शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

अटल विकास योजनेचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:34 IST

देशाचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल महापणन विकास अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शेतकरी, उत्पादन संस्था व महिला स्वयंसहायता गट यांच्या बटकटीकरणासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विकासाच्या विविध योजना असून शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले.

ठळक मुद्देआमदारांचे प्रतिपादन : देलनवाडी येथे अटल महापणन बी-बियाणे केंद्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : देशाचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल महापणन विकास अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शेतकरी, उत्पादन संस्था व महिला स्वयंसहायता गट यांच्या बटकटीकरणासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विकासाच्या विविध योजना असून शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले.आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देलनवाडीच्या वतीने अटल महापणन विकास अभियानांतर्गत बी-बियाणे विक्री शुभारंभ व कृषी मेळावा गुरूवारी घेण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन जि. प. सदस्य संपत आळे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बारीकराव पदा, उपाध्यक्ष रत्नाकर धाईत, जिल्हा व्यवस्थापक अतुल महाजन, पं. स. सदस्य किरण मस्के, सरपंच माणिक पेंदाम, मानापूरचे सरपंच धनिराम कुमरे, चांगदेव फाये, मन्साराम मडावी, उपप्रादेशिक व्यवस्थापक आर. एम. पेंदाम, पंकज खरवडे, नंदू पेट्टेवार, कृउबासचे संचालक विनोद खुणे, ईश्वर मडावी, महादेव मेश्राम, वासुदेव घोडमारे, व्यवस्थापक हेमंत शेंद्रे, चोखाराम मोहुर्ले, पुंडलिक अंबादे व शेतकरी उपस्थित होते. या केंद्रांमधून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे उपलब्ध होणार आहे. प्रास्ताविक बी. पी. घोडमारे, संचालन दिलीप कुमरे यांनी केले.मका आधारभूत किमतीत खरेदीमागील पाच वर्षांपासून जिल्ह्यात मक्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आधारभूत किमतीत मक्याची खरेदी करण्याकरिता केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकºयांनी केली होती. सदर मागणीचा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आला. त्यामुळे मकासुद्धा आधारभूत किमतीत खरेदी केला जाणार आहे. तसेच जे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहिले अशा शेतकºयांचे देखील कर्ज माफ होणार आहे, अशी माहितीही आ. कृष्णा गजबे यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली. या कार्यक्रमात शेतकºयांनी परिसरातील अनेक समस्या मांडून त्या सोडविण्याची मागणी केली असता आमदारांनी शेतकºयांना समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी मानापूर व देलनवाडी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Mahabeejमहाबीज