शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पाचवीपासून शाळा सोडलेले विद्यार्थी पोहोचले दहावीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:38 IST

सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील वेंकटेश्वर शिक्षण संस्थेद्वारा संचालित श्रीनिवास हायस्कूलमध्ये पाचवीपासून शाळा सोडलेले अनेक विद्यार्थी पुढचे सर्व वर्ग उत्तीर्ण होऊन दहावीच्या हजेरीपटावर पोहोचल्याचा रहस्यमय प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देहजेरीपटाचे गूढ रहस्य : शिष्यवृत्ती, पोषण आहारासह इतर लाभ लाटल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील वेंकटेश्वर शिक्षण संस्थेद्वारा संचालित श्रीनिवास हायस्कूलमध्ये पाचवीपासून शाळा सोडलेले अनेक विद्यार्थी पुढचे सर्व वर्ग उत्तीर्ण होऊन दहावीच्या हजेरीपटावर पोहोचल्याचा रहस्यमय प्रकार घडला आहे. यासंदर्भात संस्थेच्या माजी सचिवानेच शिक्षणमंत्र्यांसह सर्व संबंधित अधिकाºयांकडे तक्रारी केल्या. पण या प्रकाराची गांभिर्याने दखल घेण्याऐवजी शिक्षण विभागाकडून थातूरमातूर अहवाल तयार करून या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.अंकिसाच्या श्रीनिवास हायस्कूलमध्ये गेल्यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात हा प्रकार घडला. मार्च २०१७ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेसाठी शाळेतील २७ विद्यार्थ्यानी फॉर्मच भरले नसल्याचे लक्षात आल्यानंतर संस्थेचे माजी सचिव श्रीनिवास वनमामुला यांनी या प्रकाराचा मागोवा घेतला. ते २७ विद्यार्थी शाळेत कधी येतच नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रत्यक्ष विद्यार्थी व त्यांच्या पालकांची भेट घेऊन चौकशी केली असता पाचवीपासूनच शाळा सोडल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. एवढेच नाही तर ते अनुपस्थित विद्यार्थी कधी वर्गातही येत नव्हते असे शाळेत नियमित येणाºया विद्यार्थ्यांनी सांगितले.वनमामुला यांनी या शाळेत येणाºया विद्यार्थ्यांच्या बयाणाचे व्हिडीओ रेकॉर्र्डिंग करून तसेच अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांचे लेखी बयाण घेऊन या गंभीर प्रकाराबाबत वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. मात्र शिक्षणाधिकाºयांपासून सर्वांनी थातूरमातूर चौकशीपलिकडे कोणतीही कारवाई केली नाही.शासनाच्या नियमानुसार शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शाळेत टाकल्यानंतर त्यांना नापास करता येत नाही, अशी बाजू मुख्याध्यापक वाढई यांनी मांडली. मात्र पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थी पुढच्या वर्गात ढकलत नेताना त्यांच्या नावावर येणारा शालेय पोषण आहार, शिष्यवृत्ती अशा योजना लाटल्या असण्याची शक्यता तक्रारकर्ते श्रीनिवास वनमामुला यांनी व्यक्त केली आहे.विशेष म्हणजे यासंदर्भात तक्रार केल्यानंतर शिक्षणाधिकाºयांनी गटशिक्षणाधिकाºयांमार्फत थातुरमातूर चौकशी केली. पण वनमामुला यांनी पुनचौकर्शीचे पत्र शिक्षण उपसंचालक, शिक्षण सचिवांना दिल्यानंतर त्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी गुढे यांना दिले. त्यांनी ४ आॅक्टोबर २०१७ ला दिलेल्या आपल्या चौकशी अहवालात मुख्याध्यापकाचा हवाला देत ते २७ विद्यार्थी हलाखीच्या परिस्थितीमुळे शेतात काम करायला जातात, त्यामुळे परीक्षेला प्रविष्ठ झाले नाही असे म्हटले. मात्र त्या विद्यार्थ्यांची, पालकांची किंवा तक्रारकर्ते वनमामुला यांची भेट, बयाण घेतले नाही.या शाळेत पाचवी ते दहावीपर्यंत असे १५० ते २०० बोगस विद्यार्थी असून त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिक्षण मंत्रालयाकडे केली आहे.अपहाराची कबुली, पण कारवाई नाहीशिक्षणाधिकाºयांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये दिलेल्या चौकशी अहवालात श्रीनिवास हायस्कूलमधील अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती २००८-०९ पासून २००१२-१३ पर्यंत प्रलंबित असल्याचे तसेच २०१३-१४ मध्ये शिष्यवृत्तीत अपहार केल्याचे निदर्शनास आले, असे अहवालात म्हटले आहे. मात्र अपहार झाल्याचे दिसत असताना कारवाई मात्र काहीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या सर्व गैरप्रकारांना शिक्षण विभागाचे तर पाठबळ नाही ना? अशी दाट शंका उपस्थित होत आहे.