शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

१८ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षली दाम्पत्याचे आत्मसमर्पण, दोघेही डिव्हीजनल कमिटीचे सदस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 20:39 IST

गेल्या दिड दशकापेक्षा जास्त कालावधीपासून नक्षल चळवळीत विविध जबाबदा-या सांभाळणा-या आणि डिव्हीजनल कमिटीचे सदस्य असलेल्या तरुण नक्षली दाम्पत्याने गुरूवारी (दि.२५) गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यापुढे आत्मसमर्पण केले

गडचिरोली - गेल्या दिड दशकापेक्षा जास्त कालावधीपासून नक्षल चळवळीत विविध जबाबदा-या सांभाळणा-या आणि डिव्हीजनल कमिटीचे सदस्य असलेल्या तरुण नक्षली दाम्पत्याने गुरूवारी (दि.२५) गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यापुढे आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर प्रत्येकी ९ लाख २५ हजार रुपयांचे बक्षीस महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते.

दीपक उर्फ मंगरू सुकलू बोगामी (३०) आणि मोती उर्फ राधा झुरू मज्जी (२८) अशी या आत्मसमर्पित दाम्पत्याची नावे आहेत. यासंदर्भात पो.अधीक्षक बलकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक हा मूळचा छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्याचा रहिवासी आहे. २००१ मध्ये वयाच्या बाराव्या वर्षी तो नक्षल चळवळीत जागरगुंडा दलममध्ये दलम सदस्य म्हणून भरती झाला. २०१२ पासून आतापर्यंत माओवाद्यांच्या कंपनी क्रमांक ५ मध्ये डिव्हीजनल कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर १२ खून, ३ भूसुरुंग स्फोट आणि १७ चकमकीचे गुन्हे दाखल आहेत. 

मोती उर्फ राधा ही भामरागड तालुक्यातील भटपारची मूळची रहिवासी आहे. २००४ मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी ती भामरागड दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाली होती. डिसेंबर २०१७ पासून उत्तर बस्तर कंपनी क्रमांक १० मध्ये डिव्हीजनल कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होती. तिच्यावर २ खून आणि १५ चकमकीचे गुन्हे दाखल आहेत.

बक्षिसाच्या रकमेसह पुनर्वसनाचा लाभ

सदर नक्षली दाम्पत्यांवर असलेल्या एकूण १८ लाख ५० हजारांच्या बक्षीसाची रक्कम त्यांच्याच भविष्यातील नियोजनासाठी त्यांना दिली जाणार आहे. याशिवाय त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आत्मसमर्पण योजनेनुसार मिळणारे विविध लाभ आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

पोलिसांची आक्रमकता आणि आरोग्याच्या समस्येमुळे आत्मसमर्पण

पत्रकारांसमोर आपले मनोगत व्यक्त करताना आत्मसमर्पित दाम्पत्याने पोलिसांच्या आक्रमकतेमुळे नक्षल चळवळीवर दबाव वाढला असल्याची कबुली दिली. दिवसेंदिवस जंगलात फिरणे कठीण होत आहे. त्यात आपल्याला किडनीचा आजारही असल्यामुळे नक्षल चळवळ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे दीपकने सांगितले. २०१५ मध्ये दोघेही नक्षल्यांच्या बटालियन क्र.२ मध्ये असताना या दोघांचे लग्न झाले होते. पण मोजकेच दिवस एकत्र राहायला मिळाले. आता चळवळीतून बाहेर आल्याने शांततेचे जीवन जगायला मिळेल, असे ते म्हणाले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली