शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
2
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
3
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
4
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
5
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
6
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
7
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
8
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
9
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
10
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
11
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
12
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
13
चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
14
मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!
15
IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!
16
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
17
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
18
कमाल! १ मार्काने नापास झाली पण रडत नाही बसली; जिद्दीने अभ्यास करून स्वप्न केलं साकार
19
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर

भामरागडला घ्या मंत्रिमंडळाची बैठक

By admin | Updated: February 20, 2015 01:09 IST

गडचिरोली : २००९ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ५२ पोलीस जवान शहीद झाले होते. जिल्ह्यातील वातावरणही पोलीस दलासाठी अनुकूल नव्हते.

लोकमत विशेषगडचिरोली : २००९ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ५२ पोलीस जवान शहीद झाले होते. जिल्ह्यातील वातावरणही पोलीस दलासाठी अनुकूल नव्हते. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेच्या चर्चेदरम्यान नक्षलवाद्यांच्या प्रश्नावर राज्याचे गृहमंत्री म्हणून आर. आर. पाटील उत्तर देण्यासाठी सज्ज होते. त्यावेळी विरोधी पक्षात असलेले बल्लारपूरचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चेत सहभागी होताना आर. आर. पाटील यांना गडचिरोलीचे पालकत्व तुम्ही स्वीकारले पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. आबांनी चर्चेच्यादरम्यानच हे आव्हान आपण स्वीकारणार असल्याचे सांगून गडचिरोलीचे पालकत्व तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून मागून घेतले. चर्चा संपल्यावर अनेकांना याचे आश्चर्य वाटले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आर. आर. पाटील यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद देणार होते. परंतु आबांनी गडचिरोलीच्या पालकमंत्री पदासाठी एक आव्हान म्हणून आग्रही भूमिका घेतली व जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले. त्यानंतरही विद्यमान वित्त व नियोजन तसेच वनमंत्री मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र मंत्रीमंडळाची एक बैठक भामरागडला झाली पाहिजे, या जिल्ह्याच्या समस्यांबाबत तत्कालीन आघाडी सरकार गंभीर नाही, असे म्हटले होते. एकटे आबा जिल्हा विकासासाठी धडपडत आहे. परंतु बाकी मंत्रीमंडळ गंभीर नाही, असे मुनगंटीवारांचे म्हणणे होते. आबांच्या प्रत्येक निर्णयाला त्यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार म्हणून प्रचंड पाठींबा दर्शविला होता. जिल्हा विकास प्राधिकरण निर्मितीचा मुद्दा असो, गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती असो, हे सारे मुद्दे त्यांनी लावून धरले होते. अनेकदा मुनगंटीवारांनी आपल्या स्वपक्षातील लोकांना आबांविरूध्द जिल्हा विकासाच्या संदर्भात जाहीररित्या प्रतिक्रिया नोंदवू नका, असेही सांगितले होते. एकूणच आबा व मुनगंटीवारांचा ऋणानुबंध त्यावेळीही कायम होता. आर. आर. पाटील यांनी आपल्या पालकमंत्री पदाच्या काळात सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनाच जिल्ह्यात आणले नाही तर तत्कालीन विरोधी पक्षनेते व विद्यमान महसूल मंत्री एकनाथ खडसे व विद्यमान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनाही हेलिकॉप्टरने अहेरी, सिरोंचाच्या दौऱ्यावर नेले होते. या भागातील समस्या त्यांनाही लोकांकडून ऐकविल्या होत्या. पूर्ण दिवस एकनाथ खडसे व रावते आर. आर. पाटील यांच्यासोबत जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आज आबा हयात नाही. राज्यांत सत्तांतरण झाले आहे. नव्या सरकारने आपली एक मंत्रीमंडळाची बैठक भामरागड येथे घेऊन आर. आर. पाटील यांना खरी आदरांजली द्यावी, अशी जिल्हावासीयांची अपेक्षा आहे. यानिमित्ताने मंत्रीही भामरागडला येतील. या भागाची ओळखही त्यांना होईल. (जिल्हा प्रतिनिधी)