शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पाचवीपासून शाळा सोडलेले विद्यार्थी पोहोचले दहावीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:38 IST

सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील वेंकटेश्वर शिक्षण संस्थेद्वारा संचालित श्रीनिवास हायस्कूलमध्ये पाचवीपासून शाळा सोडलेले अनेक विद्यार्थी पुढचे सर्व वर्ग उत्तीर्ण होऊन दहावीच्या हजेरीपटावर पोहोचल्याचा रहस्यमय प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देहजेरीपटाचे गूढ रहस्य : शिष्यवृत्ती, पोषण आहारासह इतर लाभ लाटल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील वेंकटेश्वर शिक्षण संस्थेद्वारा संचालित श्रीनिवास हायस्कूलमध्ये पाचवीपासून शाळा सोडलेले अनेक विद्यार्थी पुढचे सर्व वर्ग उत्तीर्ण होऊन दहावीच्या हजेरीपटावर पोहोचल्याचा रहस्यमय प्रकार घडला आहे. यासंदर्भात संस्थेच्या माजी सचिवानेच शिक्षणमंत्र्यांसह सर्व संबंधित अधिकाºयांकडे तक्रारी केल्या. पण या प्रकाराची गांभिर्याने दखल घेण्याऐवजी शिक्षण विभागाकडून थातूरमातूर अहवाल तयार करून या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.अंकिसाच्या श्रीनिवास हायस्कूलमध्ये गेल्यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात हा प्रकार घडला. मार्च २०१७ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेसाठी शाळेतील २७ विद्यार्थ्यानी फॉर्मच भरले नसल्याचे लक्षात आल्यानंतर संस्थेचे माजी सचिव श्रीनिवास वनमामुला यांनी या प्रकाराचा मागोवा घेतला. ते २७ विद्यार्थी शाळेत कधी येतच नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रत्यक्ष विद्यार्थी व त्यांच्या पालकांची भेट घेऊन चौकशी केली असता पाचवीपासूनच शाळा सोडल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. एवढेच नाही तर ते अनुपस्थित विद्यार्थी कधी वर्गातही येत नव्हते असे शाळेत नियमित येणाºया विद्यार्थ्यांनी सांगितले.वनमामुला यांनी या शाळेत येणाºया विद्यार्थ्यांच्या बयाणाचे व्हिडीओ रेकॉर्र्डिंग करून तसेच अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांचे लेखी बयाण घेऊन या गंभीर प्रकाराबाबत वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. मात्र शिक्षणाधिकाºयांपासून सर्वांनी थातूरमातूर चौकशीपलिकडे कोणतीही कारवाई केली नाही.शासनाच्या नियमानुसार शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शाळेत टाकल्यानंतर त्यांना नापास करता येत नाही, अशी बाजू मुख्याध्यापक वाढई यांनी मांडली. मात्र पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थी पुढच्या वर्गात ढकलत नेताना त्यांच्या नावावर येणारा शालेय पोषण आहार, शिष्यवृत्ती अशा योजना लाटल्या असण्याची शक्यता तक्रारकर्ते श्रीनिवास वनमामुला यांनी व्यक्त केली आहे.विशेष म्हणजे यासंदर्भात तक्रार केल्यानंतर शिक्षणाधिकाºयांनी गटशिक्षणाधिकाºयांमार्फत थातुरमातूर चौकशी केली. पण वनमामुला यांनी पुनचौकर्शीचे पत्र शिक्षण उपसंचालक, शिक्षण सचिवांना दिल्यानंतर त्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी गुढे यांना दिले. त्यांनी ४ आॅक्टोबर २०१७ ला दिलेल्या आपल्या चौकशी अहवालात मुख्याध्यापकाचा हवाला देत ते २७ विद्यार्थी हलाखीच्या परिस्थितीमुळे शेतात काम करायला जातात, त्यामुळे परीक्षेला प्रविष्ठ झाले नाही असे म्हटले. मात्र त्या विद्यार्थ्यांची, पालकांची किंवा तक्रारकर्ते वनमामुला यांची भेट, बयाण घेतले नाही.या शाळेत पाचवी ते दहावीपर्यंत असे १५० ते २०० बोगस विद्यार्थी असून त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिक्षण मंत्रालयाकडे केली आहे.अपहाराची कबुली, पण कारवाई नाहीशिक्षणाधिकाºयांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये दिलेल्या चौकशी अहवालात श्रीनिवास हायस्कूलमधील अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती २००८-०९ पासून २००१२-१३ पर्यंत प्रलंबित असल्याचे तसेच २०१३-१४ मध्ये शिष्यवृत्तीत अपहार केल्याचे निदर्शनास आले, असे अहवालात म्हटले आहे. मात्र अपहार झाल्याचे दिसत असताना कारवाई मात्र काहीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या सर्व गैरप्रकारांना शिक्षण विभागाचे तर पाठबळ नाही ना? अशी दाट शंका उपस्थित होत आहे.