शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
3
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
4
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
5
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
6
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
7
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
8
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
9
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
10
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
11
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
12
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
13
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
14
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
15
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
16
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
17
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
18
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
19
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
20
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू वाहनाने विद्यार्थ्यांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:42 IST

सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील बससेवा मागील १० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मालवाहू वाहनाच्या मदतीने दररोज शाळा गाठावी लागत आहे. हा परिसर जंगलाने व्यापला आहे. झिंगानूर हे परिसरातील सर्वात मोठे गाव आहे.

ठळक मुद्दे१७ जुलैपासून बससेवा बंद : झिंगानूर-सिरोंचा मार्गावरील चिखलामुळे वाहतुकीवर परिणाम

रामचंद्र कुमरी।लोकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर (गडचिरोली) : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील बससेवा मागील १० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मालवाहू वाहनाच्या मदतीने दररोज शाळा गाठावी लागत आहे.हा परिसर जंगलाने व्यापला आहे. झिंगानूर हे परिसरातील सर्वात मोठे गाव आहे. या ठिकाणी शासकीय आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. मात्र अकरावीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सिरोंचा या तालुकास्थळी गेल्याशिवाय पर्याय नाही. झिंगानूर येथील आश्रमशाळेत बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय करावी, अशी मागणी अनेकवेळा होत असली तरी प्रशासन व शासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी दहावी पास झाल्यानंतर सिरोंचा येथे प्रवेश घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सिरोंचा ते झिंगानूरपर्यंतचे अंतर ४० किमी आहे. या ४० किमी अंतरात अनेक नाले व लहान नद्या आहेत. या नाल्यांवर अजूनही पुलाचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे पावसात नाल्याच्या ठेंगण्या पुलावरून पाणी राहते. परिणामी विद्यार्थ्यांना अर्ध्यावरूनच परत यावे लागते. काही विद्यार्थी जीव धोक्यात घालून पुढचा प्रवास करतात. यावर्षी बांधकाम विभागाने काही नाल्यांवर पुलाचे बांधकाम सुरू केले. नागरिकांना ये-जा करण्यासाठी बाजूने रस्ता केला आहे. या रस्त्यावर पावसाळ्यात चिखल निर्माण झाला आहे. बससह जड वाहने फसत असल्याने एसटी विभागाने झिंगानूरला जाणारी बस १७ जुलैपासून बंद केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मालवाहू वाहनातून सिरोंचा गाठावे लागत आहे. बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही मालवाहू वाहनातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.झिंगानूर येथील आश्रमशाळेत परिसरातील काही विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यांनाही नदी, नाल्यांचा सामना करत सिरोंचा गाठावे लागते. कोरेतोगू नाल्यावरील पुलाच्या बाजूने तयार केलेल्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यामुळेच बस फेरी बंद करण्यात आली. परिणामी सर्वांचे मोठे हाल होत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना या भागातील नागरिक अद्याप प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत.

टॅग्स :SchoolशाळाTravelप्रवास