शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

पुरेशी बियाणे उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 23:56 IST

खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील कृषी केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन २७ हजार ७४१ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले होते. त्यापैकी सुमारे २३ हजार ४२९ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील कृषी केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन २७ हजार ७४१ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले होते. त्यापैकी सुमारे २३ हजार ४२९ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहेत.खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला असून शेतकऱ्यांची बियाणे खरेदीची लगबग वाढली आहे. काही शेतकरी घरचे बियाणे वापरतात. तर काही शेतकरी कंपन्यांकडून खरेदी केलेले बियाणे वापरतात. एकूण बियाणे वापराच्या बियाणे बदलाचे प्रमाण जवळपास ५० टक्के एवढे आहे. म्हणजेच जिल्हाभरातील शेतीसाठी जेवढे बियाणे लागतील, त्याच्या निम्मे बियाणे कृषी केंद्रांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावे लागतात. २०१८ च्या खरीप हंगामात कृषी विभागाने एकूण २७ हजार ७४१ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले होते. ६ जूनपर्यंत त्यापैकी २३ हजार ४२९ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहेत. नियोजनाच्या जवळपास ९० टक्के बियाणे उपलब्ध झाले आहेत. जिल्हाभरात पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे विक्रेत्यांना अधिकची किंमत देऊ नये, असे आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक धानपिकाची लागवड केली जाते. त्यामुळे याच पिकाच्या बियाणांची सर्वाधिक मागणी होते. सुमारे २६ हजार ७४० क्विंटल धान पिकाचे बियाणे उपलब्ध करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले होते. त्यापैकी २३ हजार ३०३ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहेत.शेतकऱ्यांमध्ये जागरूकता आल्याने शेतकरी आता कृषी केंद्र चालकांकडून पक्के बिल मागत आहेत. तरीही काही कृषी केंद्रचालक शेतकऱ्यांना कच्चे बिल देऊन त्यांची फसवणूक करीत असल्याचे दिसून येते. कृषी विभागाने बियाणे व खते विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केला आहे. या पथकाने कृषी केंद्र चालकांच्या बिलांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.