शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

गडचिरोलीलाही स्वाईन फ्लूचा धोका

By admin | Updated: February 7, 2015 00:49 IST

स्वाईन फ्लू हा आजार भारतात २00९ मध्ये आला. त्यावेळी या आजारावरील उपचारही नव्हते. तरी मृत्यूची संख्या केवळ ६ टक्के होती.

गडचिरोली : स्वाईन फ्लू हा आजार भारतात २00९ मध्ये आला. त्यावेळी या आजारावरील उपचारही नव्हते. तरी मृत्यूची संख्या केवळ ६ टक्के होती. आज या आजारावर औषधोपचार वाढले असतानाही, मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. जानेवारी महिन्यात भारतात २0३८ रुग्ण स्वाईन फ्लूचे आढळले असून, १९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यात सावली येथे स्वाईन फ्लूच्या आजाराने ४२ वर्षीय रूग्णांचा मृत्यू झाला. तर चंद्रपूर जिल्ह्यात २० संशयीत रूग्णही आढळलेले आहे. गडचिरोली जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका मोठ्या प्रमाणावर असल्याने नागरिकांनी दक्ष राहून वेळीच उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी केले आहे.स्वाईन फ्लू हा श्वसनक्रियेसंबंधित होणारा आजार आहे. एच१एन१ या व्हायरसमुळे हा आजार होतो. हा व्हायरस डुकरांमध्ये आढळतो. डुकरांमधून माणसांमध्ये याचा प्रसार कमी प्रमाणात होतो. मात्र माणसांमध्ये याचा प्रसार झपाट्याने होतो. या आजाराची लक्षणे थंडी वाजून ताप येणे, खोकला, घसा खवखवणे, अंगदुखी, सर्दी, शिंका येणे, सुस्ती, थकवा, मळमळ, उलटी हे प्रकार दिसून येतात. थुंकीच्या माध्यमातून या आजाराचा प्रसार होतो. याचा व्हायरस २ तास जिवंत असतो. या आजाराचा वेळीच उपचार न झाल्यास न्युमोनिया होऊन रुग्णांचा मृत्यू होतो. या आजारापासून बचावण्यासाठी काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे. गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयांने स्वाईन फ्लू आजारासंदर्भात विशेष वार्ड उघडला आहे. या दोन वार्डात चार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या वार्डात व्हेंटिलेटर, आॅक्सिमीटर, मॉनिटरची व्यवस्था आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयास प्रत्येक ग्रामीण रूग्णालयात स्वाईन फ्लूचे औषधे पुरविण्यात आली आहेत. स्वाईन फ्लूचा संशयीत रूग्ण आढळून आल्यास त्याला तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्याचे आदेश ग्रामीण रूग्णालयांना देण्यात आले आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी आज व्हीडीओ कॉन्फरसींगद्वारे गुरूवारी जिल्ह्यातील स्वाईन फ्लू आजाराबाबतची माहिती जाणून घेतली, अशी माहिती डॉ. खंडाते यांनी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)