शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच व सचिवावर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2016 02:01 IST

तालुक्यातील नारायणपूर ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांनी स्वत:च्याच मर्जीने कारभार हाकण्यास सुरुवात केली आहे.

बीडीओंना निवेदन : नारायणपूर व अमरावती गावातील नारिकांची मागणीसिरोंचा : तालुक्यातील नारायणपूर ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांनी स्वत:च्याच मर्जीने कारभार हाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक विकास कामे रखडली आहेत. परिणामी येथील सरपंच व सचिव यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नारायणपूर व अमरावती येथील नागरिकांनी सिरोंचा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. एप्रिल २०१५ मध्ये निवडणुका झाल्या. त्यावेळी सरपंचपदावर भुदेवी दुर्गया गावडे यांची निवड करण्यात आली. सचिवपदावर एम. एल. मेश्राम हे मागील एक वर्षांपासून कार्यरत आहेत. गावाच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी सरपंच व सचिव दोघेही आपल्या मनमर्जीने खर्च करीत आहेत. कोणत्या कामासाठी किती निधी मंजूर झाला, किती निधी खर्च झाला व किती शिल्लक आहे, याचा हिशेब आमसभेत ठेवत नाही. १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाकरिता सचिव अनुपस्थितीत होते. १५ आॅगस्ट रोजीची तहकूब झालेली आमसभा १६ सप्टेंबर रोजी बोलविण्यात आली होती. जवळपास २०० नागरिक उपस्थित होते. पंतप्रधान घरकूल आवास योजनेवर नागरिक प्रश्न विचारणार असल्याचे बघून सचिवांनी ग्रामसभा तहकूब केली व निघून गेले. १५ आॅगस्टच्या आमसभेमध्ये ठेवण्यात आलेली विषय सूची न ठेवता फक्त घरकूल हा एकच विषय ठेवण्यात आला होता. नियमाप्रमाणे १५ आॅगस्टच्या आमसभेमध्ये जेवढे विषय ठेवण्यात आले होते, तेवढेच विषय त्यानंतरच्या ग्रामसभेमध्ये ठेवणे गरजेचे होते. सरपंच व सचिव यांच्या मनमानी कारभारामुळे नारायणपूर तसेच अमरावती गावाचा विकास रखडला आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी सिरोंचाचे संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी नागराजू नानय्या इंगीली, अशोक येलय्या इंगीली, गट्टू शिवनारायण चम्माकारी, रमेश येलय्या दाया, अशोक समय्या आरे, ओदयालू भिमय्या नसकुरी आदी उपस्थित होते.