शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

प्राणहिताकाठी ‘स्वच्छतेची वारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

या स्वच्छता मोहिमेमुळे आता भाविकही निर्माल्य व इतर कचरा कचराकुंडीतच टाकताना दिसत आहेत. सिरोंचा घाटावर विविध दुकाने लागली आहेत. त्या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी सावलीची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. विविध सेवाभावी संस्थांकडून आहार वितरित केला जात आहे. यामुळे परिसरात कचरा निर्माण होत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा उचलणे शक्य नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : येथे १२ वर्षांनंतर भरलेल्या पुष्कर मेळ्यात दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या पूजा-अर्चेनंतर नदीपात्र आणि काठावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य व कचरा जमत आहे. हा कचरा सर्वत्र पसरत असल्याने त्यातून अस्वच्छता निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी पुष्करचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या संकल्पनेतून सर्व शासकीय विभागांनी मंगळवारी स्वच्छता मोहीम राबविली. विशेष म्हणजे यात जवळपासच्या शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला.यात सिरोंचातील राजे धर्मराव महाविद्यालय, सी.व्ही. रमण महाविद्यालय, भगवंतराव कला महाविद्यालय, अंकिसा येथील श्रीनिवास हायस्कूल, तसेच सिरोंचा सेवा समिती यांनी नदी घाट स्वच्छ करण्यासाठी सहभाग घेतला. तसेच यापूर्वी शासनाच्या महसूल, बांधकाम विभाग, कृषी विभाग व नगर पंचायत विभागाने स्वच्छता मोहीम राबविली होती. यामुळे जणू काही स्वच्छतेची वारीच प्राणहिताकाठी आल्याचे चित्र दिसत होते.या स्वच्छता मोहिमेमुळे आता भाविकही निर्माल्य व इतर कचरा कचराकुंडीतच टाकताना दिसत आहेत. सिरोंचा घाटावर विविध दुकाने लागली आहेत. त्या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी सावलीची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. विविध सेवाभावी संस्थांकडून आहार वितरित केला जात आहे. यामुळे परिसरात कचरा निर्माण होत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा उचलणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनाही स्वच्छतेचे महत्त्व कळावे यासाठी जनजागृती करणारा हा उपक्रम धनाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. त्यासाठी तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी योग्य नियोजन करून स्वच्छतेसाठी विविध संस्था, शाळांना एकत्रित आणले.

 अन् नदीकाठावरील  पाणी झाले स्वच्छ नदीतील गढूळ पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी नवीन मोटार पंप लावून त्याठिकाणी भाविकांना स्वच्छ पाण्यात आंघोळ करता येईल, अशी सोय करण्यात आली आहे. भाविकांना नदीपात्रात आंघोळ करण्यास अडचण येत असल्यास त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. परंतु नदीपात्रातील गर्दीमुळे बाहेर येणारे पाणीही गढूळ येत होते. ही समस्या दूर करण्यासाठी आता घाटापासून थोडे दूरचे पाणी स्वतंत्र पंपाद्वारे आंघोळीसाठी उपलब्ध केले जात आहे.

 

टॅग्स :riverनदीtourismपर्यटन