शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

सरपंच व सचिवावर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2016 02:01 IST

तालुक्यातील नारायणपूर ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांनी स्वत:च्याच मर्जीने कारभार हाकण्यास सुरुवात केली आहे.

बीडीओंना निवेदन : नारायणपूर व अमरावती गावातील नारिकांची मागणीसिरोंचा : तालुक्यातील नारायणपूर ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांनी स्वत:च्याच मर्जीने कारभार हाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक विकास कामे रखडली आहेत. परिणामी येथील सरपंच व सचिव यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नारायणपूर व अमरावती येथील नागरिकांनी सिरोंचा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. एप्रिल २०१५ मध्ये निवडणुका झाल्या. त्यावेळी सरपंचपदावर भुदेवी दुर्गया गावडे यांची निवड करण्यात आली. सचिवपदावर एम. एल. मेश्राम हे मागील एक वर्षांपासून कार्यरत आहेत. गावाच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी सरपंच व सचिव दोघेही आपल्या मनमर्जीने खर्च करीत आहेत. कोणत्या कामासाठी किती निधी मंजूर झाला, किती निधी खर्च झाला व किती शिल्लक आहे, याचा हिशेब आमसभेत ठेवत नाही. १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाकरिता सचिव अनुपस्थितीत होते. १५ आॅगस्ट रोजीची तहकूब झालेली आमसभा १६ सप्टेंबर रोजी बोलविण्यात आली होती. जवळपास २०० नागरिक उपस्थित होते. पंतप्रधान घरकूल आवास योजनेवर नागरिक प्रश्न विचारणार असल्याचे बघून सचिवांनी ग्रामसभा तहकूब केली व निघून गेले. १५ आॅगस्टच्या आमसभेमध्ये ठेवण्यात आलेली विषय सूची न ठेवता फक्त घरकूल हा एकच विषय ठेवण्यात आला होता. नियमाप्रमाणे १५ आॅगस्टच्या आमसभेमध्ये जेवढे विषय ठेवण्यात आले होते, तेवढेच विषय त्यानंतरच्या ग्रामसभेमध्ये ठेवणे गरजेचे होते. सरपंच व सचिव यांच्या मनमानी कारभारामुळे नारायणपूर तसेच अमरावती गावाचा विकास रखडला आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी सिरोंचाचे संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी नागराजू नानय्या इंगीली, अशोक येलय्या इंगीली, गट्टू शिवनारायण चम्माकारी, रमेश येलय्या दाया, अशोक समय्या आरे, ओदयालू भिमय्या नसकुरी आदी उपस्थित होते.