शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
3
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
4
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
5
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
6
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
7
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
8
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
9
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
10
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
11
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
12
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
13
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
14
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
15
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
16
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
17
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
18
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
19
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
20
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?

उन्हाळ्यातही पर्यटकांना खुणावतोय सोमनूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 23:56 IST

दक्षिणेकडील सिरोंचा तालुका वनवैभवाच्या दृष्टीने उत्यत्तम मानला जातो़ या तालुक्यात सोमनूर हे त्रिवेणी संगमाचे ठिकाण आहे़ सभोवताल विविध प्रजातींच्या वृक्षांनी नटलेला डोंगरदऱ्यातील निसर्गरम्य परिसर आहे. हे पर्यटनासाठी उत्तम ठिकाण असून पर्यटकाचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । त्रिवेणी संगम; खळखळणारे पाणी वेधते पर्यटकांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : दक्षिणेकडील सिरोंचा तालुका वनवैभवाच्या दृष्टीने उत्यत्तम मानला जातो़ या तालुक्यात सोमनूर हे त्रिवेणी संगमाचे ठिकाण आहे़ सभोवताल विविध प्रजातींच्या वृक्षांनी नटलेला डोंगरदऱ्यातील निसर्गरम्य परिसर आहे. हे पर्यटनासाठी उत्तम ठिकाण असून पर्यटकाचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे.इंद्रावती, गोदावरी व अदृष्य सरस्वती अशा तीन नद्याचा संगामचे पवित्र ठिकाण सोमनूर संगमाला म्हणतात. येथून महाराष्ट्र, छत्तीसगड व आंध्रप्रदेश राज्याची सीमा बघायला मिळते. या दृष्टीने बघितल्यास हे तीन नद्यांच्या संगमासोबतच तीन राज्यांच्या संगमाचेही स्थळ आहे़ सोमनूर येथे संगमाच्या पहाडीवर भगवान शंकराचे मंदिर आहे़ नदीपात्रातसुध्दा शिवलिंग, नदी, नागदेवतांच्या मुर्ती विराजमान आहे. नदीपात्रात लहान मोठे खडक आहेत. त्यावरून पाण्याचा प्रवाह वाहताना खळखळाट करत मधुर नादध्वनी करीत पुढे जातो. येथील पाणी अतिशय नितळ व पारदर्शक आहे़ या पाण्याच्या प्रवाहातील पात्रातील रेती स्पष्ट दिसते़ पाण्याच्या अगदी खाली काही इंचांवर रेती आहे असे वाटते़पण, प्रत्यक्षात ती रेती कित्येक फुट खोल असते़ असे हे अनोखे दृष्टिभ्रम निर्माण करणारे स्थळ आहे़ इंद्रावती नदी पूर्ण दक्षिणेकडे वाहून दक्षिण पश्चिमेकडे वळण घेते. या ठिकाणच्या नदीचे पात्र मोठे आहे. पाणी, वाळू आणि दगडाने भरलेला परिसर असल्याने व नदीचा दोन्ही बाजूला निसर्गरम्य दिसून येते.पर्यटनदृष्ट्या विकास रखडलाजंगल असल्याने या भागाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यास खुप वाव आहे. या भागाचा विकास झाल्यास तिन्ही राज्याचे पर्यटकांना उच्च कोटीच्या सौंदर्याने नटलेला परिसर पहावयास मिळेल. राज्य शासनाने पर्यटनासाठी येणाऱ्यांना योग्य सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. हजारो भाविक गंगास्नानासाठी येतात. सर्वदूर विस्तीर्ण वनवैभव, विविध प्रजातींच्या पाखरांचा किलबिलाट, विरळ लोकवस्तीमुळे एक अनामिक शांतता हे या स्थळाचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पर्यटक आकर्षित होतात.

टॅग्स :tourismपर्यटन