शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

टॉवर वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:34 IST

गडचिरोली : माेबाइल टाॅवरची रेंत कमी राहत असल्याने नागरिकांना दोन-तीनदा फोन करूनही संपर्क होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे दूरसंचार ...

गडचिरोली : माेबाइल टाॅवरची रेंत कमी राहत असल्याने नागरिकांना दोन-तीनदा फोन करूनही संपर्क होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन नवीन टॉवरची निर्मिती करावी. नवीन टाॅवरसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, निधीसाठी आपण पाठपुरावा करू, असे आवाहन खासदार अशाेक नेते यांनी केले.

भारत संचार निगम लिमिटेडच्या वतीने आयोजित जिल्हा दूरसंचार सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत विविध कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. जिल्हा दूरसंचार सल्लागार समिती गडचिरोलीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक खासदार अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली दूरसंचार विभागाच्या विश्रामगृहात पार पडली. बैठकीला दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य तथा भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, समितीचे सदस्य सदानंद कुथे, सदस्य डॉ. भारत खटी, महिला आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य रेखाताई डोळस, जिल्हा दूरसंचार अधिकारी खंडेलवाल, बीएसएनएलचे अधिकारी किशोर कापगते, गोन्नाडे व दूरसंचार विभागाचे सर्व तालुक्याचे जेटीओ, अधिकारी व तंत्रज्ञ उपस्थित होते.

यावेळी अधिकाऱ्यांना निर्देश देताना खासदार अशोक नेते म्हणाले, जिल्ह्याच्या अनेक भागात रेंज राहत नसल्याने जिल्ह्यातील टॉवरचे सर्वेक्षण करून आवश्यक त्याठिकाणी टॉवर मंजूर करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. तसेच सर्व ग्रामपंचायतींना डिजिटल करून त्यांना इंटरनेट सेवेने जोडण्याच्या सूचनाही यावेळी खासदार अशोक नेते यांनी केल्या. कव्हरेज राहत नसलेल्या ठिकाणी व दुर्गम तालुक्यात मायक्रो बीटीएस सुविधा लावून नागरिकांना योग्य सेवा देण्याचे निर्देशही यावेळी खासदारांनी दिले. या आढावा बैठकीत इतर समितीच्या सदस्यांनी विविध विषय मांडले व त्यावर चर्चा करण्यात आली.

बाॅक्स

फाेर-जी सेवा सुरू करा

जिल्ह्यात बीएसएनएलची फाेर-जी सेवा सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करावा. खासगी कंपन्या अतिरिक्त रेंज ठेवत असल्याने रेडिएशन वाढत आहे. त्यामुळे पशु-पक्षी यांना धोका होत असून, मानवी जीवनातही काही दुष्परिणाम जाणवत आहे. त्याचावर नियंत्रण आणण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सूचना यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिल्या.