शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

जिल्ह्याला खत पुरवठा होणार

By admin | Updated: June 28, 2014 23:33 IST

जिल्ह्यात खरीप हंगामास सुरूवात झाली असून अनेक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले आहेत. यासाठी खताची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांची अडचण होऊ नये, याकरिता जि. प. च्या कृषी विभागाने खताची मागणी केली आहे.

गडचिरोली : जिल्ह्यात खरीप हंगामास सुरूवात झाली असून अनेक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले आहेत. यासाठी खताची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांची अडचण होऊ नये, याकरिता जि. प. च्या कृषी विभागाने खताची मागणी केली आहे. यानुसार येत्या दोन दिवसात जिल्ह्याला राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅन्ड फर्टिलायझर्स कंपनीमार्फत २६०० मेट्रीक टन खताचा पुरवठा होणार आहे, अशी माहिती जि. प. चे कृषी विकास अधिकारी विजय कोळेकर यांनी दिली आहे.जि. प. च्या कृषी विभागामार्फत तालुका निहाय व कृषी केंद्र निहाय खताचा पुरवठा होणार आहे. नियोजनानुसार अहेरी तालुक्यातील ८ कृषी केंद्रांमध्ये १३६ मेट्रीक टन, आरमोरी तालुक्यातील ७ कृषी केंद्रांमध्ये २६० मेट्रीक टन, चामोर्शी तालुक्यातील ३४ कृषी केंद्रांमध्ये ५९१ मेट्रीक टन, धानोरातील ४ कृषी केंद्रांमध्ये ७५ मेट्रीक टन, गडचिरोलीतील ११ कृषी केंद्रांमध्ये ४३० मेट्रीक टन, कोरचीमधील २ कृषी केंद्रांमध्ये ३० मेट्रीक टन, कुरखेडामधील ११ कृषी केंद्रांमध्ये २२८ मेट्रीक टन, मुलचेरामधील १६ कृषी केंद्रांमध्ये २१० मेट्रीक टन, सिरोंचामधील २२ कृषी केंद्रांमध्ये ३२१ मेट्रीक टन, देसाईगंजमधील ८ कृषी केंद्रांमध्ये २६५ मेट्रीक टन, एटापल्ली तालुक्यातील कृषी केंद्रांना १० मेट्रीक टन व भामरागड तालुक्यातील २ कृषी केंद्रांमध्ये २० मेट्रीक टन खताचा पुरवठा करण्यात आहे. शेतकरी गटांना देसाईगंज येथील रेक पार्इंटवरून शेतकरी गटाच्या गावांपर्यत खत पोहोचविण्याचे कृषी विभागाचे नियोजन आहे. त्यामुळे शेतकरी गटांनी प्रती बॅग २८४ रूपये किंमतीनुसार खताची मागणी कृषी सहाय्यक अथवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तत्काळ नोंदवावी, असे आवाहन जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विठ्ठल कुडमुलवार, जि. प. चे कृषी विकास अधिकारी विजय कोळेकर यांनी केले आहे. जिल्ह्यात खताची टंचाई भासणार नसल्याचेही कृषी विभागाने म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)