शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाचवीपासून शाळा सोडलेले विद्यार्थी पोहोचले दहावीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:38 IST

सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील वेंकटेश्वर शिक्षण संस्थेद्वारा संचालित श्रीनिवास हायस्कूलमध्ये पाचवीपासून शाळा सोडलेले अनेक विद्यार्थी पुढचे सर्व वर्ग उत्तीर्ण होऊन दहावीच्या हजेरीपटावर पोहोचल्याचा रहस्यमय प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देहजेरीपटाचे गूढ रहस्य : शिष्यवृत्ती, पोषण आहारासह इतर लाभ लाटल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील वेंकटेश्वर शिक्षण संस्थेद्वारा संचालित श्रीनिवास हायस्कूलमध्ये पाचवीपासून शाळा सोडलेले अनेक विद्यार्थी पुढचे सर्व वर्ग उत्तीर्ण होऊन दहावीच्या हजेरीपटावर पोहोचल्याचा रहस्यमय प्रकार घडला आहे. यासंदर्भात संस्थेच्या माजी सचिवानेच शिक्षणमंत्र्यांसह सर्व संबंधित अधिकाºयांकडे तक्रारी केल्या. पण या प्रकाराची गांभिर्याने दखल घेण्याऐवजी शिक्षण विभागाकडून थातूरमातूर अहवाल तयार करून या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.अंकिसाच्या श्रीनिवास हायस्कूलमध्ये गेल्यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात हा प्रकार घडला. मार्च २०१७ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेसाठी शाळेतील २७ विद्यार्थ्यानी फॉर्मच भरले नसल्याचे लक्षात आल्यानंतर संस्थेचे माजी सचिव श्रीनिवास वनमामुला यांनी या प्रकाराचा मागोवा घेतला. ते २७ विद्यार्थी शाळेत कधी येतच नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रत्यक्ष विद्यार्थी व त्यांच्या पालकांची भेट घेऊन चौकशी केली असता पाचवीपासूनच शाळा सोडल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. एवढेच नाही तर ते अनुपस्थित विद्यार्थी कधी वर्गातही येत नव्हते असे शाळेत नियमित येणाºया विद्यार्थ्यांनी सांगितले.वनमामुला यांनी या शाळेत येणाºया विद्यार्थ्यांच्या बयाणाचे व्हिडीओ रेकॉर्र्डिंग करून तसेच अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांचे लेखी बयाण घेऊन या गंभीर प्रकाराबाबत वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. मात्र शिक्षणाधिकाºयांपासून सर्वांनी थातूरमातूर चौकशीपलिकडे कोणतीही कारवाई केली नाही.शासनाच्या नियमानुसार शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शाळेत टाकल्यानंतर त्यांना नापास करता येत नाही, अशी बाजू मुख्याध्यापक वाढई यांनी मांडली. मात्र पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थी पुढच्या वर्गात ढकलत नेताना त्यांच्या नावावर येणारा शालेय पोषण आहार, शिष्यवृत्ती अशा योजना लाटल्या असण्याची शक्यता तक्रारकर्ते श्रीनिवास वनमामुला यांनी व्यक्त केली आहे.विशेष म्हणजे यासंदर्भात तक्रार केल्यानंतर शिक्षणाधिकाºयांनी गटशिक्षणाधिकाºयांमार्फत थातुरमातूर चौकशी केली. पण वनमामुला यांनी पुनचौकर्शीचे पत्र शिक्षण उपसंचालक, शिक्षण सचिवांना दिल्यानंतर त्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी गुढे यांना दिले. त्यांनी ४ आॅक्टोबर २०१७ ला दिलेल्या आपल्या चौकशी अहवालात मुख्याध्यापकाचा हवाला देत ते २७ विद्यार्थी हलाखीच्या परिस्थितीमुळे शेतात काम करायला जातात, त्यामुळे परीक्षेला प्रविष्ठ झाले नाही असे म्हटले. मात्र त्या विद्यार्थ्यांची, पालकांची किंवा तक्रारकर्ते वनमामुला यांची भेट, बयाण घेतले नाही.या शाळेत पाचवी ते दहावीपर्यंत असे १५० ते २०० बोगस विद्यार्थी असून त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिक्षण मंत्रालयाकडे केली आहे.अपहाराची कबुली, पण कारवाई नाहीशिक्षणाधिकाºयांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये दिलेल्या चौकशी अहवालात श्रीनिवास हायस्कूलमधील अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती २००८-०९ पासून २००१२-१३ पर्यंत प्रलंबित असल्याचे तसेच २०१३-१४ मध्ये शिष्यवृत्तीत अपहार केल्याचे निदर्शनास आले, असे अहवालात म्हटले आहे. मात्र अपहार झाल्याचे दिसत असताना कारवाई मात्र काहीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या सर्व गैरप्रकारांना शिक्षण विभागाचे तर पाठबळ नाही ना? अशी दाट शंका उपस्थित होत आहे.