शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

विकासासाठी दोन पाऊल पुढे या

By admin | Updated: July 29, 2016 01:16 IST

केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन स्वत:ची अविकसित ही ओळख पुसून काढण्यासाठी दुर्गम भागातील ...

पोलीस अधीक्षकांचे आवाहन : गडचिरोलीत जनजागरण मेळावा गडचिरोली : केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन स्वत:ची अविकसित ही ओळख पुसून काढण्यासाठी दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांनी दोन पाऊल पुढे चालावे, प्रशासनाला सहकार्य करून किंवा मदत घेऊन आपला विकास साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने पोटेगाव मार्गावरील क्रीडा प्रबोधिनीत २७ ते ३० जुलैदरम्यान जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. २८ जुलै रोजी नागरिकांना शेती उपयोगी साहित्य वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अप्पर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादर, शिकाऊ उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील, ठाणेदार विजय पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले की, हिंसक कारवाया करून स्वत:ची दहशत निर्माण करणे व विकासापासून आदिवासींना वंचित ठेवणे हेच काम आजपर्यंत नक्षलवाद्यांनी केले आहे. नक्षलवादी चळवळीतील फोलपणा तेथेच काम करणाऱ्या सदस्यांच्या लक्षात आल्यानंतर १५ ते २० वर्ष काम करणाऱ्या सदस्यांनी चळवळ सोडली आहे. गावातील निरक्षर नागरिकांना योजनांची माहिती द्या, शासनाच्या योजना गावात प्रभाविपणे राबवा व स्वत:च्या गावाचा विकास करून आदर्श गाव निर्माण करा, ज्या प्रमाणे हिवरेबाजार गावासोबत पोपटराव पवार व राळेगणसिद्धी गावासोबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे नाव जोडले जाते. त्याचप्रमाणे तुमचेही नाव तुमच्या गावासोबत जोडले जाईल, यासाठी गावाचा विकास करा, असे आवाहन केले. तीन दिवसीय मेळाव्यात नागरिकांची आरोग्य तपासणी, नागरिकांना साहित्य वितरण, तसेच विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. पहिल्या दिवशी गावातील समस्या जाणून घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, संचालन पोलीस उपनिरीक्षक सतीश सिरसाट तर आभार पीएसआय मल्हार थोरात यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)