शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

उन्हाळी धान लागवड घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 23:36 IST

जलसाठ्याअभावी यावर्षी उन्हाळी धान पिकाची लागवड घटण्याची शक्यता कृषी विभागा मार्फत व्यक्त केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी धान पिकाची लागवड करतात.

ठळक मुद्देजलसाठे आटले : अडीच हजार हेक्टरवर रोवणीचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जलसाठ्याअभावी यावर्षी उन्हाळी धान पिकाची लागवड घटण्याची शक्यता कृषी विभागा मार्फत व्यक्त केली जात आहे.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी धान पिकाची लागवड करतात. प्रामुख्याने आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, सिरोंचा व चामोर्शी तालुक्यातील काही भागात उन्हाळी धान पिकाची लागवड केली जाते. कडक उन्हाळ्यापर्यंत धानाला पाणी द्यावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यामुळे मुबलक पाणी साठा उपलब्ध असणे आवश्यक आहे.यावर्षी आॅक्टोबर महिन्यापासून पावसाने कायमची दडी मारली आहे. त्यामुळे बहुतांश तलाव, बोड्या व इतर जलसाठे आटले आहेत. पाण्याची पातळीही सरासरीपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे काही शेतकºयांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली नसल्याचे दिसून येते. उन्हाळी धान पिकाऐवजी शेतकºयांनी रबी हंगामातील इतर पिके घेण्याकडे वळला आहे. विशेष करून रबी हंगामात मक्याचे पीक चांगले येत असल्याने शेतकरी वर्ग मका पीक घेण्याकडे वळत चालला आहे. तर काही शेतकºयांनी भाजीपाला व इतर पिकांची लागवड केली आहे. उन्हाळी धान पिकाच्या रोवणीची कामे सुरू झाली आहेत.यावर्षी हंगामात जवळपास २ हजार २६० हेक्टरवर धानपिकाची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागामार्फत व्यक्त केला जात आहे. कृषी विभागाने आठ दिवसांपूर्वी गोळा केलेल्या माहितीनुसार गडचिरोली ८, कुरखेडा ३८, आरमोरी ८५, सिरोंचा ७०, अहेरी ३, कोरची २, देसाईगंज ४३ हेक्टरवर पºहे टाकण्यात आले आहेत. काही भागात रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे.रोवणीसाठी मोठ्या प्रमाणात मजूर उपलब्ध होत असल्याने रोवणीची कामे लवकरच आटोपतात. सिरोंचा तालुक्यात एकही मोठा सिंचन प्रकल्प नाही. तलाव, बोड्यांचीही संख्या कमी आहे. मात्र या तालुक्यातील शेतकरी केवळ बोअरच्या माध्यमातून धानाची शेती करतात. धानासोबतच इतरही पिकांची लागवड करतात. आसरअल्ली, अंकिसा परिसरातही मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानपीक मका यांची लागवड केली जात असल्याचे दिसून येते.उन्हाळी धान पिकाला मिळतो कमी भावखरीप हंगामातील धानापेक्षा उन्हाळी धान पिकाला कमी भाव मिळतो. खरीपातील धानाच्या तुलनेत या धान पिकाला खर्च अधिक राहतो. कडक उष्णता व जमिनीतील पाणी यामुळे दमट वातावरण निर्माण होऊन कधी कधी किडीचा प्रादुर्भाव वाढतो. उन्हाळ्यात वादळ वाºयासह पाऊस झाल्यास धान पिकाचे मोठे नुकसान होते. हा अनुभव शेतकºयांना येत चालला असल्याने काही शेतकरी या धान पिकाची लागवड करण्यास तयार होत नाही. मात्र जे शेतकरी उत्तमरीतीने धान पिकाची काळजी घेऊ शकतात, अशा शेतकºयांना धानाचे उत्पादन अधिक होत असल्याने हे शेतकरी दरवर्षी धानाची लागवड करतात. उलट इतरही पिकांची लागवड करतात.मक्याचे क्षेत्र वाढतीवरकमी खर्चात अधिक उत्पादन होत असल्याने शेतकरी वर्ग मका पिकाची लागवड करण्याकडे वळला असल्याचे दिसून येते. कुरखेडा, चामोर्शी भागामध्ये मका पिकाची लागवड केली आहे. एवढेच नव्हे तर मालेवाडा परिसरातील दुर्गम भागात सुध्दा मका लावला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती