शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

भामरागडला घ्या मंत्रिमंडळाची बैठक

By admin | Updated: February 20, 2015 01:09 IST

गडचिरोली : २००९ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ५२ पोलीस जवान शहीद झाले होते. जिल्ह्यातील वातावरणही पोलीस दलासाठी अनुकूल नव्हते.

लोकमत विशेषगडचिरोली : २००९ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ५२ पोलीस जवान शहीद झाले होते. जिल्ह्यातील वातावरणही पोलीस दलासाठी अनुकूल नव्हते. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेच्या चर्चेदरम्यान नक्षलवाद्यांच्या प्रश्नावर राज्याचे गृहमंत्री म्हणून आर. आर. पाटील उत्तर देण्यासाठी सज्ज होते. त्यावेळी विरोधी पक्षात असलेले बल्लारपूरचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चेत सहभागी होताना आर. आर. पाटील यांना गडचिरोलीचे पालकत्व तुम्ही स्वीकारले पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. आबांनी चर्चेच्यादरम्यानच हे आव्हान आपण स्वीकारणार असल्याचे सांगून गडचिरोलीचे पालकत्व तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून मागून घेतले. चर्चा संपल्यावर अनेकांना याचे आश्चर्य वाटले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आर. आर. पाटील यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद देणार होते. परंतु आबांनी गडचिरोलीच्या पालकमंत्री पदासाठी एक आव्हान म्हणून आग्रही भूमिका घेतली व जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले. त्यानंतरही विद्यमान वित्त व नियोजन तसेच वनमंत्री मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र मंत्रीमंडळाची एक बैठक भामरागडला झाली पाहिजे, या जिल्ह्याच्या समस्यांबाबत तत्कालीन आघाडी सरकार गंभीर नाही, असे म्हटले होते. एकटे आबा जिल्हा विकासासाठी धडपडत आहे. परंतु बाकी मंत्रीमंडळ गंभीर नाही, असे मुनगंटीवारांचे म्हणणे होते. आबांच्या प्रत्येक निर्णयाला त्यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार म्हणून प्रचंड पाठींबा दर्शविला होता. जिल्हा विकास प्राधिकरण निर्मितीचा मुद्दा असो, गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती असो, हे सारे मुद्दे त्यांनी लावून धरले होते. अनेकदा मुनगंटीवारांनी आपल्या स्वपक्षातील लोकांना आबांविरूध्द जिल्हा विकासाच्या संदर्भात जाहीररित्या प्रतिक्रिया नोंदवू नका, असेही सांगितले होते. एकूणच आबा व मुनगंटीवारांचा ऋणानुबंध त्यावेळीही कायम होता. आर. आर. पाटील यांनी आपल्या पालकमंत्री पदाच्या काळात सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनाच जिल्ह्यात आणले नाही तर तत्कालीन विरोधी पक्षनेते व विद्यमान महसूल मंत्री एकनाथ खडसे व विद्यमान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनाही हेलिकॉप्टरने अहेरी, सिरोंचाच्या दौऱ्यावर नेले होते. या भागातील समस्या त्यांनाही लोकांकडून ऐकविल्या होत्या. पूर्ण दिवस एकनाथ खडसे व रावते आर. आर. पाटील यांच्यासोबत जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आज आबा हयात नाही. राज्यांत सत्तांतरण झाले आहे. नव्या सरकारने आपली एक मंत्रीमंडळाची बैठक भामरागड येथे घेऊन आर. आर. पाटील यांना खरी आदरांजली द्यावी, अशी जिल्हावासीयांची अपेक्षा आहे. यानिमित्ताने मंत्रीही भामरागडला येतील. या भागाची ओळखही त्यांना होईल. (जिल्हा प्रतिनिधी)