शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृती व प्रतिबंधात्मक शिबिरे घ्या

By admin | Updated: June 23, 2014 00:06 IST

पावसाळ्यात जनावरांना विविध रोगाची लागण होते. खरीप हंगामामुळे शेतकऱ्यांचे पशुधनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. उपचाराअभावी पशुधन दगावण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

पशुधन संवर्धन विभागाची बैठक : कृषी व पशुसंवर्धन सभापतींचे अधिकाऱ्यांना निर्देशगडचिरोली : पावसाळ्यात जनावरांना विविध रोगाची लागण होते. खरीप हंगामामुळे शेतकऱ्यांचे पशुधनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. उपचाराअभावी पशुधन दगावण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गावागावात पशुधन रोगासंबंधी जनजागृती व प्रतिबंधात्मक शिबिराचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन विभागाची बैठक जि. प. च्या सभागृहात पार पडली. सभापती गण्यारपवार पुढे बोलतांना म्हणाले की, पावसाळी हंगामात पशुसंवर्धन विभागाच्या विविध लोकोपयोगी योजनांची जनजागृती पथनाट्यातून करावी. तसेच पशुसंवर्धन मेळावे घेऊन गुरांचे रोग प्रतिबंधात्मक शिबिरे, शेतकऱ्यांच्या गृहभेटी असे उपक्रम राबवून पशुसंवर्धनाची सेवा पोहोचविण्याचे निर्देश दिले. कामधेनू दत्तक ग्राम योजनेंतर्गत जंतनाशक शिबिरे, गोचीड, गोमाशा निर्मुलन शिबिरे, वैरण विकास कार्यक्रम, जनावरांचे मलमुत्र व वाया गेलेल्या चाऱ्याचे खत व्यवस्थापन करणे या सव्र उपक्रमाचा जिल्ह्यातील गोरगरीब शेतकरी, शेतमजूर व बेरोजगाार युवक पशुपालकांना लाभ पोहोचविण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांना जनावरांकरिता पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध असलेल्या औषधी विषयी मार्गदर्शन करावे, असे निर्देश सभापती अतुल गण्यारपवार यांनी दिले. प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बुरले यांनी पॉलिक्निनिकवर आपल्या गुरांना नेऊन रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन पशुपालकांना केले. प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिरीष रामटेके यांनी खरीप हंगामाच्या कालावधीत विनापरवानगीने कोणीही मुख्यालयी गैरहजर राहू नये व आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व पशुपालकांना जागृत करून पशुपालकांची गृहभेट घेऊन गुरांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीला पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व कर्मचारी उपस्थित होते.पावसाळ्याला काही दिवसातच सुरूवात होत असल्याने दरम्यान जनावरांवर अनेक रोगांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे उपाययोजना म्हणून जनावरांच्या आरोग्यासाठी जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात एकटांग्या, चौखुरा, घटसर्प यासह अनेक आजार जनावरांना होतात. दूषित पाण्यामुळे अनेक जनावरेही दगावतात व साथ रोगाचीही शक्यता पावसाळ्यात अधिक असते. (शहर प्रतिनिधी)