शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पेपरला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ

By admin | Updated: April 5, 2016 03:59 IST

गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा सोमवारपासून सुरू झाली. पहिल्याच

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा सोमवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरील पेपर अर्धा तासाने उशीरा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. गोंडवाना विद्यापीठांतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश आहे. जवळपास १ लाख २५ हजार विद्यार्थी उन्हाळी परीक्षा देत आहेत. यासाठी विद्यापीठाने गडचिरोली जिल्ह्यात २३ व चंद्रपूर जिल्ह्यात ४१ परीक्षा केंद्र निर्माण केले असून या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतली जात आहे. विद्यापीठाने पहिल्यांदाच आॅनलाईन पध्दतीने पेपर परीक्षा केंद्रावर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अवलंबिली आहे. मात्र ही सर्व प्रक्रिया पार पाडताना वेळेचे भान ठेवणे आवश्यक होते. विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनामुळे पेपरच्या प्रिंट वेळेवर झाल्या नाही. त्यामुळे ९.३० वाजताचा पेपर गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर १० वाजता सुरू झाला. अर्धा तास उशीरा पेपर सुरू झाल्याने परीक्षार्थींचा गोंधळ उडाला. तालुकास्थळावरील काही परीक्षा केंद्रावर सुध्दा पेपर उशीराच सुरू झाला. (नगर प्रतिनिधी) सीडीच्या पासवर्डसाठी पोलिसांच्या वॉकीटाकीचा वापर४जिल्ह्यातील काही ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांवर ब्रॉडबँडची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे तेथील परीक्षा केंद्रांवर आॅनलाईन पध्दतीने पेपर पाठविता येणार नाही. याची पूर्व कल्पना विद्यापीठाला असल्याने अशा परीक्षा केंद्रांसाठी प्रश्नपत्रिकेच्या सीडी तयार करण्यात आल्या होत्या. या सीडी परीक्षा केंद्रावर अगोदरच उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र या सीडी पासवर्ड टाकल्याशिवाय ओपन होत नाही. हा पासवर्ड अगदी परीक्षेच्या दिवशी विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिला जातो. याची माहिती फोनद्वारे घेतली जाते. मात्र दुर्गम भागातील परीक्षा केंद्रांवरील फोनची यंत्रणा काम करीत नसल्याने पोलिसांच्या वॉकीटॉकीच्या माध्यमातून विद्यापीठाशी संपर्क साधून सीडीचे पासवर्ड मागविण्यात आले. त्यानंतर प्रिंट काढून पेपरला सुरूवात झाली. ही सर्व भानगड करताना काही परीक्षा केंद्रावर पेपर तब्बल एक ते दीड तास उशीरा सुरू झाला असल्याची माहिती आहे.ढिसाळ नियोजनाने नावीन्यपूर्ण उपक्रमाला गालबोट४विद्यापीठ स्तरावरून प्रश्नपत्रिकांचे गट्टे नेताना पेपर फुटण्याचा धोका असतो. राज्यात आजपर्यंत अशा प्रकारच्या शेकडो घटना घडल्या आहेत. यावर उपाय म्हणून विद्यापीठाने आॅनलाईन पध्दतीने प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर उपलब्ध करून देण्याचा नावीन्यपूर्ण व प्रसंशनीय उपक्रम यावर्षीपासून पहिल्यांदाच सुरू केला आहे. मागास जिल्ह्यातील विद्यापीठ असा ठपका असलेल्या विद्यापीठाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याचे धाडस दाखविल्याबद्दल शिक्षण क्षेत्रातून विद्यापीठाच्या या उपक्रमाचे कौतुकही केले जात आहे. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी करून दाखविणे हे विद्यापीठासमोरील खरे आव्हान होते. मात्र विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनाने हे आव्हान पेलता आले नाही व पहिल्याच दिवशी या उपक्रमाला गालबोट लागले.परीक्षा केंद्रावर आॅनलाईन पध्दतीने प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जात आहेत. हा नवीन उपक्रम आहे. त्यामुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या व काही परीक्षा केंद्रांवर उशीरा पेपर सुरू झाला. या तांत्रिक अडचणी दूर करून दुसरे पेपर वेळेवर सुरू होईल. यासाठी विद्यापीठ प्रयत्न करणार आहे.- डॉ. विनायक इरपाते, कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली