शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मालवाहू वाहनाने विद्यार्थ्यांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:42 IST

सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील बससेवा मागील १० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मालवाहू वाहनाच्या मदतीने दररोज शाळा गाठावी लागत आहे. हा परिसर जंगलाने व्यापला आहे. झिंगानूर हे परिसरातील सर्वात मोठे गाव आहे.

ठळक मुद्दे१७ जुलैपासून बससेवा बंद : झिंगानूर-सिरोंचा मार्गावरील चिखलामुळे वाहतुकीवर परिणाम

रामचंद्र कुमरी।लोकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर (गडचिरोली) : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील बससेवा मागील १० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मालवाहू वाहनाच्या मदतीने दररोज शाळा गाठावी लागत आहे.हा परिसर जंगलाने व्यापला आहे. झिंगानूर हे परिसरातील सर्वात मोठे गाव आहे. या ठिकाणी शासकीय आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. मात्र अकरावीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सिरोंचा या तालुकास्थळी गेल्याशिवाय पर्याय नाही. झिंगानूर येथील आश्रमशाळेत बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय करावी, अशी मागणी अनेकवेळा होत असली तरी प्रशासन व शासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी दहावी पास झाल्यानंतर सिरोंचा येथे प्रवेश घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सिरोंचा ते झिंगानूरपर्यंतचे अंतर ४० किमी आहे. या ४० किमी अंतरात अनेक नाले व लहान नद्या आहेत. या नाल्यांवर अजूनही पुलाचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे पावसात नाल्याच्या ठेंगण्या पुलावरून पाणी राहते. परिणामी विद्यार्थ्यांना अर्ध्यावरूनच परत यावे लागते. काही विद्यार्थी जीव धोक्यात घालून पुढचा प्रवास करतात. यावर्षी बांधकाम विभागाने काही नाल्यांवर पुलाचे बांधकाम सुरू केले. नागरिकांना ये-जा करण्यासाठी बाजूने रस्ता केला आहे. या रस्त्यावर पावसाळ्यात चिखल निर्माण झाला आहे. बससह जड वाहने फसत असल्याने एसटी विभागाने झिंगानूरला जाणारी बस १७ जुलैपासून बंद केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मालवाहू वाहनातून सिरोंचा गाठावे लागत आहे. बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही मालवाहू वाहनातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.झिंगानूर येथील आश्रमशाळेत परिसरातील काही विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यांनाही नदी, नाल्यांचा सामना करत सिरोंचा गाठावे लागते. कोरेतोगू नाल्यावरील पुलाच्या बाजूने तयार केलेल्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यामुळेच बस फेरी बंद करण्यात आली. परिणामी सर्वांचे मोठे हाल होत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना या भागातील नागरिक अद्याप प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत.

टॅग्स :SchoolशाळाTravelप्रवास