शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

उन्हाळी धान लागवड घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 23:36 IST

जलसाठ्याअभावी यावर्षी उन्हाळी धान पिकाची लागवड घटण्याची शक्यता कृषी विभागा मार्फत व्यक्त केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी धान पिकाची लागवड करतात.

ठळक मुद्देजलसाठे आटले : अडीच हजार हेक्टरवर रोवणीचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जलसाठ्याअभावी यावर्षी उन्हाळी धान पिकाची लागवड घटण्याची शक्यता कृषी विभागा मार्फत व्यक्त केली जात आहे.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी धान पिकाची लागवड करतात. प्रामुख्याने आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, सिरोंचा व चामोर्शी तालुक्यातील काही भागात उन्हाळी धान पिकाची लागवड केली जाते. कडक उन्हाळ्यापर्यंत धानाला पाणी द्यावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यामुळे मुबलक पाणी साठा उपलब्ध असणे आवश्यक आहे.यावर्षी आॅक्टोबर महिन्यापासून पावसाने कायमची दडी मारली आहे. त्यामुळे बहुतांश तलाव, बोड्या व इतर जलसाठे आटले आहेत. पाण्याची पातळीही सरासरीपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे काही शेतकºयांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली नसल्याचे दिसून येते. उन्हाळी धान पिकाऐवजी शेतकºयांनी रबी हंगामातील इतर पिके घेण्याकडे वळला आहे. विशेष करून रबी हंगामात मक्याचे पीक चांगले येत असल्याने शेतकरी वर्ग मका पीक घेण्याकडे वळत चालला आहे. तर काही शेतकºयांनी भाजीपाला व इतर पिकांची लागवड केली आहे. उन्हाळी धान पिकाच्या रोवणीची कामे सुरू झाली आहेत.यावर्षी हंगामात जवळपास २ हजार २६० हेक्टरवर धानपिकाची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागामार्फत व्यक्त केला जात आहे. कृषी विभागाने आठ दिवसांपूर्वी गोळा केलेल्या माहितीनुसार गडचिरोली ८, कुरखेडा ३८, आरमोरी ८५, सिरोंचा ७०, अहेरी ३, कोरची २, देसाईगंज ४३ हेक्टरवर पºहे टाकण्यात आले आहेत. काही भागात रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे.रोवणीसाठी मोठ्या प्रमाणात मजूर उपलब्ध होत असल्याने रोवणीची कामे लवकरच आटोपतात. सिरोंचा तालुक्यात एकही मोठा सिंचन प्रकल्प नाही. तलाव, बोड्यांचीही संख्या कमी आहे. मात्र या तालुक्यातील शेतकरी केवळ बोअरच्या माध्यमातून धानाची शेती करतात. धानासोबतच इतरही पिकांची लागवड करतात. आसरअल्ली, अंकिसा परिसरातही मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानपीक मका यांची लागवड केली जात असल्याचे दिसून येते.उन्हाळी धान पिकाला मिळतो कमी भावखरीप हंगामातील धानापेक्षा उन्हाळी धान पिकाला कमी भाव मिळतो. खरीपातील धानाच्या तुलनेत या धान पिकाला खर्च अधिक राहतो. कडक उष्णता व जमिनीतील पाणी यामुळे दमट वातावरण निर्माण होऊन कधी कधी किडीचा प्रादुर्भाव वाढतो. उन्हाळ्यात वादळ वाºयासह पाऊस झाल्यास धान पिकाचे मोठे नुकसान होते. हा अनुभव शेतकºयांना येत चालला असल्याने काही शेतकरी या धान पिकाची लागवड करण्यास तयार होत नाही. मात्र जे शेतकरी उत्तमरीतीने धान पिकाची काळजी घेऊ शकतात, अशा शेतकºयांना धानाचे उत्पादन अधिक होत असल्याने हे शेतकरी दरवर्षी धानाची लागवड करतात. उलट इतरही पिकांची लागवड करतात.मक्याचे क्षेत्र वाढतीवरकमी खर्चात अधिक उत्पादन होत असल्याने शेतकरी वर्ग मका पिकाची लागवड करण्याकडे वळला असल्याचे दिसून येते. कुरखेडा, चामोर्शी भागामध्ये मका पिकाची लागवड केली आहे. एवढेच नव्हे तर मालेवाडा परिसरातील दुर्गम भागात सुध्दा मका लावला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती