शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

भामरागडला घ्या मंत्रिमंडळाची बैठक

By admin | Updated: February 20, 2015 01:09 IST

गडचिरोली : २००९ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ५२ पोलीस जवान शहीद झाले होते. जिल्ह्यातील वातावरणही पोलीस दलासाठी अनुकूल नव्हते.

लोकमत विशेषगडचिरोली : २००९ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ५२ पोलीस जवान शहीद झाले होते. जिल्ह्यातील वातावरणही पोलीस दलासाठी अनुकूल नव्हते. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेच्या चर्चेदरम्यान नक्षलवाद्यांच्या प्रश्नावर राज्याचे गृहमंत्री म्हणून आर. आर. पाटील उत्तर देण्यासाठी सज्ज होते. त्यावेळी विरोधी पक्षात असलेले बल्लारपूरचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चेत सहभागी होताना आर. आर. पाटील यांना गडचिरोलीचे पालकत्व तुम्ही स्वीकारले पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. आबांनी चर्चेच्यादरम्यानच हे आव्हान आपण स्वीकारणार असल्याचे सांगून गडचिरोलीचे पालकत्व तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून मागून घेतले. चर्चा संपल्यावर अनेकांना याचे आश्चर्य वाटले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आर. आर. पाटील यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद देणार होते. परंतु आबांनी गडचिरोलीच्या पालकमंत्री पदासाठी एक आव्हान म्हणून आग्रही भूमिका घेतली व जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले. त्यानंतरही विद्यमान वित्त व नियोजन तसेच वनमंत्री मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र मंत्रीमंडळाची एक बैठक भामरागडला झाली पाहिजे, या जिल्ह्याच्या समस्यांबाबत तत्कालीन आघाडी सरकार गंभीर नाही, असे म्हटले होते. एकटे आबा जिल्हा विकासासाठी धडपडत आहे. परंतु बाकी मंत्रीमंडळ गंभीर नाही, असे मुनगंटीवारांचे म्हणणे होते. आबांच्या प्रत्येक निर्णयाला त्यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार म्हणून प्रचंड पाठींबा दर्शविला होता. जिल्हा विकास प्राधिकरण निर्मितीचा मुद्दा असो, गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती असो, हे सारे मुद्दे त्यांनी लावून धरले होते. अनेकदा मुनगंटीवारांनी आपल्या स्वपक्षातील लोकांना आबांविरूध्द जिल्हा विकासाच्या संदर्भात जाहीररित्या प्रतिक्रिया नोंदवू नका, असेही सांगितले होते. एकूणच आबा व मुनगंटीवारांचा ऋणानुबंध त्यावेळीही कायम होता. आर. आर. पाटील यांनी आपल्या पालकमंत्री पदाच्या काळात सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनाच जिल्ह्यात आणले नाही तर तत्कालीन विरोधी पक्षनेते व विद्यमान महसूल मंत्री एकनाथ खडसे व विद्यमान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनाही हेलिकॉप्टरने अहेरी, सिरोंचाच्या दौऱ्यावर नेले होते. या भागातील समस्या त्यांनाही लोकांकडून ऐकविल्या होत्या. पूर्ण दिवस एकनाथ खडसे व रावते आर. आर. पाटील यांच्यासोबत जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आज आबा हयात नाही. राज्यांत सत्तांतरण झाले आहे. नव्या सरकारने आपली एक मंत्रीमंडळाची बैठक भामरागड येथे घेऊन आर. आर. पाटील यांना खरी आदरांजली द्यावी, अशी जिल्हावासीयांची अपेक्षा आहे. यानिमित्ताने मंत्रीही भामरागडला येतील. या भागाची ओळखही त्यांना होईल. (जिल्हा प्रतिनिधी)