शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

विद्यार्थ्यांनो! यश-अपयशाचा विचार न करता प्रयत्न करा

By admin | Updated: September 17, 2015 01:38 IST

विद्यार्थ्यांनी यश, अपयशाचा विचार न करता सतत प्रयत्न करावे व यश संपादन करावे, शिक्षणात मोठे व्हायचे असल्यास अपमानाच्या पलीकडे...

कुलगुरूंचे आवाहन : शासकीय विज्ञान महाविद्यालयात मुक्त संवादगडचिरोली : विद्यार्थ्यांनी यश, अपयशाचा विचार न करता सतत प्रयत्न करावे व यश संपादन करावे, शिक्षणात मोठे व्हायचे असल्यास अपमानाच्या पलीकडे गेल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीचे अवलोकन करता येत नाही, असे मत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी मांडले.गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी-प्राध्यापक यांच्याशी मुक्त सुसंवाद साधताना बुधवारी सकाळी ते बोलत होते. डॉ. नामदेव कल्याणकर यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम शासकीय विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा घेतला.याप्रसंगी ते म्हणाले की, कुलगुरू पदासाठी आजवर पाचवेळा मुलाखती दिल्या. शेवटी गोंडवाना विद्यापीठात कुलगुरू म्हणून आपली नियुक्ती झाली. अपयशाने खचून जाता कामा नये व यशाने हुरहुरून जाऊ नये, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारून आठवडा लोटला. अतिशय तळमळीने आपण काम सुरू केले आहे, असे सांगून ते म्हणाले की, विद्यापीठ निर्मितीमागे शासनाचा पहिला उद्देश सामाजिक समता निर्माण करणे हा आहे. त्यातून पुढे विद्यापीठात पुढील वर्षी किमान तीन पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम सुरू करू व मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सहकार्याने हे अभ्यासक्रम चालविले जातील. विद्यापीठात संशोधनावर जास्त भर देण्याची गरज आहे व यादृष्टीने आपण काम करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. जैव तंत्रज्ञान, रसायन प्रद्योगिकी व माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात आपण गोंडवाना विद्यापीठाला पुढे नेऊ, असेही ते म्हणाले. त्यासोबतच संशोधनाकरिता शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहो, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांशी त्यांनी थेट संवाद साधला. त्यांच्याकडून प्रश्न जाणून घेऊन त्याला उत्तर दिली.या कार्यक्रमाला शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयराम खोब्रागडे, प्रा. वाघमारे, प्रा. साळुंखे, प्रा. भावसार, प्रा. अष्टपुत्रे, प्रा. कासर्ला, प्रा. सेरिया, प्रा. पुसाला, प्रा. नासरे, प्रा. तायवाडे, प्रा. कोला, प्रा. बोदलकार, प्रा. शेख, प्रा. दुर्गा, प्रा. बंदे, प्रा. भैसारे आदींसह स्थानिक व्यवस्थापन समितीचे माणिक भुडे, सुमती मुनघाटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्राची गणवीर तर आभार अधिर इंगोले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. अष्टपुत्रे, जयश्री नंदेश्वर, अर्चना शिवणकर, यामिनी सोनुले, शिल्पा सहारे, पल्लवी तोरे, रोहिणी कांबळे, संपदा पायाळ, चेतना वासेकर, प्राची दुधबळे यांनी सहकार्य केले.