शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

प्राणहिताकाठी ‘स्वच्छतेची वारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

या स्वच्छता मोहिमेमुळे आता भाविकही निर्माल्य व इतर कचरा कचराकुंडीतच टाकताना दिसत आहेत. सिरोंचा घाटावर विविध दुकाने लागली आहेत. त्या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी सावलीची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. विविध सेवाभावी संस्थांकडून आहार वितरित केला जात आहे. यामुळे परिसरात कचरा निर्माण होत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा उचलणे शक्य नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : येथे १२ वर्षांनंतर भरलेल्या पुष्कर मेळ्यात दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या पूजा-अर्चेनंतर नदीपात्र आणि काठावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य व कचरा जमत आहे. हा कचरा सर्वत्र पसरत असल्याने त्यातून अस्वच्छता निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी पुष्करचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या संकल्पनेतून सर्व शासकीय विभागांनी मंगळवारी स्वच्छता मोहीम राबविली. विशेष म्हणजे यात जवळपासच्या शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला.यात सिरोंचातील राजे धर्मराव महाविद्यालय, सी.व्ही. रमण महाविद्यालय, भगवंतराव कला महाविद्यालय, अंकिसा येथील श्रीनिवास हायस्कूल, तसेच सिरोंचा सेवा समिती यांनी नदी घाट स्वच्छ करण्यासाठी सहभाग घेतला. तसेच यापूर्वी शासनाच्या महसूल, बांधकाम विभाग, कृषी विभाग व नगर पंचायत विभागाने स्वच्छता मोहीम राबविली होती. यामुळे जणू काही स्वच्छतेची वारीच प्राणहिताकाठी आल्याचे चित्र दिसत होते.या स्वच्छता मोहिमेमुळे आता भाविकही निर्माल्य व इतर कचरा कचराकुंडीतच टाकताना दिसत आहेत. सिरोंचा घाटावर विविध दुकाने लागली आहेत. त्या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी सावलीची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. विविध सेवाभावी संस्थांकडून आहार वितरित केला जात आहे. यामुळे परिसरात कचरा निर्माण होत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा उचलणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनाही स्वच्छतेचे महत्त्व कळावे यासाठी जनजागृती करणारा हा उपक्रम धनाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. त्यासाठी तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी योग्य नियोजन करून स्वच्छतेसाठी विविध संस्था, शाळांना एकत्रित आणले.

 अन् नदीकाठावरील  पाणी झाले स्वच्छ नदीतील गढूळ पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी नवीन मोटार पंप लावून त्याठिकाणी भाविकांना स्वच्छ पाण्यात आंघोळ करता येईल, अशी सोय करण्यात आली आहे. भाविकांना नदीपात्रात आंघोळ करण्यास अडचण येत असल्यास त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. परंतु नदीपात्रातील गर्दीमुळे बाहेर येणारे पाणीही गढूळ येत होते. ही समस्या दूर करण्यासाठी आता घाटापासून थोडे दूरचे पाणी स्वतंत्र पंपाद्वारे आंघोळीसाठी उपलब्ध केले जात आहे.

 

टॅग्स :riverनदीtourismपर्यटन