शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

आकांक्षित गडचिरोलीत वीजजोडणीची लक्ष्यपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 23:48 IST

देशभरातील आकांक्षित (मागास) जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या राज्यातील चार पैकी तीन जिल्ह्यांनी वीज जोडणीचे उद्दिष्ट जवळजवळ पूर्ण केले आहे. त्यात आतापर्यंत वीज पुरवठ्यापासून वंचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ६२४२ कुटुंबांपैकी ६२२३ कुटुंबांत वीज जोडणी देण्यात प्रशासनाला यश आले आहे.

ठळक मुद्दे६२२३ कुटुंबांना लाभ : दुर्गम भागही झाला प्रकाशमान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशभरातील आकांक्षित (मागास) जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या राज्यातील चार पैकी तीन जिल्ह्यांनी वीज जोडणीचे उद्दिष्ट जवळजवळ पूर्ण केले आहे. त्यात आतापर्यंत वीज पुरवठ्यापासून वंचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ६२४२ कुटुंबांपैकी ६२२३ कुटुंबांत वीज जोडणी देण्यात प्रशासनाला यश आले आहे.विस्तारित ग्रामस्वराज अभियानांतर्गत केंद्र सरकारने प्रधानमंत्री ‘सहज बिजरी हर घर’ ही योजना आणली. त्यानुसार महाराष्टÑातील गडचिरोली, नंदूरबार, उस्मानाबाद आणि वाशिम या चार आकांक्षित जिल्ह्यांमध्ये वीज पुरवठा नसलेल्या ३६ हजार १९९ कुटुंबांमध्ये वीज कनेक्शन देण्याचे लक्ष्य निश्चित केले होते. त्यात वाशिम जिल्ह्याने २१६५ तर उस्मानाबाद जिल्ह्याने ५७५९ कुटुंबांना वीज पुरवठा देऊन आपले लक्ष्य १०० टक्के गाठले आहे. मात्र नंदूरबार जिल्ह्यात ९४.१५ टक्केच लक्ष्यपूर्ती झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात ६ हजार २३८ कुटुंबांपैकी ६ हजार २१९ कुटुंबांना वीज देण्यात आली. उद्दिष्टामध्ये समावेश असलल्या एटापल्ली तालुक्यातील मांढरी या गावातील अवघ्या १९ कुटुंबांना वीज कनेक्शन देणे बाकी आहे. त्यांच्या गावापर्यंत वीज पुरवठा करणे अशक्य असल्यामुळे त्यांची घरे सौर उर्जेतून प्रकाशमान केली जाणार आहेत.या योजनेतून गडचिरोली जिल्ह्यातील २८१ गावांत वंचित कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक गरीबांची घरे प्रकाशमान झाली.मांढरी गाव होणार सौरऊर्जेने प्रकाशमानआकांक्षित जिल्हा अंतर्गत ५४ गावांमध्ये वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट महावितरणला दिले होते. त्यापैकी एटापल्ली तालुक्यातील मांढरी या गावात वीज पोहोचविणे शक्य नाही. त्यामुळे सदर गावात मेडाच्या मदतीने सौरऊर्जेवरची उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या गावात १९ कुटुंबांना वीज जोडण्या देण्याचे उद्दिष्ट होते. उर्वरित सर्वच गावांमध्ये उद्दिष्टाएवढा वीज पुरवठा झाला आहे.मागासपणाचा ठप्पा पुसण्यासाठी गाठायचा मोठा पल्लाकेंद्र सरकारच्या ११५ मागास जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला हा मागासपणाचा ठप्पा पुसून टाकण्यासाठी मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागात वीज पोहोचल्यानंतर आता बारमाही रस्त्यांच्या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे झाले आहे. रस्ते, पाणी, निवारा या मुलभूत सोयीसुविधांपासूनच ग्रामीण भागातील नागरिक वंचित असल्यामुळे मोठ्या प्रगतीचे स्वप्न त्यांच्यासाठी दिवास्वप्नच ठरत आहे.

टॅग्स :electricityवीज