शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

जनजागृती व प्रतिबंधात्मक शिबिरे घ्या

By admin | Updated: June 23, 2014 00:06 IST

पावसाळ्यात जनावरांना विविध रोगाची लागण होते. खरीप हंगामामुळे शेतकऱ्यांचे पशुधनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. उपचाराअभावी पशुधन दगावण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

पशुधन संवर्धन विभागाची बैठक : कृषी व पशुसंवर्धन सभापतींचे अधिकाऱ्यांना निर्देशगडचिरोली : पावसाळ्यात जनावरांना विविध रोगाची लागण होते. खरीप हंगामामुळे शेतकऱ्यांचे पशुधनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. उपचाराअभावी पशुधन दगावण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गावागावात पशुधन रोगासंबंधी जनजागृती व प्रतिबंधात्मक शिबिराचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन विभागाची बैठक जि. प. च्या सभागृहात पार पडली. सभापती गण्यारपवार पुढे बोलतांना म्हणाले की, पावसाळी हंगामात पशुसंवर्धन विभागाच्या विविध लोकोपयोगी योजनांची जनजागृती पथनाट्यातून करावी. तसेच पशुसंवर्धन मेळावे घेऊन गुरांचे रोग प्रतिबंधात्मक शिबिरे, शेतकऱ्यांच्या गृहभेटी असे उपक्रम राबवून पशुसंवर्धनाची सेवा पोहोचविण्याचे निर्देश दिले. कामधेनू दत्तक ग्राम योजनेंतर्गत जंतनाशक शिबिरे, गोचीड, गोमाशा निर्मुलन शिबिरे, वैरण विकास कार्यक्रम, जनावरांचे मलमुत्र व वाया गेलेल्या चाऱ्याचे खत व्यवस्थापन करणे या सव्र उपक्रमाचा जिल्ह्यातील गोरगरीब शेतकरी, शेतमजूर व बेरोजगाार युवक पशुपालकांना लाभ पोहोचविण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांना जनावरांकरिता पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध असलेल्या औषधी विषयी मार्गदर्शन करावे, असे निर्देश सभापती अतुल गण्यारपवार यांनी दिले. प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बुरले यांनी पॉलिक्निनिकवर आपल्या गुरांना नेऊन रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन पशुपालकांना केले. प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिरीष रामटेके यांनी खरीप हंगामाच्या कालावधीत विनापरवानगीने कोणीही मुख्यालयी गैरहजर राहू नये व आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व पशुपालकांना जागृत करून पशुपालकांची गृहभेट घेऊन गुरांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीला पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व कर्मचारी उपस्थित होते.पावसाळ्याला काही दिवसातच सुरूवात होत असल्याने दरम्यान जनावरांवर अनेक रोगांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे उपाययोजना म्हणून जनावरांच्या आरोग्यासाठी जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात एकटांग्या, चौखुरा, घटसर्प यासह अनेक आजार जनावरांना होतात. दूषित पाण्यामुळे अनेक जनावरेही दगावतात व साथ रोगाचीही शक्यता पावसाळ्यात अधिक असते. (शहर प्रतिनिधी)