शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

शेळीचा बळी अन् वाघीण अडकली; महिलेचा बळी घेणारी टी- १३ वाघीण जेरबंद

By गेापाल लाजुरकर | Updated: October 23, 2023 16:38 IST

३ दिवसात रेस्क्यू टीमने जंगलात पकडले

गडचिराेली : रामाळा शेतशिवारात मजूर महिलेचा बळी घेणाऱ्या टी-१३ या वाघिणीला वन विभागाच्या ताडाेबा येथील टीमने साेमवारी सकाळी ८ वाजता रवी नियत क्षेत्रात जेरबंद केले. तीन दिवसाच्या शाेधमाेहिमेनंतर रेस्क्यू टीमला यश मिळाले. आरमाेरी तालुक्याच्या रवी नियत क्षेत्रातील १२/१ मधील जंगल परिसरात ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पशुैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व शूटर अजय मराठे यांच्या रेस्क्यू टीमने अचूक अंदाज घेत वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद केले.

रामाळा-वैरागड रस्त्यालगतच्या जंगल परिसरात गेल्या महिनाभरापासून वाघाचा वावर आहे. या परिसरात तीन वाघ वावरत हाेते. सध्या दाेन वाघ अजूनही या भागात वावरत आहेत. १९ ऑक्टोबरला रामाळा येथील एका शेत शिवारात धान कापणी करणाऱ्या ताराबाई एकनाथ धोडरे या महिला मजुराचा टी-१३ वाघिणीने बळी घेतला होता. या घटनेने शेतकरी तसेच परिसरातील नागरिक धास्तावले होते.

गडचिरोलीचे वनसंरक्षक रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वडसा वनविभागाचे उपवसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक वनसंरक्षक संदीप भारती, आरमोरीचे परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी पवनकुमार जोंग, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, क्षेत्र सहायक राजेंद्र कुंभारे, वनरक्षक अजय उरकुडे, आनंद साखरे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे (वन्यजीव), शूटर अजय मराठे, आर.आर.टी.सदस्यांनी ही माेहीम राबविली.

शेळीचा बळी अन् वाघीण अडकलीलाेकांच्या मागणीनुसार ताडोबा व गडचिरोली येथून रेस्क्यू टीम बोलवण्यात आली. सदर टीम गेल्या तीन दिवसांपासून वाघाला जेरबंद करण्यासाठी शोधमोहीम राबवत हाेती. वाघाचा वावर असेलल्या परिसरात २५ ट्रॅप कॅमेरे लावून वाघाचे लाेकेशन शाेधले जात हाेते. विशेष म्हणजे, रविवारी अरसोडा-रवी जंगल परिसरात एका शेळीला ठार केले होते. त्यामुळे ती पुन्हा येईल म्हणून तेथे ट्रॅप कॅमेरे लावले हाेते. तसेच बेटसुद्धा ठेवला हाेता.

वाघिणीची रवानगी गाेरेवाड्यालासोमवारी पहाटे ४ वाजेपासून वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व रेस्क्यू टीमने पहारा देत सापळा रचला. सकाळी ८ वाजताच्या दरम्यान टी-१३ वाघीण येताच तिची ओळख पटवून शूट करून बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर वाघीण जेरबंद झाली. वाघिणीला वडसा वन विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले. टी-१३ वाघिणीला नागपूर येथील गोरेवाडा येथे नेण्यात येणार आहे.