शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

सुरजागडची लोहखाण उठतेय सामान्यांच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:36 IST

एटापल्ली तालुक्यातील मगुंठा येथे दि. २६ फेब्रुवारी रोजी अशोक रामू कोरसामी या आदिवासी युवकाची भर कार्यक्रमातून नेऊन नक्षलवाद्यांनी हत्या ...

एटापल्ली तालुक्यातील मगुंठा येथे दि. २६ फेब्रुवारी रोजी अशोक रामू कोरसामी या आदिवासी युवकाची भर कार्यक्रमातून नेऊन नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. त्यावेळी ते नक्षलवादी कंपनीसाठी (लोहखाण) काम करत असल्याबद्दल त्याला बोलत होते. सुरजागड प्रकल्प नव्याने सुरू होत असल्याचे सांगत लॉयड मेटल्स व त्रिवेणी मायनिंग कंपनीने या कामासाठी माणसे मिळवून देण्यास आपल्या पतीला सांगितले होते. त्यामुळे तो चार महिन्यांपासून गावागावात जाऊन युवकांची कागदपत्रे गोळा करून देत होता. याला नक्षलवाद्यांचा विरोध असल्याने त्याचा राग मनात ठेवून नक्षलवाद्यांनी त्याला मारल्याचे मृतक अशोकची पत्नी बेबी हिने वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

(बॉक्स)

पोलीस सुरक्षेच्या भाड्याचे कोट्यवधी थकीत?

दोन वर्षांपूर्वी सदर लोहखाणीतून कच्चा माल काढताना आणि तो लॉयड मेटल्सच्या घुग्गुस येथील कारखान्यात नेताना मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागविला जात होता. त्याच्या भाड्यापोटी पोलीस विभागाची ४० कोटींपेक्षा जास्त रक्कम कंपनीकडे थकीत आहे. ते पैसे अजूनही कंपनीने भरलेले नसताना आता पुन्हा विनामोबदला सदर कंपनीला पोलीस संरक्षण मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोनसरीचा प्रकल्प अधांतरीच

सुरजागडच्या लोहखाणीला जिल्ह्यात लोहप्रकल्प उभारणीच्या अटीवरच लीज मंजूर केली होती. त्यासाठी कोनसरी येथे साडेतीन वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रस्तावित प्रकल्पाचे भूमिपूजनही झाले. पण नंतर लोहदगडांची वाहतूक सुरूच राहूनही प्रकल्पाच्या उभारणीत कोणतीही प्रगती झाली नाही. यावरून हा प्रकल्प खरोखरच गडचिरोली जिल्ह्यात होणार की नाही, यावरही आता प्रश्नचिन्ह लागले आहे.