शहरं
Join us  
Trending Stories
1
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
2
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
3
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
4
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
5
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
6
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
7
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
8
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
9
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
10
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
11
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
12
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
13
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
14
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
15
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
16
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
17
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
19
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
20
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे दुपारचे भोजन घरच्या डब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:36 IST

केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. मात्र अहेरी तालुक्यातील २०७ शाळांमध्ये आहार बनविण्यासाठी आवश्यक असलेला तांदूळ व इतर कडधान्याचा पुरवठा अद्यापही करण्यात आला नाही.

ठळक मुद्देअहेरी तालुक्यातील वास्तव : तांदूळ व कडधान्य पुरवठ्याअभावी योजना ठप्प

विवेक बेझलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. मात्र अहेरी तालुक्यातील २०७ शाळांमध्ये आहार बनविण्यासाठी आवश्यक असलेला तांदूळ व इतर कडधान्याचा पुरवठा अद्यापही करण्यात आला नाही. परिणामी अहेरी शहरासह अनेक ठिकाणच्या शाळांमधील विद्यार्थी घरून आणलेल्या डब्ब्यावर दुपारचे भोजन आटोपत असल्याचे विदारक वास्तव उजेडात आले आहे. शासनाची ही योजना गेल्या सात-आठ दिवसांपासून तालुक्यात ठप्प आहे.अहेरी पंचायत समितीमधील एकूण २०७ शाळांना शालेय पोषण आहार योजना लागू आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या १९३ शाळांचा समावेश आहे. उर्वरित शाळा खासगी व्यवस्थापनाच्या आहेत. विद्यार्थ्यांची शाळेतील पटसंख्या टिकावी, गळती थांबावी तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने शासनाने शालेय पोषण आहार योजना कार्यान्वित केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून अहेरी तालुक्यातील शाळांना तांदूळ व इतर कडधान्याचा पुरवठा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरून डब्बा आणून दुपारचे भोजन करावे लागत आहे. अहेरी तालुक्यातील अर्ध्याअधिक शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना बंद असल्याची माहिती आहे. सदर योजनेअंतर्गत शासनाने सुुरुवातीलाच सर्व शाळांना इंधन व इतर बाबींसाठी खर्च करावा व यापोटी येणारे बिल सादर करावे, असे सांगण्यात आले. शाळांचे मुख्याध्यापक व योजनेच्या प्रमुखांनी काही दिवस स्वत: पुढाकार घेऊन या योजनेसाठी खर्च केला. मात्र शासनाद्वारे पुरविण्यात येणारे तांदूळ पुरवठा करणे बंद झाले. शाळास्तरावर तांदूळ व इतर साहित्याची खरेदी करून त्याचे बिल सादर करावे, अशा शासनाच्या सूचना होत्या. मात्र याबाबीला अनेक शाळांचे मुख्याध्यापक असमर्थता दाखवित असल्याने विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनावर संक्रात येण्याची शक्यता आहे.शासनाने इयत्ता पहिली ते पाचवीसाठी प्रती विद्यार्थी १०० ग्रॅम तांदूळ व इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना १५० ग्रॅम तांदूळ देण्याचे या योजनेत नमूद केले. सदर योजना लागू असलेल्या अहेरी तालुक्यातील एकूण २०७ शाळांमध्ये ५ हजार ५८ मुले व ४ हजार ७७८ मुली असे एकूण ९ हजार ८३६ विद्यार्थी सदर शालेय पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत. यामध्ये ६ हजार ४१४ विद्यार्थी प्राथमिक श्रेणीत येतात.या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० ग्रॅमनुसार ६४१ किलो ग्रॅम तांदूळ व माध्यमिक शाळांमधील ३ हजार ४२२ विद्यार्थ्यांना १५० ग्रॅम प्रमाणे ५१३ किलो ग्रॅम तांदूळ दररोज लागते. एकंदरीत १ हजार १५४ किलो ग्रॅम तांदूळ अहेरी तालुक्यातील या सर्व शाळांना आवश्यक आहे. मात्र पुरवठ्याअभावी आहार बंद आहे.जास्त पटसंख्येच्या शाळांतील विद्यार्थी वंचितअहेरी तालुक्यातील ज्या लहान शाळांमध्ये १ ते ३० पर्यंत पटसंख्या आहे, अशा शाळांमधील मुख्याध्यापक उधारीवर तांदूळ व कडधान्य खरेदी करून विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ देत आहेत. मात्र १०० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांना एका दिवशी भरपूर प्रमाणात तांदूळ लागत असल्याने अशा शाळांमधील मुख्याध्यापकांनी साहित्याची जुळवाजुळव करण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे तालुक्यातील मोठ्या शाळांमधील विद्यार्थी मध्यान्ह भोजन योजनेपासून वंचित आहेत. परिणामी अनेक शाळांचे विद्यार्थी काही दिवसांपासून घरून भोजनाचे डब्बे नेत आहेत.आम्ही संपूर्ण शाळांसाठी पोषण आहाराकरिता लागणारे तांदूळ व कडधान्याच्या मागणीची यादी जि.प. स्तरावर पाठविली. मात्र तांदूळ पुरवठ्याची कंत्राट प्रक्रिया न झाल्यामुळे तांदूळ व इतर साहित्याचा पुरवठा झालेला नाही. अशा परिस्थितीत तालुक्यातील ही योजना लागू असलेल्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना आपल्या स्तरावरील या साहित्याची खरेदी करून विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्याध्यापकांनी बिल सादर करावे, असेही त्यांना सांगण्यात आले आहे.- निर्मला वैद्य, प्रभारी गटशिक्षणाधिकारी,पंचायत समिती, अहेरी