणाचा ठप्पा पुसण्यासाठी गाठायचा मोठा पल्लाकेंद्र सरकारच्या ११५ मागास जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला हा मागासपणाचा ठप्पा पुसून टाकण्यासाठी मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागात वीज पोहोचल्यानंतर आता बारमाही रस्त्यांच्या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे झाले आहे. रस्ते, पाणी, निवारा या मुलभूत सोयीसुविधांपासूनच ग्रामीण भागातील नागरिक वंचित असल्यामुळे मोठ्या प्रगतीचे स्वप्न त्यांच्यासाठी दिवास्वप्नच ठरत आहे.

टॅग्स :electricityवीज