शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

प्राणहिताकाठी ‘स्वच्छतेची वारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

या स्वच्छता मोहिमेमुळे आता भाविकही निर्माल्य व इतर कचरा कचराकुंडीतच टाकताना दिसत आहेत. सिरोंचा घाटावर विविध दुकाने लागली आहेत. त्या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी सावलीची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. विविध सेवाभावी संस्थांकडून आहार वितरित केला जात आहे. यामुळे परिसरात कचरा निर्माण होत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा उचलणे शक्य नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : येथे १२ वर्षांनंतर भरलेल्या पुष्कर मेळ्यात दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या पूजा-अर्चेनंतर नदीपात्र आणि काठावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य व कचरा जमत आहे. हा कचरा सर्वत्र पसरत असल्याने त्यातून अस्वच्छता निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी पुष्करचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या संकल्पनेतून सर्व शासकीय विभागांनी मंगळवारी स्वच्छता मोहीम राबविली. विशेष म्हणजे यात जवळपासच्या शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला.यात सिरोंचातील राजे धर्मराव महाविद्यालय, सी.व्ही. रमण महाविद्यालय, भगवंतराव कला महाविद्यालय, अंकिसा येथील श्रीनिवास हायस्कूल, तसेच सिरोंचा सेवा समिती यांनी नदी घाट स्वच्छ करण्यासाठी सहभाग घेतला. तसेच यापूर्वी शासनाच्या महसूल, बांधकाम विभाग, कृषी विभाग व नगर पंचायत विभागाने स्वच्छता मोहीम राबविली होती. यामुळे जणू काही स्वच्छतेची वारीच प्राणहिताकाठी आल्याचे चित्र दिसत होते.या स्वच्छता मोहिमेमुळे आता भाविकही निर्माल्य व इतर कचरा कचराकुंडीतच टाकताना दिसत आहेत. सिरोंचा घाटावर विविध दुकाने लागली आहेत. त्या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी सावलीची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. विविध सेवाभावी संस्थांकडून आहार वितरित केला जात आहे. यामुळे परिसरात कचरा निर्माण होत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा उचलणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनाही स्वच्छतेचे महत्त्व कळावे यासाठी जनजागृती करणारा हा उपक्रम धनाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. त्यासाठी तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी योग्य नियोजन करून स्वच्छतेसाठी विविध संस्था, शाळांना एकत्रित आणले.

 अन् नदीकाठावरील  पाणी झाले स्वच्छ नदीतील गढूळ पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी नवीन मोटार पंप लावून त्याठिकाणी भाविकांना स्वच्छ पाण्यात आंघोळ करता येईल, अशी सोय करण्यात आली आहे. भाविकांना नदीपात्रात आंघोळ करण्यास अडचण येत असल्यास त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. परंतु नदीपात्रातील गर्दीमुळे बाहेर येणारे पाणीही गढूळ येत होते. ही समस्या दूर करण्यासाठी आता घाटापासून थोडे दूरचे पाणी स्वतंत्र पंपाद्वारे आंघोळीसाठी उपलब्ध केले जात आहे.

 

टॅग्स :riverनदीtourismपर्यटन