शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

उन्हाळी धान लागवड घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 23:36 IST

जलसाठ्याअभावी यावर्षी उन्हाळी धान पिकाची लागवड घटण्याची शक्यता कृषी विभागा मार्फत व्यक्त केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी धान पिकाची लागवड करतात.

ठळक मुद्देजलसाठे आटले : अडीच हजार हेक्टरवर रोवणीचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जलसाठ्याअभावी यावर्षी उन्हाळी धान पिकाची लागवड घटण्याची शक्यता कृषी विभागा मार्फत व्यक्त केली जात आहे.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी धान पिकाची लागवड करतात. प्रामुख्याने आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, सिरोंचा व चामोर्शी तालुक्यातील काही भागात उन्हाळी धान पिकाची लागवड केली जाते. कडक उन्हाळ्यापर्यंत धानाला पाणी द्यावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यामुळे मुबलक पाणी साठा उपलब्ध असणे आवश्यक आहे.यावर्षी आॅक्टोबर महिन्यापासून पावसाने कायमची दडी मारली आहे. त्यामुळे बहुतांश तलाव, बोड्या व इतर जलसाठे आटले आहेत. पाण्याची पातळीही सरासरीपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे काही शेतकºयांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली नसल्याचे दिसून येते. उन्हाळी धान पिकाऐवजी शेतकºयांनी रबी हंगामातील इतर पिके घेण्याकडे वळला आहे. विशेष करून रबी हंगामात मक्याचे पीक चांगले येत असल्याने शेतकरी वर्ग मका पीक घेण्याकडे वळत चालला आहे. तर काही शेतकºयांनी भाजीपाला व इतर पिकांची लागवड केली आहे. उन्हाळी धान पिकाच्या रोवणीची कामे सुरू झाली आहेत.यावर्षी हंगामात जवळपास २ हजार २६० हेक्टरवर धानपिकाची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागामार्फत व्यक्त केला जात आहे. कृषी विभागाने आठ दिवसांपूर्वी गोळा केलेल्या माहितीनुसार गडचिरोली ८, कुरखेडा ३८, आरमोरी ८५, सिरोंचा ७०, अहेरी ३, कोरची २, देसाईगंज ४३ हेक्टरवर पºहे टाकण्यात आले आहेत. काही भागात रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे.रोवणीसाठी मोठ्या प्रमाणात मजूर उपलब्ध होत असल्याने रोवणीची कामे लवकरच आटोपतात. सिरोंचा तालुक्यात एकही मोठा सिंचन प्रकल्प नाही. तलाव, बोड्यांचीही संख्या कमी आहे. मात्र या तालुक्यातील शेतकरी केवळ बोअरच्या माध्यमातून धानाची शेती करतात. धानासोबतच इतरही पिकांची लागवड करतात. आसरअल्ली, अंकिसा परिसरातही मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानपीक मका यांची लागवड केली जात असल्याचे दिसून येते.उन्हाळी धान पिकाला मिळतो कमी भावखरीप हंगामातील धानापेक्षा उन्हाळी धान पिकाला कमी भाव मिळतो. खरीपातील धानाच्या तुलनेत या धान पिकाला खर्च अधिक राहतो. कडक उष्णता व जमिनीतील पाणी यामुळे दमट वातावरण निर्माण होऊन कधी कधी किडीचा प्रादुर्भाव वाढतो. उन्हाळ्यात वादळ वाºयासह पाऊस झाल्यास धान पिकाचे मोठे नुकसान होते. हा अनुभव शेतकºयांना येत चालला असल्याने काही शेतकरी या धान पिकाची लागवड करण्यास तयार होत नाही. मात्र जे शेतकरी उत्तमरीतीने धान पिकाची काळजी घेऊ शकतात, अशा शेतकºयांना धानाचे उत्पादन अधिक होत असल्याने हे शेतकरी दरवर्षी धानाची लागवड करतात. उलट इतरही पिकांची लागवड करतात.मक्याचे क्षेत्र वाढतीवरकमी खर्चात अधिक उत्पादन होत असल्याने शेतकरी वर्ग मका पिकाची लागवड करण्याकडे वळला असल्याचे दिसून येते. कुरखेडा, चामोर्शी भागामध्ये मका पिकाची लागवड केली आहे. एवढेच नव्हे तर मालेवाडा परिसरातील दुर्गम भागात सुध्दा मका लावला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती